एक्स्प्लोर

पाकची जिरवण्यासाठी पंतप्रधान मोदी आज मोठा निर्णय घेणार?

नवी दिल्ली: उरी हल्ल्यानंतर पाकला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतनं कंबर कसली आहे. पाकची खुमखुमी जिरवण्यासाठी 56 वर्षांपूर्वी झालेला सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्याच्या दृष्टीनं भारताच्या हालचाली सुरु आहेत. यासाठी आज दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी, जलसंधारणमंत्री उमा भारती आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक होणार आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने जी योजना आखली आहे, त्यावर आज दुपारच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले, तर पाकिस्तानची मोठी कोंडी होणार आहे. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केरळमधील आपल्या सभेत पाकिस्तानची खुमखुमी जिरवण्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याचं प्रयत्न सुरु असल्याचे सांगितलं होतं. यासाठी सिंधू नदीच्या प्रवाहाला ब्रेक लावूनच याची सुरुवात होऊ शकते. काय आहे करार? 1960 साली तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तान आणि पाकिस्तानचे तत्कालिन लष्करी हुकुमशाह आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांनी सिंधू नदीच्या पाणी वाटप करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार, सिंधू नदीला येऊन मिळणाऱ्या एकून पाच नद्यांपैकी सतलज, रावी आणि व्यास नदीवर भारताचा पूर्ण अधिकार देण्यात आला. तर पश्चिमेकडून वाहणाऱ्या चिनाब आणि झेलम या नद्यांच्या पाण्याचा वापर भारताकडून मर्यादित स्वरुपात होतो. सतलज नदीवर बांधण्यात आलेल्या भाकरा नांगल धरणावर एक वीज निर्मितीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून पंजाब आणि हिमचाल प्रदेशला वीजपुरवठा केला जातो. तर पश्चिमेकडून वाहणाऱ्या झेलम नदीच्या किनाऱ्यावर जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर वसलेली आहे. 2880 किलोमीटर लांबीच्या सिंधू नदीचा सर्वाधिक भाग हा पाकिस्तानातून जातो. त्यामुळे पाकिस्तानसाठी सिंधू नदीचे पाणी अतिशय महत्त्वाचे आहे. करार रद्द करण्यातल्या आडचणी या करारान्वये सतलज, व्यास आणि रावी नद्यांचं जास्तीत जास्त पाणी भारतासाठी ठेवण्यात आलं आहे. तर सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांच्या पाण्याचा मोठा हिस्सा पाकिस्तानला देण्यात आला आहे. त्यामुळे भारताने हा करार रद्द केल्यास पाकिस्तानातील जनता ताहनेने मरणासन्न होईल. पण हा करार रद्द करण्यामध्ये काही अडचणीही आहेत. कारण हा रद्द करायचा झाल्यास सिंधू नदीवरील धरणांमधील पाणी इतरत्र वळवण्यासाठी मोठ्याप्रमाणात कॅनल, किंवा बंधारे बांधावे लागतील. यामध्ये वेळ आणि पैसा खर्च होणार आहे. तसेच यातून भारताला नागरिकांचे विस्थापन आणि पर्यावरण आदी समस्यांचाही सामना करावा लागेल. चीनचा दबाव  विशेष म्हणजे, सिंधू नदीचा उगम हा चीनमधील तिबेटमध्ये होत असल्याने पाकिस्तानचे मित्र देश असलेल्या चीननेही तिच निती वापरल्यास भारताचा भाकरा नांगल धरणावरील कारचम वाटूंग हायड्रो प्रकल्प कोलडमोडू शकतो. या प्रकल्पातून 36 हजार मेगावॅट वीजेचे उत्पादन होऊन ही वीज हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान चंदीगढ राजस्थान आणि दिल्ली आदी राज्यांना हा वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे हा करार रद्द करण्यासाठी पंतप्रधानांसोमरचे मोठं आव्हान आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्यात गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होणार का? 
दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्यात गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होणार का? 
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय
शॉकिंग! रिल्सचा नाद केला, जीवावर बेतला; व्हिडिओ 'शूट' करताना बंदुकीतून सुटली गोळी, युवक जागेवरच ठार
शॉकिंग! रिल्सचा नाद केला, जीवावर बेतला; व्हिडिओ 'शूट' करताना बंदुकीतून सुटली गोळी, युवक जागेवरच ठार
TMC Candidate List : ममता बॅनर्जींचा धमाका, विधानसभेसाठी एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर
मोठी बातमी : ममता बॅनर्जींचा धमाका, एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर, नंदीग्राममधून स्वत: लढणार नाहीत!

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
Embed widget