एक्स्प्लोर

120 शहरात हजारो जणांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या महाठगास अटक

मोठमोठ्या कमिशनचं आमिष दाखवून हजारो जणांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या महाठगास राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने अटक केली आहे.

नवी दिल्ली : मोठमोठ्या कमिशनचं आमिष दाखवून हजारो जणांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या महाठगास राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने अटक केली आहे. या महाठगाने पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाणा, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह अनेक राज्यातील मोठ्या शहरातील हजारो जणांना कोट्यवधींचा गंडा घातला होता. राजस्थानच्या एसओजीने या प्रकरणी पिनकॉन कंपनीचा चेअरमन मनोरंजन रॉय आणि त्याचा आणखी एक साथीदार विनय सिंहला बंगळुरुमधून अटक केली. अधिक माहितीनुसार, रॉयची कपंनी पश्चिम बंगालमध्ये वाइन पुरवण्याचं काम करत होती. रॉयच्या कंपनीने देशभरातील 120 शहरांमध्ये आपल्या शाखा सुरु केल्या होत्या. ज्या माध्यमातून तो हजारो जणांना मोठमोठ्या कमिशनची आमिष दाखवून गंडा घातला. एसओजी राजस्थानचे आयजी दिनेश एमएन यांनी दावा केला कि, या महाठगाने फक्त राजस्थानमधीलच 25 हजार जणांना कोट्यवधींचा चुना लावला. या सर्वांनकडून त्याने तब्बल 56 कोटी रुपये उकळले होते. रॉयच्या कंपन्यांच्या राजस्थानमध्ये 11 शाखा होत्या. या सर्व शाखांना एसओजीने टाळं ठोकलं आहे. तसेच तिथून मिळालेली सर्व कागदपत्रं जप्त केली आहेत. मनोरंजन रॉयच्या अटकेनंतर त्याला एसओजीच्या कोर्टात हजर केलं होतं. कोर्टानं या दोघांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. अधिक माहितीनुसार, जयपूरमधील एका व्यक्तीला काही दिवसांपूर्वी फोनद्वारे मोठमोठ्या स्कीमचं आमिष दाखवलं. हा व्यक्ती रॉयच्या टोळीच्या संपर्कात आल्यानंतर, त्यांनी त्याला कोट्यवधीच्या कमिशनचं अमिषं दाखवत, त्याच्याकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करुन घेतली. त्याला काही दिवसांनंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, त्याने एसओजीकडे तक्रार दाखल केली. पीडित व्यक्तीच्या तक्रारीनुसार, रॉयच्या कंपनीने त्याला चार वर्षात दुप्पट कमिशनचं आमिश दाखवलं होतं.  तसेच गुंतवणुकीवर 14 टक्के व्याज मिळेल, असंही सांगितलं होतं. विशेष म्हणजे, आपली कंपनी सेबीकडे रजिस्टर असल्याचंही सांगितलं होतं. पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर एसओजीच्या टीमने उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यात छापे टाकून महाठगांच्या या टोळीतील इतर साथीदारांना अटक केली. या व्यक्तींनी पिनकॉन कंपनीच्या नावाखाली देशभरातील विविध शहरातील हजारो जणांकडून कोट्यावधीची गुंतवणूक करुन घेतली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget