एक्स्प्लोर

Manoj Jarange : तब्बल 5 महिने 3 दिवसांनी मनोज जरांगे आज घराचा उंबरठा ओलांडणार

Manoj Jarange : विशेष म्हणजे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आपण आता घरी जाणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली होती.

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेली 5 महिने सतत आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) आज घरी परतणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर 29 ऑगस्टपासून तीन वेळा उपोषणाच्या माध्यमातून सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे आज आपल्या घराचा उंबरठा ओलांडत आत प्रवेश करतील. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आपण घरी जाणार नसल्याचा निर्णय जरांगे यांनी घेतला होता. त्यामुळे तब्बल 5 महिने 3 दिवसांनंतर आज जरांगे आपल्या घरी परतणार आहे. 

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात 29 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरु केले होते. याच काळात पोलिसांकडून उपोषणास्थळी लाठीचार्ज करण्यात आला आणि याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळाले. दरम्यान, आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका घेत जरांगे यांनी पुन्हा आंतरवालीत उपोषण सुरु केले. विशेष म्हणजे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आपण आता घरी जाणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली होती. त्यानंतर आता मुंबई आंदोलनावेळी सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला आहे. त्यामुळे आज मनोज जरांगे आपल्या घरी जाणार आहेत. 

10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण करणार...

सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, अध्यादेश काढल्यावर सरकारमधील मंत्र्यांकडून दोन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात असल्याने आम्हाला शंका येत आहे. त्यामुळे सरकराने काढलेल्या अध्यादेशानंतर 9 फेब्रुवारीपर्यंत त्यांना वेळ देण्यात येत असून, त्यांनी या काळात अध्यादेश लागू करावे. अन्यथा मी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे आता सरकारच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

ओबीसी संघटनांकडून अध्यादेशाला न्यायालयात आव्हान...

मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकराने सगेसोयरे बाबत नवीन अध्यादेश काढला आहे. दरम्यान, याच अध्यादेशाला ओबीसी संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे या अध्यादेशाच्या विरोधात ओबीसी संघटनांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच, संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरेची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी याचिकेच्या माध्यमांतून भूमिका मांडण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

गाड्याभरून लाठ्या, हेल्मेट अन् शेकडो पोलीस, आंतरवालीत 'त्या' रात्री काय घडलं?; मोठा खुलासा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Embed widget