एक्स्प्लोर

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचं जगाने मान्य केलंय : राजनाथ सिंह

भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सर्वाधिक वेगाने वाढत असल्याचं जगानेही मान्य केलं आहे, असं प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं

नवी दिल्ली : मंदीच्या काळात नोटबंदी म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं असल्याचा घणाघात भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हांनी केला. मात्र भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सर्वाधिक वेगाने वाढत असल्याचं जगानेही मान्य केलं आहे, असं प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं वास्तव जगाने मान्य केलं आहे. हे सत्य कुणीही विसरु नये. आर्थिक बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविषयी विश्वासार्हता निर्माण झाली आहे, असा दावाही राजनाथ सिंह यांनी केला. सिन्हा यांनी नेमकी काय टीका केली आहे? “पंतप्रधान दावा करतात की, त्यांनी अत्यंत जवळून गरिबी पाहिली आहे. त्याचवेळी, देशातील प्रत्येक नागरिकाने गरिबी जवळून पाहावी, यासाठी त्यांचेच अर्थमंत्री दिवस-रात्र मेहनत करतायेत.”, अशी जळजळीत टीका यशवंत सिन्हा यांनी अरुण जेटलींवर केली आहे. शिवाय, “अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेची जी अवस्था करुन ठेवलीय, त्यावर मी आता बोललो नाही, तर ते माझ्या देशाप्रती असलेल्या कर्तव्याशी धोका केल्यासारखं होईल. मला माहिती आहे, मी जे बोलतोय त्याच्याशी भाजपचे अनेक लोक सहमत होतील. मात्र भीतीमुळे ते बोलत नाहीत.”, असेही यशवंत सिन्हा यांनी लेखात म्हटलं आहे. यशवंत सिन्हा यांनी पुढे म्हटलंय की, “खासगी गुंतवणुकीत जितकी घसरण झालीय, तितकी गेल्या दोन दशकात झाली नाही. औद्योगिक उत्पन्नाची स्थिती बिकट आहे, कृषी क्षेत्रातही समस्या वाढल्यात, रोजगार उपलब्ध करणारे उद्योगधंदेही संकटात आहेत. नोटाबंदी पूर्णपणे अयशस्वी झाली आहे. त्याचवेळी, जीएसटी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भयावह स्थिती आहे. लाखो लोक बेरोजगार होत आहेत.” विकास दरातील घसरणीबाबतही यशवंत सिन्हांनी नाराजी व्यक्त करत अरुण जेटलींवर निशाणा साधला आहे. “पहिल्या तिमाहीत विकास दर घसरुन 5.7 टक्के झाला. गेल्या तीन वर्षातील ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यात सरकारचे प्रवक्ते म्हणतात, नोटाबंदीमुळे मंदी आली नाही. त्यांचं बरोबर आहे. कारण मंदीची सुरुवात आधीच झाली होती. नोटाबंदीने केवळ आगीत तेल ओतण्याचं काम केलं गेलं आहे.”, असेही यशवंत सिन्हा यांनी लेखात म्हटले आहे. अर्थमंत्र्यांवर इतकी तिखट टीका करणारे यशवंत सिन्हा कोण आहेत? यशवंत सिन्हा हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये सिन्हा हे अर्थमंत्री होते. ते माजी आयएएस अधिकारी आहेत.  यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा हे मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत.

संबंधित बातमी : मंदीत नोटाबंदी म्हणजे आगीत तेल : यशवंत सिन्हा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतात किती दिवसांचा पेट्रोल गॅसचा साठा शिल्लक? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनीच केला खुलासा
कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतात किती दिवसांचा पेट्रोल गॅसचा साठा शिल्लक? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनीच केला खुलासा
Maharashtra Live Blog Updates: निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर पालिकेकडून अखेर
Maharashtra Live Blog Updates: निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर पालिकेकडून अखेर
PM Narendra Modi: पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; स्वतःचा ताफा केला कमी, SPG लाही दिले महत्त्वाचे आदेश
पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; स्वतःचा ताफा केला कमी, SPG लाही दिले महत्त्वाचे आदेश
मोदींनी सोनं खरेदी करू नका सांगितलं, आता केंद्र सरकारची सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात जबर वाढ; गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे?
मोदींनी सोनं खरेदी करू नका सांगितलं, आता केंद्र सरकारची सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात जबर वाढ; गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतात किती दिवसांचा पेट्रोल गॅसचा साठा शिल्लक? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनीच केला खुलासा
कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतात किती दिवसांचा पेट्रोल गॅसचा साठा शिल्लक? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनीच केला खुलासा
मोदींनी सोनं खरेदी करू नका सांगितलं, आता केंद्र सरकारची सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात जबर वाढ; गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे?
मोदींनी सोनं खरेदी करू नका सांगितलं, आता केंद्र सरकारची सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात जबर वाढ; गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे?
अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावाच्या अकाली निधनाने कुटुंबात सन्नाटा; मृत्यूचा कारणाचा अजूनही उलघडा नाही, सपा प्रमुख स्वत: पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले
अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावाच्या अकाली निधनाने कुटुंबात सन्नाटा; मृत्यूचा कारणाचा अजूनही उलघडा नाही, सपा प्रमुख स्वत: पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले
Thane Crime News: आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
RCB vs KKR Live Update IPL 2026 : 16 गुणांचा जादुई आकडा समोर, विराटच्या टीमसमोर KKRची शेवटची लढाई; आज हरलं तर सर्व संपलं
RCB vs KKR Live Update : 16 गुणांचा जादुई आकडा समोर, विराटच्या टीमसमोर KKRची शेवटची लढाई; आज हरलं तर सर्व संपलं
Gold-Silver Rate Today : 5-10 हजार नव्हे...PM मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या दरात एका दिवसांत सर्वाधिक वाढ; सराफा बाजारात खळबळ, चांदीही 30 हजारांनी महाग
5-10 हजार नव्हे...PM मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या दरात एका दिवसांत सर्वाधिक वाढ; सराफा बाजारात खळबळ, चांदीही 30 हजारांनी महाग
IND vs AFG Test : IPL फायनलनंतर फक्त 6 दिवस... BCCIसमोर संकटांचा डोंगर! अफगाणिस्तान कसोटीसाठी कोण उतरणार मैदानात?
IPL फायनलनंतर फक्त 6 दिवस... BCCIसमोर संकटांचा डोंगर! अफगाणिस्तान कसोटीसाठी कोण उतरणार मैदानात?
Pydhonie Deaths: डोकाडिया कुटुंबातील व्यक्तींच्या यकृत अन् मूत्रपिंडाचा हिरवट रंग; 'हिस्टोपॅथॉलॉजी' अहवालात धक्कादायक खुलासा; अवयवांचा हिरवट रंग विषबाधेचे संकेत, रिपोर्ट समोर
डोकाडिया कुटुंबातील व्यक्तींच्या यकृत अन् मूत्रपिंडाचा हिरवट रंग; 'हिस्टोपॅथॉलॉजी' अहवालात धक्कादायक खुलासा; अवयवांचा हिरवट रंग विषबाधेचे संकेत, रिपोर्ट समोर
Embed widget