एक्स्प्लोर

गोध्रा हत्याकांड ही एक अकल्पनीय शोकांतिका, 2002 च्या गुजरात दंगलीवर नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी? 

PM Narendra Modi : गोध्रा हत्याकांडांची (Godhra Hatyakanda) घटना ही अकल्पनीय शोकांतिका असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांनी व्यक्त केले.

PM Narendra Modi : गोध्रा हत्याकांडांची (Godhra Hatyakanda) घटना ही अकल्पनीय शोकांतिका असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांनी व्यक्त केले. त्यावेळी केंद्रात विरोधी पक्षाचे सरकार होते. त्यांनी खोट्या खटल्यांमध्ये आम्हाला शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांचे प्रयत्न असूनही न्यायव्यवस्थेने संपूर्ण घटनेचे तपशीलवार विश्लेषण केले तसेच आरोपींना शिक्षा झाली असल्याचे मोदी म्हणाले. 

2002 च्या दंगलीपूर्वीच्या घटना जाणून घेणं महत्त्वाचं

2002 च्या दंगलीबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दंगलीपूर्वीच्या घटना जाणून घेणे महत्त्वाचं आहे. 24 डिसेंबर 1999 रोजी काठमांडू ते दिल्लीला जाणारे विमान अपहरण करून कंदहारला नेण्यात आले. 2000 मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर दहशतवादी हल्ला झाला होता. ऑक्टोबर 2001 मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेवर दहशतवादी हल्ला झाला होता. 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर हल्ला झाला होता, असे मोदी म्हणाले. हे जागतिक स्तरावरील दहशतवादी हल्ले होते, ज्याने जागतिक अस्थिरतेची ठिणगी पेटवल्याचे मोदी म्हणाले.

 2002 पूर्वी गुजरातमध्ये 250 हून अधिक मोठ्या दंगली 

या सर्व घटना घडत असताना मी 7 ऑक्टोबर 2001 रोजी मी गुजरातचा मुख्यमंत्री होणार होतो. 24 फेब्रुवारी 2002 ला मी पहिल्यांदा आमदार झालो. माझे सरकार 27 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार होते, तेव्हा आम्हाला गोध्रा रेल्वे दुर्घटनेची माहिती मिळाली. ही अत्यंत गंभीर घटना होती. लोकांना जिवंत जाळण्यात आले होते. आधीच्या सगळ्या घटनांनंतर परिस्थिती कशी असेल याची तुम्ही कल्पना करु शकता. 2002 पूर्वी गुजरातमध्ये 250 हून अधिक मोठ्या दंगली झाल्या होत्या असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

2002 नंतर गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाही : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1969 ची दंगल 6 महिने चालली होती. त्यावेळी विरोधी पक्ष सत्तेत होता आणि त्यांनी आमच्यावरच्या या खोट्या केसेसमध्ये आम्हाला शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना न जुमानता न्यायव्यवस्थेने संपूर्ण घटनेचे तपशीलवार विश्लेषण केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आरोपींना शिक्षा झाली आहे. 2002 पूर्वी गुजरातमध्ये सातत्याने दंगली होत होत्या, मात्र 2002 नंतर कोणतीही मोठी घटना घडली नाही असे पंतप्रधान म्हणाले. 

गुजरातमधील गोध्रा हत्याकांड प्रकरण नेमकं काय?

गुजरातमधील गोध्रा स्टेशनवर 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या S-6 या बोगीला आग लावण्यात आली होती. अयोध्येहून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या. साबरमती ट्रेनच्या S-6 या बोगीला आग लावल्याप्रकरणी एसआयटीच्या विशेष न्यायालयाने ३१ जणांना दोषी ठरवलं होतं, तर 63 जणांना निर्दोष मुक्त केलं. आरोपींपैकी 11 जणांना फाशी, तर 22 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कोर्टाच्या या निर्णयाला गुजरात हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. आरोपींना दिलेली शिक्षा कमी आहे, निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी गुजरात सरकारने केली होती. तर आपल्याला अजून न्याय मिळाला नसल्याचं आरोपींनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Raut: नरेंद्र मोदी जाताना देशाचे तुकडे करतील, भारताचा प्रवास 'हिंदू पाकिस्तान'च्या दिशेने; संजय राऊतांची खरमरीत टीका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
Devendra Fadnavis Maharashtra Jobs: दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
Devendra Fadnavis Maharashtra Jobs: दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
BMC Election 2026 Mumbai Mayor: मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, दिल्लीतून महत्त्वाची अपडेट
मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, दिल्लीतून महत्त्वाची अपडेट
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Embed widget