एक्स्प्लोर

देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचली, पंतप्रधान मोदींचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचली असल्याचा दावा केला आहे. आपल्या ट्विटमधून मोदींनी मणिपूरमधलं लेईसांग गाव वीज पोहोचलेलं देशातील शेवटचं गाव असल्याची म्हटलं आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचली असल्याचा दावा केला आहे. आपल्या ट्विटमधून मोदींनी मणिपूरमधलं लेईसांग गाव वीज पोहोचलेलं देशातील शेवटचं गाव असल्याची म्हटलं आहे. मे 2018 मध्ये ज्यावेळी मोदी सरकार सत्तेत आलं त्यावेळी देशातील 18 हजार 452 गावांमध्ये वीज नव्हती. त्यावेळी मोदी सरकारने दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना जाहीर केली होती. याच योजनेअंतर्गत सर्व गावांमध्ये वीज पोहोचल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे. आता देशातील शेवटचे गावदेखील प्रकाशमान झाले आहे. 28 एप्रिल 2018 हा देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. भाजपप्रणीत एनडीए सरकारनं दिलेलं सर्वात मोठं वचन पूर्ण केलंय. असे मोदी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे. https://twitter.com/narendramodi/status/990455176581517312 सरकारी आकडेवारीनुसार देशातील 1236 गावं अशी आहेत, जिथे कुणीही राहात नसूनही त्याठिकाणी वीज पोहोचली आहे. तर चराईसाठी आरक्षित असणाऱ्या 35 गावांचाही यात समावेश आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या या दाव्यावर आता सर्वच स्तरातून शंका उपस्थित केली जात आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार गावातील 10 टक्के घरं, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी वीज पोहोचली असेल तर ते गाव इलेक्ट्रिफाईड झालं असं मानण्यात येतं. मात्र याचा अर्थ असा नाही की संपूर्ण गावात वीज आली. त्यामुळे 100 टक्के गावांमध्ये वीज पोहोचली असली तरीही देशात पूर्णपणे वीजजोडणी झाली असं म्हणता येणार नाही. पंतप्रधान मोदींच्या दाव्यानंतरही देशातील अनेक घरांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही. त्यामुळेच सरकारने मार्च 2019 पर्यंत चार कोटी ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबांना वीज पुरवण्याची योजना बनवत आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींना याचं श्रेय देताना केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयलांनी 'नासा'चे जुने फोटो ट्वीट केले आहेत. https://twitter.com/PiyushGoyal/status/990480079506608133
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Embed widget