एक्स्प्लोर

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला राजकीय रंग, सुशांतचा मृत्यू बिहार निवडणुकीचा मोठा मुद्दा ठरणार

सुशांतच्या आत्महत्येची बातमी मिळताच सुशांतच्या घरी बिहारच्या बड्या राजकरण्यांनी भेट दिली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शोक व्यक्त केला तर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, आरजेडीचे तेजस्वी यादव हे शोक व्यक्त करण्यासाठी सुशांतच्या घरी पोहोचले.

मुंबई : बिहारचे बहुतेक सर्वच पक्ष, त्यांचे नेते सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत आहेत. सुशांतची खरंच हत्या झाली आहे का? किंवा सर्व आवाज फक्त आणि फक्त बिहार निवडणुकीच्या रणनीतीचा भाग आहे. सुशांत सिंह राजपूत बॉलिवूडचा अपकमिंग स्टार होता. त्याने आपल्या कष्ट आणि समर्पणाने बॉलिवूडमध्ये नाव कमावले होते. हिंदी चित्रपट जगतात शून्यापासून नायकापर्यंतचा प्रवास करणारा अभिनेता सुशांतसिंग राजपूतने वयाच्या 34 व्या वर्षी असा धक्का दिला, जो त्याच्या चाहत्यांमध्ये कायम राहील. मायानगरीच्या चमकदार जगामध्ये काम करत असताना देखील सुशांतचा बिहार संबंध खूप जवळचा होता. सुशांतच्या याच बिहार कनेक्शन, त्याचा स्टारडम आणि मृत्यूचा वापर ॲाक्टोबर- नोव्हेंबरमध्ये बिहार निवडणुकीत करण्याची तयारी राजकीय पक्षांनी केली आहे.

कुणी सुशांतचा राजपूत असल्याचा राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहे? तर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा आरोप करत सुशांतच्या मृत्यू ला मुद्दा बनवून बिहारी लोकांची सहानुभुती घेण्याचा प्रयत्न करत आहे. सुशांतची तरुण फॅन फॉलोविंगची खुप जास्त आहे. त्यामुळे या कठीण काळात सुशांतसोबत जो असेल त्यांच्या सोबत तरुणाई असेल हे बिहारमधील राजकीय नेत्यांनी कळतंय.

सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल

सुशांतच्या आत्महत्येची बातमी मिळताच सुशांतच्या घरी बिहारच्या बड्या राजकरण्यांनी भेट दिली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शोक व्यक्त केला तर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, आरजेडीचे तेजस्वी यादव हे शोक व्यक्त करण्यासाठी सुशांतच्या घरी पोहोचले, तर एलजेपी नेते चिराग पासवान यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोषींना लवकर अटक करण्याची मागणी केली.

चिराग पासवान यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून सुशांत सिंहच्या आत्महत्येप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. संपूर्ण प्रकरणाची संक्षिप्त माहिती त्यांना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं की या प्रकरणाचा तपास पोलीस लवकरात लवकर पूर्ण करतील आणि जर कोणी दोषी असेल तर त्यांना सोडलं जाणार नाही.

चिरागबरोबरच बिहारचे विरोधी पक्षनेते आरजेडी युवा नेते तेजस्वी यादव यांनीही सुशांतच्या कुटुंबाची भेट घेतली आणि बिहारच्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पत्र लिहून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. जनअधिकार पक्षाचे नेते पप्पू यादव किंवा बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी सभा यांनी या विषयाची माहिती देण्यासाठी कुटुंबीयांची भेट घेतली. भाजपा नेत्यांनी अगदी काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यात बिहारमधील राजपूत मुलाच्या हत्येला आत्महत्या म्हणून संबोधण्याचा कट रचण्यात आला, असेही म्हणायला सुरुवात केली. बिहारमधील अनेक खासदार, आमदारांनी सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सुरु केली.

वास्तविक सुशांत सिंह राजपूतचा बिहारच्या राजकारणाशीही विशेष संबंध होता. सुशांतसिंग राजपूत बिहार सहरसा इथले भाजपचे आमदार नीरजकुमार बबलू यांचा चुलत भाऊ होता. त्यांची वहिनी नूतन सिंह एलजेपीच्या बिहार विधानपरिषदेच्या सदस्या आहेत. असंही म्हणतात की सुशांतला स्वतःही राजकारणात जाण्याची इच्छा होती.

सुशांतचा आमदार भाऊ यांनी माहिती दिली की त्याचं कुटुंब सरकारी अधिकारी, राजकारण आणि व्यवसायात आहेत. गेल्या वर्षी सुशांत बिहारमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आला होता. त्याने मला सांगितले की या वर्षाच्या अखेरीस राज्यात तो मोठ्या प्रमाणात काम करायला सुरूवात करणार आहे.

बिहारमध्ये जातीय राजकारणाचं बर्‍यापैकी वर्चस्व आहे. म्हणूनच केवळ कुटुंब आणि राजकारण्यांकडून सीबीआय चौकशी करण्याची मागणी होत नाही, तर करणी सेना ही आता सुशांतच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीसाठी पुढे आले आहे. करणी सेना राज्यातील राजपुतांचे प्रतिनिधित्व करते, ज्या समाजातला सुशांत सिंह होता.

सुशांतचा मृत्यू आत्महत्या आहे की खून? सर्वच राजकीय पक्ष सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. बिहारमधील राजकरण्यांना मुंबई पोलिसांच्या चौकशीवर विश्वास नाही, पण पोलिस खरोखरच राजकीय दबावाखाली तपास करत आहेत का? राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन सीबीआय चौकशी करण्याची मागणी होत आहे. या प्रश्नांची उत्तर भविष्यात योग्य वेळी मिळतील. पण यावेळी बिहार निवडणुकीत सुशांत हा एक मोठा मुद्दा असणार हे मात्र निश्चित.

संबंधित बातम्या
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
Rahul Gandhi on West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले...
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले...
Who is Kalita Maji : दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणारी महिला थेट आमदार बनली, विधानसभेत पोहोचली!
दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणारी महिला थेट आमदार बनली, विधानसभेत पोहोचली!

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
Embed widget