एक्स्प्लोर

वर्षभरात भाज्यांचे भाव दुप्पट! एका किलोच्या किंमतीत आता पाव किलोच भाजी 

Vegetable Prices : कांदा, बटाटा आणि इतर बहुतांश भाज्यांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. वाढते इंधनदर हेच यामागे कारण असल्याचं सांगितलं जातंय. 

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरात भाज्यांचे दर हे बुलेट ट्रेनच्या वेगापेक्षा जास्त वेगाने वाढले आहेत असंच म्हणावं लागेल. याचा फटका शेतकरी, ग्राहक, भाजी विक्रेते, वाहतूकदार अशा सगळ्या घटकांवर होतो आहे. कारण भाजी महाग झाल्याने लोक कमी प्रमाणात भाजी खरेदी करत आहे. परिणामी मागणी, पुरवठा या सगळ्यावर परिणाम जाणवतो आहे. 

जर आपल्या खिसा आणि खर्च, याला जोडून जर सरकारी आकडेवारीवर नजर टाकली तर बहुतांश भाज्यांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. फक्त टोमॅटोबद्दल बोलायचे झाले तर, सध्या दिल्लीत 39 रुपये किलोने विकले जातो आहे, तर एक वर्षापूर्वी त्याची किंमत 15 रुपये होती. 

राजधानी वगळता इतर शहरांमध्ये टोमॅटो अनेक पटींनी महाग झाला आहे. मुंबईत टोमॅटोची किंमत 77 रुपये प्रति किलो आहे, जी गेल्या वर्षी 28 रुपये होती. कोलकात्यातही गेल्या वर्षी 38 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आता ७७ रुपयांवर पोहोचला आहे. रांचीमध्येही त्याची किंमत ५० रुपये किलो आहे, जी गेल्या वर्षी 20 रुपयांना विकला जात होता.

उत्पादन राज्यांकडून पुरवठ्यावर परिणाम
टोमॅटोचे भाव वाढण्याचे कारण म्हणजे त्याचा पुरवठा करणाऱ्या राज्यातून इतर ठिकाणी पुरवठा होतो आहे असं मंडईतील व्यापाऱ्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही टोमॅटो उत्पादनाची प्रमुख राज्ये आहेत. जिथून त्याच्या पुरवठ्यात अडथळे येतात. केवळ टोमॅटोच नाही तर इतर भाज्यांचे दरही प्रचंड वाढले आहेत.

गेल्या वर्षी दिल्लीत बटाट्याचा भाव 20 रुपये किलो होता, तो आता 22 रुपयांनी विकला जातो आहे. मुंबईत गतवर्षी 21 रुपये किलोने विकले जाणारे बटाटे आता 27 रुपयांनी विकले जात आहेत. कोलकात्यातही बटाटे गेल्या वर्षी 16 रुपयांवरून 27 रुपये किलो झाले आहेत. रांचीमध्येही त्याची किंमत एका वर्षात 17 ते 20 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे.

कांद्याच्या किंमतीतही घट
अनेकदा ग्राहकांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या कांद्याने शेतकऱ्यांच्या रडवलं आहे. दिल्लीत कांद्याचा भाव गेल्या वर्षी 28 रुपयांवरून 24 रुपयांवर आला आहे. मुंबईतही 25 रुपयांवरून 18 रुपयांवर, कोलकात्यात 27 रुपयांवरून 23 रुपयांवर आणि रांचीमध्ये 25 रुपयांवरून 18 रुपयांवर प्रतिकिलो कांदा विकला जात आहे. ही आकडेवारी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जाहीर केली आहे.

सर्वात मोठे कारण-  महाग तेल
भाज्यांच्या किमती वाढण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे महागडे इंधन आहे असं एमके ग्लोबल फायनान्स सर्व्हिसेसच्या चीफ इकॉनॉमिस्ट माधवी याचं म्हणणं आहे. डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे भाजीपाल्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली असून, त्यामुळे किरकोळ विक्रीच्या दरात वाढ झाली आहे. ऊर्जा क्षेत्रातील महागाई एप्रिलमध्ये 10.80 टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे, जी महिन्यापूर्वी 3.5 टक्‍क्‍यांवर होती. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या महागाईचा दरही 1.6 टक्क्यांवरून 8.4 टक्क्यांवर पोहोचला आहे.



दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम, पहिल्यांदा म्हणाले इराण युद्ध संपणार आणि लगेचच आखाती देशात 10 हजार जवान पाठवले
US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम, पहिल्यांदा म्हणाले इराण युद्ध संपणार आणि लगेचच आखाती देशात 10 हजार जवान पाठवले
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
20 लाख बॅरल तेल घेऊन इराणचं जहाज गुजरातमध्ये दाखल, मात्र भारताने तेल स्वीकारण्यास दिला नकार, नेमकं कारण काय? 
20 लाख बॅरल तेल घेऊन इराणचं जहाज गुजरातमध्ये दाखल, मात्र भारताने तेल स्वीकारण्यास दिला नकार, नेमकं कारण काय? 
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget