एक्स्प्लोर

Kolhapur News : येथे कचरा टाकणारा दोन बापाचा, आता टाक कचरा; दिसेल तिथं कचरा टाकू लागल्याने संतापलेल्या नागरिकांचा कोल्हापुरात लागला बॅनर 

शहराच्या प्रवेशद्वाराला कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्यामुळे कोल्हापूर शहर आणि ग्रामीण हा वाद टोकाला पोहोचला आहे. ग्रामीण भागातील रहिवासी शहराच्या हद्दीत कचरा आणून टाकतात.

कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur News) सर्वत्र कचरा तुंबत असतानाच आता कचऱ्यावरून अलीकडे ग्रामीण आणि शहरी वाद होत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उपनगरातील कचऱ्यांबाबत ठाम भूमिका घेत कचरा उचलणे बंद केले आहे. त्याचे पडसाद आता उमटत आहेत. महानगरपालिकेने 3-4 वेळा पत्रव्यवहार करूनही जिल्हा परिषदेकडून दाद देत नसल्याचे चित्र आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी मात्र ग्रामीण भागातील रहिवाशांना पकडून थेट दम दिला आहे. तर वैतागलेल्या रहिवाशांनी रस्त्यावर कचरा फेकण्यास सुरुवात केली आहे.

शहराच्या प्रवेशद्वारालाच कचऱ्याचे ढीग 

कोल्हापूर शहराची व्याप्ती वाढत आहे. शहरातील उपनगरांच्या बाजूला ग्रामीण भागाला सुरुवात होते. त्या ठिकाणीही वस्ती वाढत आहे. शहराशेजारी असलेल्या पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, बालिंगे, नागदेवाडी, पाडळी, शिंगणापूरसह अन्य गावात रहिवाशी क्षेत्र सुरू झालं आहे. अशा परिस्थितीत तयार झालेला कचरा टाकायचा कुठे? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे. घरफाळा घेऊनही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात या ग्रामपंचायती कमी पडत आहेत. 

शहराच्या प्रवेशद्वारालाच कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्यामुळे कोल्हापूर शहर आणि ग्रामीण हा वाद टोकाला पोहोचला आहे. ग्रामीण भागातील रहिवासी शहराच्या हद्दीत कचरा आणून टाकतात. कोल्हापूर महानगरपालिकेची गाडी घरोघरी फिरत असल्याने हा कचरा उचलणार कोण? असा सवाल कर्मचारी करत तो उचलत नाहीत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत चालली आहे. त्याबाबतच्या तक्रारी महानगरपालिकेकडे देखील करण्यात आली.

शहरी आणि गामीण रहिवाशांमध्ये वाद सुरू

गेल्या चार महिन्यात महानगरपालिकेने जिल्हा परिषदेला चार पत्रव्यवहार केले आहेत. मात्र, या पत्रांची दखल जिल्हा परिषद घेत नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्यकडे संपर्क साधला असता होऊ शकला नाही. जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे आता शहरी आणि गामीण रहिवाशांमध्ये वाद सुरू झाले आहेत. संतप्त नागरिक आता रस्त्यावरच कचरा टाकून महापालिकेबाबत रोष व्यक्त करत आहेत. ग्रामपंचायती घरफाळा घेत असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची हमी घेत नाही. जिल्हा परिषदेकडूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही कचरा कुठे टाकणार? असा सवाल रहिवाशी करतात. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतील कमी संवादामुळे ग्रामीण आणि शहरी वादाने डोकं वर काढलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
D Y Patil passes away: मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Embed widget