एक्स्प्लोर

Jalgaon Airport :  जळगावमधील विमान सेवा वर्षभरापासून ठप्प; विमानतळाला टाळे लागणार?

Jalgaon Airport : जळगावमधील विमानतळ सेवा वर्षभरापासून ठप्प असून आता विमानतळ बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Jalgaon Airport :  भूमिपूजनाच्या 45 वर्षानंतर प्रवाशांच्या सेवेत रुजू झालेल्या जळगाव विमानतळामागील शुक्लकाष्ठ संपण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. जवळपास एक वर्षापासून विमानतळ सेवा बंद आहे. त्यामुळे आता विमान प्राधिकरण जळगावमधून आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे जळगावातील उद्योजक, व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जळगाव विमानतळ सेवेत रुजू झाल्यापासून सुरू असलेली घरघर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. 1971 मध्ये भूमिपूजन झालेल्या जळगाव विमानतळावर विमान सेवा सुरू होण्यासाठी जवळपास 45 वर्षांचा कालावधी जावा लागला. त्यानंतर डिसेंबर 2017 ला केंद्राच्या उड्डाण योजनेत पहिल्यांदा जळगाव ते मुंबई प्रवासी विमान सेवा सुरू करण्यात आली होती. आठवड्यातून तीन दिवस सुरू असलेली विमान सेवा काही काळ वगळता नेहमीच अनियमित सुरू झाल्याने ती असून नसल्यासारखी झाली होती. विमान सेवा चालवण्यासाठीचा खर्च  परवडत नसल्याचे कारण देत एअर डेक्कनने आपली विमान सेवा बंद केली. त्यानंतर मोठ्या प्रयत्नानंतर त्रू जेट कंपनीने ही विमान सेवा चालविण्यास घेतली होती. मात्र,  काही महिने जात नाही तो पर्यंत ही कंपनी सुद्धा तांत्रिक कारण देत विमान सेवेतून बाहेर पडली. जळगाव प्रवासी विमान सेवा बंद होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. 

जळगाव विमानतळावर 72 आसनी विमानाला नाईट लँडिंगसह ऑल वेदर सेवा देण्यासाठी  सज्ज असलेल्या विमानतल प्राधिकरणाला मात्र विमान सेवा देणाऱ्या कंपन्या प्रतिसाद देत नाही. विमानतळाच्या संचलनासाठी होणारा वर्षाकाठी सहा ते सात कोटी रुपयांचा खर्च होतो. हा तोटा सहन करणे आता कठीण जाऊ लागल्याने विमानतळ प्राधिकरण या ठिकाणाहून आपला गाशा गुंडाळण्याचा तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जळगाव मधील उद्योजक आणि नागरीक चिंतेत पडले आहे 

सध्या या विमानतळाचा वापर विमान प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो. तरी त्यातून मिळणारे उत्पन्न हे नाममात्र आहे. त्यामुळे विमानतळ सेवा चालवणे परवडणारे नाही. त्यामुळे 50 कर्मचाऱ्यांच्या पगाराचा आणि रोजगाराचा प्रश्न ही निर्माण होत आहे.  विमान सेवा सुरू होणे हे कर्मचाऱ्यांच्यासह जळगावच्या विकासा साठी महत्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे.  विमान सेवा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उच्चतम सेवा देऊन आणि नुकसान होणार नाही याची हमी देऊन विमा कंपन्यांना आकर्षित केले जाणार असल्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले. मात्र, त्यादृष्टीनेदेखील फारशी हालचाल दिसत नसल्याने आशा आता मावळू लागली आहे. त्याच्या परिणामी विमानतळ प्राधिकरण आपला गाशा कधीही गुंडाळू शकते अशी चर्चा जळगावात सुरू आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
Embed widget