एक्स्प्लोर

IndiavsChina | तब्बल 45 वर्षानंतर भारत चीन सीमेवर रक्त सांडलं, महिनाभरापासून धुमसत्या वादाचा स्फोट

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सरळसरळ भारतालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारं होतं. त्यांनी दावा केला की भारतीय सैन्यानं लाईन ऑफ अँक्च्युअल कंट्रोलचं उल्लंघन केलं. त्यामुळेच आम्ही प्रत्युत्तर दिलं.

नवी दिल्ली : चीनी ड्रॅगनच्या लष्करी साहसवादानं पुन्हा डोकं वर काढलंय. भारत आणि चीनमध्ये तब्बल पाच दशकानंतर हिंसक झटापट होऊन जवान शहीद होण्याची वेळ आलीय. ही घटना इतकी गंभीर आहे की याचे दीर्घकालीन परिणाम पुढचे काही दिवस जाणवू शकतात.

भारत आणि चीन सैनिकांमध्ये नेमकं काय घटलं?

गेल्या महिनाभरापासून भारत आणि चीनमध्ये जो सीमावाद धुमसत होता, त्याचा अखेर भडका उडाला. काल रात्री पूर्व लडाखमधल्या गॅलवान खोऱ्यात दोन्ही बाजूंमध्ये हिंसक झटापट झाली. त्यात भारतीय लष्कराच्या एका कमांडिंग ऑफिसरसह दोन जवान शहीद झाले आहेत. दोन्ही बाजूंनी गोळीबार मात्र झाला नाही, असं लष्कराकडून सांगितलं गेलं आहे.

भारत चीन सीमेवर अशी हिंसक झडप होऊन जवान मृत्यमुखी होण्याची घटना याआधी 1975 मध्ये घडली होती. म्हणजे तब्बल 45 वर्षानंतर पुन्हा भारत चीनची सीमा रक्तरंजित झालीय. त्यामुळे भारत आणि चीनमध्ये सगळं काही आलबेल नाही, तणाव वाढत चाललाय हेच यातून अधोरेखित होतंय. चीनचीही मनुष्यहानी झालीय की नाही हे भारतीय लष्कराच्या वक्तव्यातून स्पष्ट होत नव्हतं. पण चीनच्या ग्लोबल टाईम्स सरकारी मुखपत्रानेच ही बाब कबूल केलीय. चीनचेही काही जवान शहीद झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण आकडा किती हे मात्र गुलदस्त्यात आहे.

या सगळ्या घटनेनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचंही वक्तव्य आलं. पण ते सरळसरळ भारतालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारं होतं. त्यांनी दावा केला की भारतीय सैन्यानं लाईन ऑफ अँक्च्युअल कंट्रोलचं उल्लंघन केलं. त्यामुळेच आम्ही प्रत्युत्तर दिलं. पण भारताने मात्र हा दावा स्पष्टपणे फेटाळला. सीमा ओलांडली नसल्याचं भारताकडून सांगितलं गेलं आहे.

घटना रात्रीची असली तरी त्यावर सरकारी शिक्कामोर्तब आज सकाळी झालं. त्यानंतर राजधानी दिल्लीत वेगवान बैठकांचा सिलसिला सुरु होता. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आधी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत बैठक घेतली. तासाभराच्या चर्चेनंतर त्यांनी पंतप्रधान मोदींनाही ताज्या स्थितीची माहिती दिली. त्यामुळे आता पुढची स्थिती भारत कशी हाताळणार, नेमकी कशा पद्धतीची वक्तव्यं केली जाणार याची उत्सुकता आहे.

नेमका काय वाद आहे?

लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहचली. या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. पण एकमेकांच्या फिंगर एरियात अतिक्रमण केल्यानं वाद पेटला. याआधी भारत-चीनचे 250 जवान एकमेकांसमोर उभे ठाकले, दगडफेक आणि मारामारीत काही जण जखमीही झाले होते.
चीनचीच उत्पत्ती असलेल्या कोरोना संकटाशी सध्या भारतासह सारं जग झुंज देतंय. त्यात आता सीमेवरची डोकेदुखीही वाढलीय. एकाचवेळी आपल्या तीन शेजाऱ्यांसोबत आपली सीमेवरची भांडणं सुरु आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे, शिवाय दूतावासातल्या भारतीय अधिकाऱ्यांचाही छळ सुरु असल्यानं संबंध ताणले गेलेत. नेपाळनं तर आपल्या नकाशात बदल करुन काही भारतीय भाग आपले असल्याचा दावा केलाय..आणि आता तब्बल 45 वर्षांनी भारत चीनची सीमाही रक्तरंजित होताना दिसतेय. कोरोनासारखं प्राणघातक संकट असताना आपले सगळेच शेजारी अशांत असणं हे धोरणात्मकदृष्ट्या भारताला परवडणारं नाही.
India - China Border Dispute | चीनचेही काही जवान मारले गेले, ग्लोबल टाईम्सची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

NEET Re Exam: नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2026 | रविवार
सी-फूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती; अवघ्या पंचविशीतील 7 महिलांचा तडफडून मृत्यू; 65 हून अधिक जखमी, 9 जण व्हेंटिलेटरवर
सी-फूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती; अवघ्या पंचविशीतील 7 महिलांचा तडफडून मृत्यू; 65 हून अधिक जखमी, 9 जण व्हेंटिलेटरवर
Abhijeet Dipke: आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहोत तर अशी वागणूक, आम्ही काय आतंकवादी आहोत का? अभिजित दीपकेंचा संतप्त सवाल
आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहोत तर अशी वागणूक, आम्ही काय आतंकवादी आहोत का? अभिजित दीपकेंचा संतप्त सवाल

व्हिडीओ

Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BEST employees strike finally called off: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह प्रलंबित ग्रॅज्युईटी देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह प्रलंबित ग्रॅज्युईटी देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
Uddhav Thackeray: 'कोल्हापुरात उपटसुंभा येऊन गेला, पण त्याला माहीत नाही..' अमित शाहांच्या शिवसेना आता एकच वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'बुडाखाली खूर्ची आहे म्हणून...'
'कोल्हापुरात उपटसुंभा येऊन गेला, पण त्याला माहीत नाही..' अमित शाहांच्या शिवसेना आता एकच वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'बुडाखाली खूर्ची आहे म्हणून...'
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
Omraje Nimbalkar: 'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
'हे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं, आता राहिलाच कोणता राजीनामा?' मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख सोडण्यावरून खोचक टोला
'हे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं, आता राहिलाच कोणता राजीनामा?' मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख सोडण्यावरून खोचक टोला
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Bhaskar Jadhav: 'भास्करराव जाधव आजकाल..' थेट मिलिंद नार्वेकरांवर चिडलेला तो व्हिडिओ व्हायरल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टिप्पणी!
'भास्करराव जाधव आजकाल..' थेट मिलिंद नार्वेकरांवर चिडलेला तो व्हिडिओ व्हायरल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टिप्पणी!
NEET Re Exam: नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
Embed widget