एक्स्प्लोर

IndiavsChina | तब्बल 45 वर्षानंतर भारत चीन सीमेवर रक्त सांडलं, महिनाभरापासून धुमसत्या वादाचा स्फोट

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सरळसरळ भारतालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारं होतं. त्यांनी दावा केला की भारतीय सैन्यानं लाईन ऑफ अँक्च्युअल कंट्रोलचं उल्लंघन केलं. त्यामुळेच आम्ही प्रत्युत्तर दिलं.

नवी दिल्ली : चीनी ड्रॅगनच्या लष्करी साहसवादानं पुन्हा डोकं वर काढलंय. भारत आणि चीनमध्ये तब्बल पाच दशकानंतर हिंसक झटापट होऊन जवान शहीद होण्याची वेळ आलीय. ही घटना इतकी गंभीर आहे की याचे दीर्घकालीन परिणाम पुढचे काही दिवस जाणवू शकतात.

भारत आणि चीन सैनिकांमध्ये नेमकं काय घटलं?

गेल्या महिनाभरापासून भारत आणि चीनमध्ये जो सीमावाद धुमसत होता, त्याचा अखेर भडका उडाला. काल रात्री पूर्व लडाखमधल्या गॅलवान खोऱ्यात दोन्ही बाजूंमध्ये हिंसक झटापट झाली. त्यात भारतीय लष्कराच्या एका कमांडिंग ऑफिसरसह दोन जवान शहीद झाले आहेत. दोन्ही बाजूंनी गोळीबार मात्र झाला नाही, असं लष्कराकडून सांगितलं गेलं आहे.

भारत चीन सीमेवर अशी हिंसक झडप होऊन जवान मृत्यमुखी होण्याची घटना याआधी 1975 मध्ये घडली होती. म्हणजे तब्बल 45 वर्षानंतर पुन्हा भारत चीनची सीमा रक्तरंजित झालीय. त्यामुळे भारत आणि चीनमध्ये सगळं काही आलबेल नाही, तणाव वाढत चाललाय हेच यातून अधोरेखित होतंय. चीनचीही मनुष्यहानी झालीय की नाही हे भारतीय लष्कराच्या वक्तव्यातून स्पष्ट होत नव्हतं. पण चीनच्या ग्लोबल टाईम्स सरकारी मुखपत्रानेच ही बाब कबूल केलीय. चीनचेही काही जवान शहीद झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण आकडा किती हे मात्र गुलदस्त्यात आहे.

या सगळ्या घटनेनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचंही वक्तव्य आलं. पण ते सरळसरळ भारतालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारं होतं. त्यांनी दावा केला की भारतीय सैन्यानं लाईन ऑफ अँक्च्युअल कंट्रोलचं उल्लंघन केलं. त्यामुळेच आम्ही प्रत्युत्तर दिलं. पण भारताने मात्र हा दावा स्पष्टपणे फेटाळला. सीमा ओलांडली नसल्याचं भारताकडून सांगितलं गेलं आहे.

घटना रात्रीची असली तरी त्यावर सरकारी शिक्कामोर्तब आज सकाळी झालं. त्यानंतर राजधानी दिल्लीत वेगवान बैठकांचा सिलसिला सुरु होता. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आधी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत बैठक घेतली. तासाभराच्या चर्चेनंतर त्यांनी पंतप्रधान मोदींनाही ताज्या स्थितीची माहिती दिली. त्यामुळे आता पुढची स्थिती भारत कशी हाताळणार, नेमकी कशा पद्धतीची वक्तव्यं केली जाणार याची उत्सुकता आहे.

नेमका काय वाद आहे?

लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहचली. या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. पण एकमेकांच्या फिंगर एरियात अतिक्रमण केल्यानं वाद पेटला. याआधी भारत-चीनचे 250 जवान एकमेकांसमोर उभे ठाकले, दगडफेक आणि मारामारीत काही जण जखमीही झाले होते.
चीनचीच उत्पत्ती असलेल्या कोरोना संकटाशी सध्या भारतासह सारं जग झुंज देतंय. त्यात आता सीमेवरची डोकेदुखीही वाढलीय. एकाचवेळी आपल्या तीन शेजाऱ्यांसोबत आपली सीमेवरची भांडणं सुरु आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे, शिवाय दूतावासातल्या भारतीय अधिकाऱ्यांचाही छळ सुरु असल्यानं संबंध ताणले गेलेत. नेपाळनं तर आपल्या नकाशात बदल करुन काही भारतीय भाग आपले असल्याचा दावा केलाय..आणि आता तब्बल 45 वर्षांनी भारत चीनची सीमाही रक्तरंजित होताना दिसतेय. कोरोनासारखं प्राणघातक संकट असताना आपले सगळेच शेजारी अशांत असणं हे धोरणात्मकदृष्ट्या भारताला परवडणारं नाही.
India - China Border Dispute | चीनचेही काही जवान मारले गेले, ग्लोबल टाईम्सची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Nepal Flash Flood: नेपाळमध्ये 'जलप्रलय'! महापुरात महाराष्ट्रातील 80 नागरिक अडकल्याची माहिती; राज्य सरकारकडून हेल्प डेस्क कार्यरत
नेपाळमध्ये 'जलप्रलय'! महापुरात महाराष्ट्रातील 80 नागरिक अडकल्याची माहिती; राज्य सरकारकडून हेल्प डेस्क कार्यरत
Maharashtra Live News Updates: MPSC च्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटीप्रकरणी 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना बेड्या
Maharashtra Live News Updates: MPSC च्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटीप्रकरणी 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना बेड्या
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
Nepal Flash Flood: नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता; तब्बल दीडशे किमी दूर 33 मृतदेह सापडले; दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक कारण समोर
नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता; तब्बल दीडशे किमी दूर 33 मृतदेह सापडले; दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक कारण समोर

व्हिडीओ

Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mehboob Shaikh MPSC Exam: MPSC पेपरफुटीत आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात; शरद पवार गटाचे प्रवक्ते महेबूब शेख यांचा आरोप; भाजपकडूनही प्रत्युत्तर
MPSC पेपरफुटीत आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात; शरद पवार गटाचे प्रवक्ते महेबूब शेख यांचा आरोप; भाजपकडूनही प्रत्युत्तर
Vijay Wadettiwar On Supriya Sule OBC Certificate: राधाकृष्ण विखे पाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंनी सुद्धा काढून ठेवलं, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा आरोप
राधाकृष्ण विखे पाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंनी सुद्धा काढून ठेवलं, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा आरोप
Nashik Crime News: पत्नी अन् वडिलांना शेवटचा मेसेज केला; पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली, नाशिकमध्ये तरुणाचं टोकाचं पाऊल
पत्नी अन् वडिलांना शेवटचा मेसेज केला; पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली, नाशिकमध्ये तरुणाचं टोकाचं पाऊल
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
Nepal Flash Flood: नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता; तब्बल दीडशे किमी दूर 33 मृतदेह सापडले; दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक कारण समोर
नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता; तब्बल दीडशे किमी दूर 33 मृतदेह सापडले; दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक कारण समोर
Rule Change From 1st September: LPG गॅस सिलेंडर बुकिंगपासून ते एफडी अन् आयटीआरपर्यंत..; 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' पाच मोठे नियम, तुमच्या खिशावरही होईल परिणाम
LPG गॅस सिलेंडर बुकिंगपासून ते एफडी अन् आयटीआरपर्यंत..; 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' पाच मोठे नियम, तुमच्या खिशावरही होईल परिणाम
Jalgaon News: चिमुरडा झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला; आईनं घरात आल्यावर पाहिलं अन्..., जळगावमध्ये घडली हदयद्रावक घटना
चिमुरडा झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला; आईनं घरात आल्यावर पाहिलं अन्..., जळगावमध्ये घडली हदयद्रावक घटना
Nagpur Student Protest: नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...
नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...
Embed widget