एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

दहशतवाद्यांचे मनोबल वाढवण्याचं काम करू नका : सामना

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'ने भोपाळ चकमकीतील पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. मात्र, सुरक्षाव्यवस्था भेदून दहशतवादी तुरुंगातून पसार कसे होतात, असा सवालही 'सामना'तून विचारला गेला आहे. 'भोपाळातील फटाके' या लेखातून सुरक्षाव्यवस्थेवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. भोपाळातील चकमककांडावर नेहमीप्रमाणे प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात असले तरी जे मारले गेले ते सर्वच जण बॉम्ब बनविण्यात तरबेज होते. तुरुंग फोडून पळून जाण्यामागे त्यांचे भयंकर कारस्थान कशावरून नसेल, असा सवाल विचारण्यात आला आहे. भोपाळातील फटाके ''दिवाळी असली तरी मुंबईत फटाक्यांना बंदी आहे. फटाके वाजत नसल्याने दिवाळीचा मामला थंड पडला. पण मध्य प्रदेशात भोपाळ येथे जोरदार फटाके वाजले व संपूर्ण देशात त्या फटाक्यांचा आवाज घुमला आहे. कदाचित भोपाळमधील फटाक्यांचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटू शकतात. भोपाळच्या सेंट्रल जेलमधून ‘सिमी’चे आठ अतिरेकी पळून गेले. त्या सर्व अतिरेक्यांना आता गोळ्या घालून यमसदनी पाठविण्याचे शौर्य पोलिसांनी गाजवले आहे. भोपाळच्या रस्त्यांवर आठ अतिरेक्यांचे मुडदे छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत व आपल्याच देशातील काही लोक त्या मुडद्यांसाठी ‘मातम’ करीत आहेत. ‘पोलिसांनी काय हे क्रौर्य केले? पोलिसांनी काय हे अमानुष व निर्घृण काम केले?’ असे वक्तव्य करून दहशतवाद्यांचे मनोबल वाढविण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. अर्थात भोपाळात जे घडले त्यास दुसरी बाजू आहे. ‘सिमी’चे आठ अतिरेकी सेंट्रल जेलमधून पळून जातात हे सरकारसाठी लांच्छनास्पदच होते. राष्ट्रीय सुरक्षेचा हा खेळखंडोबाच आहे. त्याचे समर्थन कोणी करू नये. भारतीय जनता पक्षाचे राज्य येऊनही प्रभू श्रीरामांचा वनवास संपला नाही. अयोध्येत राममंदिर उभारणीबाबत राजकीय टोलवाटोलवी सुरू आहे. राम आजही वनवासातच असला तरी देशाची सुरक्षा व्यवस्था मात्र रामभरोसे आहे हे भोपाळच्या ‘तुरुंग’फोडीनंतर उघड झाले. दिवाळीच्या धामधुमीचा फायदा घेत तुरुंगातून पळून जाण्याचा कट ‘सिमी’च्या आठ भयंकर अतिरेक्यांनी रचला व त्यात ते यशस्वी झाले. रामशंकर या तुरुंग रक्षकाची गळा चिरून हत्या केली. चादरीचा दोरासारखा वापर करून भिंतीवरूनच उड्या मारून सिमीचे हे अतिरेकी पसार झाले, पण भोपाळपासून जवळच पोलिसांनी त्यांना घेरले व ठार केले. प्रश्‍न इतकाच आहे की, अतिरेकी चकमकीत मारले गेले म्हणून सरकारचे कौतुक करायचे, की तुरुंग फोडून अतिरेकी पळून गेले म्हणून सरकारला जोडे हाणायचे? हिंदी सिनेमात असे प्रसंग नेहमीच पाहायला मिळतात. तुरुंगाचे लोखंडी गज वाकवून किंवा उंच भिंतीवरून पलीकडे उडी मारून खलनायक फरारी होतो. पण हे असे फक्त हिंदी सिनेमांतच घडू शकेल. प्रत्यक्षात हे शक्य नाही, असे सांगून आपणच आपले समाधान करून घेत असतो. पण फक्त सिनेमातच नाही तर प्रत्यक्षात हे असले प्रकार घडू शकतात हे भोपाळच्या घटनेने दाखवून दिले. हे आठही दहशतवादी ‘सिमी’चे आहेत व त्यांचे कारनामे राष्ट्रद्रोही आहेत. त्यामुळे त्यांना तुरुंगात इतकी मोकळीक कोणी मिळवून दिली? मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे सुशासन अनेक वर्षांपासून आहे व मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी तर विजयाची हॅटट्रिकच केली आहे. त्यामुळे भोपाळ तुरुंगातून आठ दहशतवादी पळाले याचे खापर काँग्रेसवर फोडता येणार नाही व राहुल गांधी यांना राज्य कारभाराचे ज्ञान नाही अशी पुडी कुणाला सोडता येणार नाही. आठ दहशवाद्यांनी पलायन केल्यावर सर्वत्र ‘हाय अ‍ॅलर्ट’चा इशारा देण्यात आला होता. हा मोठाच विनोद आहे. हे आठ अतिरेकी पळून जाऊन काय करतील व त्यांचे मनसुबे काय असतील, हे सांगण्याची गरज नव्हती. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून ते हिंदुस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेला सुरुंग लावतील व त्यासाठीच त्यांनी पलायन केले. हा मोठा कट असावा. बाहेरून त्यांना मदत झाली आहे व याबाबत माहिती मिळवण्यात आपली सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर विभाग कुचकामी ठरला आहे. भोपाळ तुरुंगात अनागोंदी होती व भिंती कमकुवत असल्याचे आता उघड झाले आहे हेसुद्धा गंभीरच आहे. भोपाळातील चकमककांडावर नेहमीप्रमाणे प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात असले तरी जे मारले गेले ते सर्वच जण बॉम्ब बनविण्यात तरबेज होते. तुरुंग फोडून पळून जाण्यामागे त्यांचे भयंकर कारस्थान कशावरून नसेल? इशरत जहां प्रकरणाची पुनरावृत्ती भोपाळच्या रस्त्यांवर झाली. चकमक खरी की खोटी, यावर तोंडाची डबडी वाजवणार्‍या निधर्मीवाद्यांना शेवटी इतकेच सांगायचे आहे की, भोपाळची चकमक खरी असेल तर पोलिसांना हजार सलाम आणि दिग्विजय सिंहांसारखे लोक म्हणतात त्याप्रमाणे, चमकम ‘बनावट’ असली तरी देशाविरुद्ध कट रचणारे व बॉम्ब बनवणारे लोक मारले गेले आहेत हे विसरू नये व पोलिसांना बदनाम करू नये!''
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Banerjee : सत्तेसोबत आमदारकीही गेली, ममता बॅनर्जींचा भवानीपुरातून मोठा पराभव, पश्चिम बंगालमध्ये उलटफेर
सत्तेसोबत आमदारकीही गेली, ममता बॅनर्जींचा भवानीपुरातून मोठा पराभव, पश्चिम बंगालमध्ये उलटफेर
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! जूनच्या सुरुवातीलाच मान्सून केरळात धडकणार, नेमका कसा राहणार मान्सूनचा प्रवास?
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! जूनच्या सुरुवातीलाच मान्सून केरळात धडकणार, नेमका कसा राहणार मान्सूनचा प्रवास?
West Bengal Assam Election Results 2026 Live Updates : पश्चिम बंगालमध्ये भाजपचं द्विशतक, गाठला दोनशेचा टप्पा; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर जय श्रीरामाची घोषणाबाजी
West Bengal Live Updates: पश्चिम बंगालमध्ये भाजपचं द्विशतक, गाठला दोनशेचा टप्पा; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर जय श्रीरामाची घोषणाबाजी

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत
सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत
विजयने ड्रायव्हरच्या मुलाला दिलं विधानसभेचं तिकीट; पठ्ठ्या जिंकला, मोठ्या मताधिक्याने आमदार बनला
विजयने ड्रायव्हरच्या मुलाला दिलं विधानसभेचं तिकीट; पठ्ठ्या जिंकला, मोठ्या मताधिक्याने आमदार बनला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मे 2026 | सोमवार
Embed widget