एक्स्प्लोर

पाकची जिरवण्यासाठी पंतप्रधान मोदी आज मोठा निर्णय घेणार?

नवी दिल्ली: उरी हल्ल्यानंतर पाकला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतनं कंबर कसली आहे. पाकची खुमखुमी जिरवण्यासाठी 56 वर्षांपूर्वी झालेला सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्याच्या दृष्टीनं भारताच्या हालचाली सुरु आहेत. यासाठी आज दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी, जलसंधारणमंत्री उमा भारती आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक होणार आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने जी योजना आखली आहे, त्यावर आज दुपारच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले, तर पाकिस्तानची मोठी कोंडी होणार आहे. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केरळमधील आपल्या सभेत पाकिस्तानची खुमखुमी जिरवण्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याचं प्रयत्न सुरु असल्याचे सांगितलं होतं. यासाठी सिंधू नदीच्या प्रवाहाला ब्रेक लावूनच याची सुरुवात होऊ शकते. काय आहे करार? 1960 साली तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तान आणि पाकिस्तानचे तत्कालिन लष्करी हुकुमशाह आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांनी सिंधू नदीच्या पाणी वाटप करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार, सिंधू नदीला येऊन मिळणाऱ्या एकून पाच नद्यांपैकी सतलज, रावी आणि व्यास नदीवर भारताचा पूर्ण अधिकार देण्यात आला. तर पश्चिमेकडून वाहणाऱ्या चिनाब आणि झेलम या नद्यांच्या पाण्याचा वापर भारताकडून मर्यादित स्वरुपात होतो. सतलज नदीवर बांधण्यात आलेल्या भाकरा नांगल धरणावर एक वीज निर्मितीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून पंजाब आणि हिमचाल प्रदेशला वीजपुरवठा केला जातो. तर पश्चिमेकडून वाहणाऱ्या झेलम नदीच्या किनाऱ्यावर जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर वसलेली आहे. 2880 किलोमीटर लांबीच्या सिंधू नदीचा सर्वाधिक भाग हा पाकिस्तानातून जातो. त्यामुळे पाकिस्तानसाठी सिंधू नदीचे पाणी अतिशय महत्त्वाचे आहे. करार रद्द करण्यातल्या आडचणी या करारान्वये सतलज, व्यास आणि रावी नद्यांचं जास्तीत जास्त पाणी भारतासाठी ठेवण्यात आलं आहे. तर सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांच्या पाण्याचा मोठा हिस्सा पाकिस्तानला देण्यात आला आहे. त्यामुळे भारताने हा करार रद्द केल्यास पाकिस्तानातील जनता ताहनेने मरणासन्न होईल. पण हा करार रद्द करण्यामध्ये काही अडचणीही आहेत. कारण हा रद्द करायचा झाल्यास सिंधू नदीवरील धरणांमधील पाणी इतरत्र वळवण्यासाठी मोठ्याप्रमाणात कॅनल, किंवा बंधारे बांधावे लागतील. यामध्ये वेळ आणि पैसा खर्च होणार आहे. तसेच यातून भारताला नागरिकांचे विस्थापन आणि पर्यावरण आदी समस्यांचाही सामना करावा लागेल. चीनचा दबाव  विशेष म्हणजे, सिंधू नदीचा उगम हा चीनमधील तिबेटमध्ये होत असल्याने पाकिस्तानचे मित्र देश असलेल्या चीननेही तिच निती वापरल्यास भारताचा भाकरा नांगल धरणावरील कारचम वाटूंग हायड्रो प्रकल्प कोलडमोडू शकतो. या प्रकल्पातून 36 हजार मेगावॅट वीजेचे उत्पादन होऊन ही वीज हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान चंदीगढ राजस्थान आणि दिल्ली आदी राज्यांना हा वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे हा करार रद्द करण्यासाठी पंतप्रधानांसोमरचे मोठं आव्हान आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat On LGBTQ Marriage : समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget