एक्स्प्लोर

देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचली, पंतप्रधान मोदींचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचली असल्याचा दावा केला आहे. आपल्या ट्विटमधून मोदींनी मणिपूरमधलं लेईसांग गाव वीज पोहोचलेलं देशातील शेवटचं गाव असल्याची म्हटलं आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचली असल्याचा दावा केला आहे. आपल्या ट्विटमधून मोदींनी मणिपूरमधलं लेईसांग गाव वीज पोहोचलेलं देशातील शेवटचं गाव असल्याची म्हटलं आहे. मे 2018 मध्ये ज्यावेळी मोदी सरकार सत्तेत आलं त्यावेळी देशातील 18 हजार 452 गावांमध्ये वीज नव्हती. त्यावेळी मोदी सरकारने दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना जाहीर केली होती. याच योजनेअंतर्गत सर्व गावांमध्ये वीज पोहोचल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे. आता देशातील शेवटचे गावदेखील प्रकाशमान झाले आहे. 28 एप्रिल 2018 हा देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. भाजपप्रणीत एनडीए सरकारनं दिलेलं सर्वात मोठं वचन पूर्ण केलंय. असे मोदी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे. https://twitter.com/narendramodi/status/990455176581517312 सरकारी आकडेवारीनुसार देशातील 1236 गावं अशी आहेत, जिथे कुणीही राहात नसूनही त्याठिकाणी वीज पोहोचली आहे. तर चराईसाठी आरक्षित असणाऱ्या 35 गावांचाही यात समावेश आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या या दाव्यावर आता सर्वच स्तरातून शंका उपस्थित केली जात आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार गावातील 10 टक्के घरं, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी वीज पोहोचली असेल तर ते गाव इलेक्ट्रिफाईड झालं असं मानण्यात येतं. मात्र याचा अर्थ असा नाही की संपूर्ण गावात वीज आली. त्यामुळे 100 टक्के गावांमध्ये वीज पोहोचली असली तरीही देशात पूर्णपणे वीजजोडणी झाली असं म्हणता येणार नाही. पंतप्रधान मोदींच्या दाव्यानंतरही देशातील अनेक घरांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही. त्यामुळेच सरकारने मार्च 2019 पर्यंत चार कोटी ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबांना वीज पुरवण्याची योजना बनवत आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींना याचं श्रेय देताना केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयलांनी 'नासा'चे जुने फोटो ट्वीट केले आहेत. https://twitter.com/PiyushGoyal/status/990480079506608133

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke CJP : एकीकडे सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे, दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अजूनही आंदोलनावर ठाम
एकीकडे सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे, दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अजूनही आंदोलनावर ठाम
Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
Sonam Wangchuk Ended Hunger Strike: मोठी बातमी: 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
मोठी बातमी: 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Sonam Wangchuk Protest Marathi News मोठी बातमी: सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!
सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget