एक्स्प्लोर

Kalammawadi Dam : तळ गाठूनही काळम्मावाडी धरण सांडवा पातळीपर्यंत भरले; पाच वक्राकार दरवाजातून 1 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू

काळम्मावाडी धरणात 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. काळम्मावाडी धरण सांडवा पातळीपर्यंत भरले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या पातळीपर्यंत काळम्मावाडी तीन दिवस आधीच भरले आहे.

Kalammawadi Dam : कोल्हापूर शहराला थेट पाईपने पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आलेल्या काळम्मावाडी धरणात 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. काळम्मावाडी धरण सांडवा पातळीपर्यंत भरले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या पातळीपर्यंत काळम्मावाडी तीन दिवस आधीच भरले आहे. गळतीमुळे विशेष म्हणजे धरणातील कमी करण्यात आलेला संचय आणि उन्हाळ्यात धरणात तळ गाठल्यान चिंता लागून राहिली होती. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या धुवाँधार पावसाने धरणात पाणीसाठा वेगाने झाला आहे. पाणीसाठा कमी करण्यासाठी पाच वक्राकार दरवाजातून एक हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. पायथ्याच्या वीज गृहात जनित्र संचात तांत्रिक बिघाड झाल्याने विसर्ग सुरू करण्यास अडसर आहे. त्यामुळे वक्राकार दरवाजातून विसर्ग सुरू आहे. वक्राकार दरवाजावरून दूधगंगा नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. 

धरण 20.2 टीएमसी म्हणजेच 79.54 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन संस्थेच्या निकषानुसार सध्याचा पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या गळतीच्या कारणास्तव गेल्या वर्षीपासून पाच टीएमसी कमी पाणी संचय केला जात आहे. यंदाही हीच पाणी पातळी निर्धारित करण्याचे ठरले आहे. गतवर्षी या धरणात पाच टीएमसी पाणी शिल्लक असूनही धरण या पातळीला सात ऑगस्टला भरले होते. यंदा तळ गाठूनही चार ऑगस्टला भरल्याने पावसाचा अंदाज येतो. 

धरण फुटल्यावर काम होणार का?

दरम्यान, काळम्मावाडी धरणाच्या भिंतीतील पाणी गळती काढण्याच्या नावाखाली गेल्यावर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला होता. त्याचा कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला फटका बसला. या धरणाला गळती लागल्यामुळे धरण धोक्यात असून दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्यावा, अशी मागणी आमदार पी.एन. पाटील यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. 

काळम्मावाडी धरणाची पाणी साठवण क्षमता 28 टीएमसी असून या धरणाच्या मुख्य भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी प्रतिसेकंद 650 लिटर्स पाणी गळती होते. ही गळती एक वर्षात काढणार असून 84 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आणि निविदा काढणार आहे, असे सांगून काही अधिकाऱ्यांनी तीस टक्के पाणीसाठा कमी केला होता. मात्र, पावसाला उशीर झाल्याने ऐन उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. जनतेला प्यायलाही पाणी मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. 

या धरणाला धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे धोका असूनही कामच व्हायला तयार नाही. धरण फुटल्यावर काम होणार का? असा संतप्त सवाल पाटील यांनी उपस्थित केला. ज्या ठिकाणी धरण फुटलं आहे तेथील जनतेचे हाल झाले आहेत. धोकादायक असलेल्या काळम्मावाडी धरणाची दुरुस्ती लवकर होणार का? याबाबत शासनाने स्पष्टीकरण द्यावे व तातडीने निधी मंजूर करून निविदा काढावी अशी मागणी पाटील यांनी केली. या मागणीवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uk Visa Fee Hike : अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
PM Narendra Modi : देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
Shirdi News : साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 30 March 2025MNS Gudi Padwa Melava : मनसेचा गुढीपाडवा मेळावा, शिवाजी पार्कवर राजगर्जनाPM Narendra Modi Speech Nagpur : राष्ट्रीय स्वंयसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय वट- मोदीABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 30 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uk Visa Fee Hike : अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
PM Narendra Modi : देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
Shirdi News : साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
Beed Crime : बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कोट्यवधी रुपयांच्या आलीशान कारमध्ये स्फोट, एफएसबी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळ घडलेल्या प्रकाराने खळबळ
Video : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कोट्यवधी रुपयांच्या आलीशान कारमध्ये स्फोट, एफएसबी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळ घडलेल्या प्रकाराने खळबळ
Nepal Protest : 'राजा आणा, देश वाचवा' नेपाळमध्ये जी राजेशाही हद्दपार केली तीच परत आणा अशी मागणी करत लोकं रस्त्यावर का उतरले?
'राजा आणा, देश वाचवा' नेपाळमध्ये जी राजेशाही हद्दपार केली तीच परत आणा अशी मागणी करत लोकं रस्त्यावर का उतरले?
Embed widget