![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Kolhapur Loksabha : अखेर कोल्हापूरचा तिढा सुटला, जागा कुणाला जाणार यावर शिक्कामोर्तब
Kolhapur Loksabha : कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोल्हापूर मतदारसंघ छत्रपती शाहू महाराजांना सोडण्यास सहमती दर्शवली आहे.
![Kolhapur Loksabha : अखेर कोल्हापूरचा तिढा सुटला, जागा कुणाला जाणार यावर शिक्कामोर्तब Kolhapur Lok Sabha constituency Shiv Sena Thackeray faction has shown readiness to release Kolhapur seat for Chhatrapati Shahu Maharaj Maharashtra Politics Marathi News Kolhapur Loksabha : अखेर कोल्हापूरचा तिढा सुटला, जागा कुणाला जाणार यावर शिक्कामोर्तब](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/04/75b91b78b7ff1ee4cb0f8eb8dbb48baa1709565409187924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur Loksabha : कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोल्हापूर मतदारसंघ छत्रपती शाहू महाराजांना सोडण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज (Shahu Maharaj) मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या जागेच्या बदल्यात काँग्रेसकडून सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्यावर एकमत झालं आहे.
शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरची जागा सोडल्यानंतर शिवसैनिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागलाय. या जागेच्या बदल्यात शिवसेनेला सांगलीची जागा मिळणार आहे. सांगलीतून 2014 आणि 2019 साली बीजेपीच्या संजय काका पाटील यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांना पराभूत केले होते. प्रतीक पाटील यांनी राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर त्यांचे बंधू विशाल पाटील यांनीही काँग्रेसशी ऐवजी स्वाभिमानी शेतकरी पक्षातून 2019 ची लोकसभा लढवली होती. कारण आघाडीत काँग्रेसने सांगली स्वाभिमानीसाठी सोडली होती.
शाहू महाराजांनी दिले होते ब्रेकिंग न्यूजचे संकेत
तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे. पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल. ब्रेकिंग न्यूज ऐषोराम करण्यासाठी नाही तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल. त्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन देखील लागणार आहे, असे शाहू महाराज म्हणाले होते. ब्रेकिंग न्यूज या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी भाष्य केलं होतं.
लोकसभेच्या उमेदवारीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गेलाय असं मला कळलं. मी मुंबईला सुद्धा गेलो नाही. आपल्याला कोल्हापूरच्या विकासासाठी काम करायचं आहे. ब्रेकिंग न्यूज आल्यानंतर मी तुम्हाला नक्की बोलवेन, अशी ग्वाही शाहू महाराज छत्रपती यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित पत्रकारांना दिली होती.
शाहू महाराजांना उमेदवार असतील आनंदचं होईल : शरद पवार
"शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे. कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल", असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)