एक्स्प्लोर

Kolhapur News : येथे कचरा टाकणारा दोन बापाचा, आता टाक कचरा; दिसेल तिथं कचरा टाकू लागल्याने संतापलेल्या नागरिकांचा कोल्हापुरात लागला बॅनर 

शहराच्या प्रवेशद्वाराला कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्यामुळे कोल्हापूर शहर आणि ग्रामीण हा वाद टोकाला पोहोचला आहे. ग्रामीण भागातील रहिवासी शहराच्या हद्दीत कचरा आणून टाकतात.

कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur News) सर्वत्र कचरा तुंबत असतानाच आता कचऱ्यावरून अलीकडे ग्रामीण आणि शहरी वाद होत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उपनगरातील कचऱ्यांबाबत ठाम भूमिका घेत कचरा उचलणे बंद केले आहे. त्याचे पडसाद आता उमटत आहेत. महानगरपालिकेने 3-4 वेळा पत्रव्यवहार करूनही जिल्हा परिषदेकडून दाद देत नसल्याचे चित्र आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी मात्र ग्रामीण भागातील रहिवाशांना पकडून थेट दम दिला आहे. तर वैतागलेल्या रहिवाशांनी रस्त्यावर कचरा फेकण्यास सुरुवात केली आहे.

शहराच्या प्रवेशद्वारालाच कचऱ्याचे ढीग 

कोल्हापूर शहराची व्याप्ती वाढत आहे. शहरातील उपनगरांच्या बाजूला ग्रामीण भागाला सुरुवात होते. त्या ठिकाणीही वस्ती वाढत आहे. शहराशेजारी असलेल्या पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, बालिंगे, नागदेवाडी, पाडळी, शिंगणापूरसह अन्य गावात रहिवाशी क्षेत्र सुरू झालं आहे. अशा परिस्थितीत तयार झालेला कचरा टाकायचा कुठे? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे. घरफाळा घेऊनही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात या ग्रामपंचायती कमी पडत आहेत. 

शहराच्या प्रवेशद्वारालाच कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्यामुळे कोल्हापूर शहर आणि ग्रामीण हा वाद टोकाला पोहोचला आहे. ग्रामीण भागातील रहिवासी शहराच्या हद्दीत कचरा आणून टाकतात. कोल्हापूर महानगरपालिकेची गाडी घरोघरी फिरत असल्याने हा कचरा उचलणार कोण? असा सवाल कर्मचारी करत तो उचलत नाहीत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत चालली आहे. त्याबाबतच्या तक्रारी महानगरपालिकेकडे देखील करण्यात आली.

शहरी आणि गामीण रहिवाशांमध्ये वाद सुरू

गेल्या चार महिन्यात महानगरपालिकेने जिल्हा परिषदेला चार पत्रव्यवहार केले आहेत. मात्र, या पत्रांची दखल जिल्हा परिषद घेत नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्यकडे संपर्क साधला असता होऊ शकला नाही. जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे आता शहरी आणि गामीण रहिवाशांमध्ये वाद सुरू झाले आहेत. संतप्त नागरिक आता रस्त्यावरच कचरा टाकून महापालिकेबाबत रोष व्यक्त करत आहेत. ग्रामपंचायती घरफाळा घेत असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची हमी घेत नाही. जिल्हा परिषदेकडूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही कचरा कुठे टाकणार? असा सवाल रहिवाशी करतात. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतील कमी संवादामुळे ग्रामीण आणि शहरी वादाने डोकं वर काढलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
Ashish Shelar PC : भ्रष्ट आणि अकार्यक्षण ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप
Ambadas Danve on BJP : भाजपला पैशांची मस्ती, उन्माद, संभाजीनगरात दानवेंच्या भावाचा संताप अनावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
Embed widget