एक्स्प्लोर

Manoj Jarange : तब्बल 5 महिने 3 दिवसांनी मनोज जरांगे आज घराचा उंबरठा ओलांडणार

Manoj Jarange : विशेष म्हणजे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आपण आता घरी जाणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली होती.

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेली 5 महिने सतत आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) आज घरी परतणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर 29 ऑगस्टपासून तीन वेळा उपोषणाच्या माध्यमातून सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे आज आपल्या घराचा उंबरठा ओलांडत आत प्रवेश करतील. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आपण घरी जाणार नसल्याचा निर्णय जरांगे यांनी घेतला होता. त्यामुळे तब्बल 5 महिने 3 दिवसांनंतर आज जरांगे आपल्या घरी परतणार आहे. 

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात 29 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरु केले होते. याच काळात पोलिसांकडून उपोषणास्थळी लाठीचार्ज करण्यात आला आणि याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळाले. दरम्यान, आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका घेत जरांगे यांनी पुन्हा आंतरवालीत उपोषण सुरु केले. विशेष म्हणजे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आपण आता घरी जाणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली होती. त्यानंतर आता मुंबई आंदोलनावेळी सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला आहे. त्यामुळे आज मनोज जरांगे आपल्या घरी जाणार आहेत. 

10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण करणार...

सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, अध्यादेश काढल्यावर सरकारमधील मंत्र्यांकडून दोन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात असल्याने आम्हाला शंका येत आहे. त्यामुळे सरकराने काढलेल्या अध्यादेशानंतर 9 फेब्रुवारीपर्यंत त्यांना वेळ देण्यात येत असून, त्यांनी या काळात अध्यादेश लागू करावे. अन्यथा मी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे आता सरकारच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

ओबीसी संघटनांकडून अध्यादेशाला न्यायालयात आव्हान...

मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकराने सगेसोयरे बाबत नवीन अध्यादेश काढला आहे. दरम्यान, याच अध्यादेशाला ओबीसी संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे या अध्यादेशाच्या विरोधात ओबीसी संघटनांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच, संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरेची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी याचिकेच्या माध्यमांतून भूमिका मांडण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

गाड्याभरून लाठ्या, हेल्मेट अन् शेकडो पोलीस, आंतरवालीत 'त्या' रात्री काय घडलं?; मोठा खुलासा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व

व्हिडीओ

Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी
Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
Embed widget