![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Chitra Wagh In Kolhapur : गेल्या अडीच वर्षात काय पाहिलं नाही? बलात्कार, सामूहिक बलात्कार, विनयभंग बघितले; चित्रा वाघ यांची महाविकास आघाडीवर टीका
शाहिस्तेखानाची बोट शिवाजी महाराजांनी छाटली हे इतिहासात वाचलं होतं, पण ठाण्यासारख्या ठिकाणी एका महिलेची बोटं देखील तोडली होती, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
![Chitra Wagh In Kolhapur : गेल्या अडीच वर्षात काय पाहिलं नाही? बलात्कार, सामूहिक बलात्कार, विनयभंग बघितले; चित्रा वाघ यांची महाविकास आघाडीवर टीका Chitra Wagh criticizes the MVA over women safety in maharashtra bjp kolhapur Chitra Wagh In Kolhapur : गेल्या अडीच वर्षात काय पाहिलं नाही? बलात्कार, सामूहिक बलात्कार, विनयभंग बघितले; चित्रा वाघ यांची महाविकास आघाडीवर टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/d04ba8f302ca984061e4893973a33d69167101422063688_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chitra Wagh In Kolhapur : महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राने काय पाहिलं नाही? बलात्कार, सामूहिक बलात्कार, विनयभंग बघितले. शाहिस्तेखानाची बोट शिवाजी महाराजांनी छाटली हे इतिहासात वाचलं होतं, पण ठाण्यासारख्या ठिकाणी एका महिलेची बोटं देखील तोडली होती, अशा शब्दात भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. चित्रा वाघ कोल्हापूर (Chitra Wagh In Kolhapur) दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 45 आणि विधानसभेला 288 पैकी 200 जागू, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनानंतर चित्रा वाघ पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, महिलांविरोधातील तक्रारी मोठ्या संख्येनं रजिस्टर व्हायला पाहिजेत. त्यामुळे महिलांची छेड काढणाऱ्यावर कारवाई करता येईल. नागरिकांनी देखील चुकीच्या घटना घडत असेल तर थांबून मदत करावी, पोलिस आणि सरकार आपलं काम करत राहणार आहे. कोणत्याही पोलिस (Maharashtra Police) अधिकाऱ्यांनी आपल्या कामात कसूर केली असेल, तर त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल.
दरम्यान, लव्ह जिहाद हा प्रश्न संपूर्ण राज्यात पोहोचला असून मुली वयात येण्याचं वय कमी झालं आहे. उत्तर प्रदेश सारखा लव्ह जिहाद कायदा आणावा अशी मागणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चित्रा वाघ यांनी भाजप आमदार नितेश राणे यांनी मतदारांनी दिलेल्या धमकीवर प्रतिक्रिया देताना सावध भूमिका घेतली. नितेश राणे कोणत्या कार्यक्रमात बोलले किंवा त्यांचे काय वक्तव्य हे पाहिलेलं नाही. खरंच असं बोलले असतील, तर ते योग्य नाही. भाषण पूर्ण ऐकून प्रतिक्रिया देईन, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, भाजपचे नेते हेकडी नाहीत, सगळ्यांचे सल्ले ऐकून घेतले जातात. चांगला सल्ला असेल तर स्वीकारतात, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या पत्रावर दिली.
निर्भया पथकाच्या गाड्या सर्वच पक्षातील नेत्यांनी वापरल्या
पुरुष कार्यकर्त्यांबरोबर महिला मोर्चा देखील बुथवर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, निर्भया पथकातील गाड्या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापर होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारची बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, निर्भया पथकाच्या गाड्या सर्वच पक्षातील नेत्यांनी वापरल्या आहेत. ज्यांनी टीका केली त्या सुप्रियाताई सुळे (Chitra Wagh on Supriya Sule) यांनी देखील निर्भया पथकातील गाडी वापरली आहे. हळूहळू या गाड्या जमा करून महिलांच्या सुरक्षेसाठी वापरल्या जातील.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)