एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: भारताचं युद्धाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल, शस्त्रसंधी करार रद्द करणार आणि पाकिस्तानला थेट भिडणार?

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत सर्जिकल स्ट्राईक करणार, अशी भीती पाकिस्तानला आहे.

Pahalgam Attack: काश्मीरच्या पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा बळी गेल्यानंतर दिल्लीत सरकारी स्तरावर वेगवान घडामोडी सुरु आहेत. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन पर्यटकांचा जीव घेतला होता. हा गेल्या काही वर्षांमधील मोठा दहशतवादी हल्ला आहे. निष्पाप भारतीयांचे बळी गेल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पहलगाम दहशतवादी हल्ला (Pahalgam Attack) करणाऱ्यांना आणि यामागील सूत्रधारांना आम्ही सोडणार नाही, अशा इशारा दिला होता. आम्ही त्यांच्या कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर शिक्षा त्यांना देऊ. या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी त्यांना शोधून आम्ही शिक्षा करु, असे मोदींनी म्हटले होते. तत्पूर्वी भारताने 1960 साली पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जल करार (Indus Water Treaty) रद्द करुन पाकिस्तानला मोठा धक्का दिला होता. यानंतर आता मोदी सरकार आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकारकडून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील असलेली शस्त्रसंधी (Ceasefire) रद्द करण्यासंदर्भात विचार सुरु आहे. मोदी सरकारचे हे पाऊल युद्धाच्या जवळ जाणारे ठरु शकते. त्यामुळे आता दिल्लीत नेमका काय निर्णय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

सीएनएन- न्यूज 18च्या वृत्तानुसार, सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, भारताकडून शस्त्रसंधी हटवण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरु आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानने सीमारेषेलगतच्या भागात हल्ला न करण्याचे वचन पाळलेले नाही. त्यामुळे आता भारताकडून शस्त्रसंधी हटवून उघड उघड शत्रूशी दोन हात करण्याचा विचार सुरु असल्याचे समजते. शस्त्रसंधी रद्द झाल्यास पाकिस्तानी लष्करावरील दबाव वाढू शकतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फेब्रुवारी 2021 मध्ये शस्त्रसंधी करार झाला होता. मात्र, तेव्हापासून पाकिस्तानात मूळ असलेल्या लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि लहानसहान दहशतवादी संघटनांकडून काश्मीरमध्ये घुसखोरी होत आहे. पाकिस्तानी लष्कराकडूनही अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे हा शस्त्रसंधी करारच रद्द करुन उघडपणे पाकिस्तानशी दोन हात करण्याची योजना भारत सरकारच्या मनात घोळत असल्याची माहिती आहे.

सर्वपक्षीय बैठकी काय घडलं?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत गुरुवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, संरक्षणमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी सविस्तर तपशील पुरवला. तसेच केंद्र सरकारने यानंतर घेतलेल्या निर्णयांबद्दलही सर्वपक्षीय नेत्यांना सांगण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ला अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. त्यामुळे आता भारतीय सरकार याविरोधात कठोर पावले उचलेल, असे सर्वपक्षीय बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी म्हटले की, सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. केंद्र सरकार जे काही पाऊल उचलेल, त्याला विरोधी पक्षाचा पाठिंबा असेल,  असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. 

आणखी वाचा

काऊंटडाऊन सुरू! फक्त 7 दिवसात भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करणार? पाकच्या माजी उच्चायुक्तांची भीती

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 30 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, अभिषेक- वैभव सलामीची जोडी होऊ शकत नाही, मोहम्मद कैफ संतापला 
संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, टीम इंडियाच्या प्लॅनिंगवर मोहम्मद कैफ संतापला
Embed widget