एक्स्प्लोर

Jalgaon Accident : जळगाव : अमळनेर तालुक्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; तीन चिमुकल्यांसह सहा जणांचा राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू

Jalgaon News : जळगावमधील सहा जणांचा राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन बालकांचा समावेश आहे.

Jalgaon News :  जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ गावातील सहा जणांचा राजस्थानमध्ये कार (Amalner Rajasthan Car Accident) अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने अमळनेर तालुक्यावर (Amalner Jalgaon) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिक्षकांचे कुटुंबीय या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. ऐन दिवाळीत झालेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांचे नातेवाईक घटना कळताच राजस्थानकडे रवाना झाले आहेत.

अमळनेर  तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थान मधील जैसलमेर येथे फिरायला जात होते. त्यावेळी कंटेनरला धडक लागून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मांडळ येथील  शिक्षक धनराज नगराज सोनवणे (वय 55, रा. बेटावद) आणि योगेश धोंडू साळुंखे (रा. अर्थे. ता. शिरपूर,  हल्ली मुक्काम  पिंपळे रोड, अमळनेर)  या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब एका गाडीत आणि दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब  एक गाडीत अशा दोन चार चाकींवर  राजस्थान फिरायला गेले होते.  आज, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका कंटेनरला त्यांच्या वाहनाची धडक बसली. डोरीमना गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सोनवणे आणि सांळुखे असलेल्या कारने एका कंटेनरला धडक दिली असल्याचे म्हटले जात आहे. 

या अपघातात धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा धनराज सोनवणे (वय 50), मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (5 वर्षे) , गायत्री योगेश साळुंखे (वय 30), प्रशांत योगेश साळुंखे (वय 7), भाग्यलक्ष्मी साळुंखे (वय 1) यांचा जागीच मृत्यू झाला.  

पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर सुरेखा ह्या जखमी होत्या. त्यांची रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. धोरिमाण्णा पोलीस ठाण्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी पोहोचून कारमध्ये अडकलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढले. सर्व मृतदेह धोरिमान्ना हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, या मृतांचे मृतदेह मंगळवार (दि. 14 नोव्हेंबर) धुळे जिल्ह्यात बेटावद आणि चीमथाणा येथे त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

पंजाबमध्ये भीषण अपघात, 100 कार एकमेकांवर आदळल्या

अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खन्नाजवळ धुक्यामुळे सुमारे 100 वाहने एकमेकांवर आदळून अपघात घडला. या अपघातात सुमारे 12 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे अमृतसर दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खन्नाजवळ सुमारे 100 वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात घडला. या अपघाता सुमारे 12 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, किरीट सोमय्यांची टीकाUddhav Thackeray On BJP : भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, उद्धव ठाकरेंचा घणाघातAditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, वरूण सरदेसाई प्रचारात एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
Anushka Shetty Wedding News : प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
Video: रवींद्र वायकर गद्दार, भ्रष्टाचाराचं त्यांनीच कबुल केलंय; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आक्रमक बोलले
Video: रवींद्र वायकर गद्दार, भ्रष्टाचाराचं त्यांनीच कबुल केलंय; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आक्रमक बोलले
Uttar Pradesh Loksabha Election : पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
Embed widget