एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack : काऊंटडाऊन सुरू! फक्त 7 दिवसात भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करणार? पाकच्या माजी उच्चायुक्तांची भीती

Pahalgam Terror Attack : भारताने या आधी उरी आणि पुलवामा हल्ल्यावेळी मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्यामुळे यावेळीही पाकिस्तानवर कारवाई होईल असं त्या देशाच्या माजी उच्चायुक्तांनी म्हटलं आहे. 

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आता कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असून तीनही सैन्यदलांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या आधी भारताने पाच मोठे निर्णय घेतल्याने पाकिस्तानची (Pakistan) धाकधूक वाढली आहे. आता पाकिस्तानच्या माजी उच्चायुक्तांच्या एका वक्तव्याने त्या देशाच्या चिंतेत अधिक भर पडल्याचं दिसतंय. पुढच्या सात दिवसांमध्ये भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करणार असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित अली (Abdul Basit Ali) यांनी केलं. 

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये (Jammu Kashmir Terrorist Attack) 26 पर्यटक मारले गेले. हा हल्ला करणारे दहशतवादी हे पाकिस्तानमध्ये परत गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. 

काय म्हणाले पाकिस्तानेच माजी उच्चायुक्त? 

कायदा आणि सुव्यवस्थेच्या अस्थिरतेसाठी पाकिस्तानने तयार राहावे असा इशारा पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित अली यांनी दिला. ते म्हणाले की, पहलगाममध्ये  झालेल्या हल्ल्यानंतर काही दिवसांतच भारत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करू शकतो. 

या आधीच्या 2016 च्या उरी हल्ल्यानंतर आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवायांचाही अब्दुल बासित अली यांनी उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील भाषणाचा संदर्भ देत ते म्हणाले की, "सीमेपलीकडून कधीही हल्ले होऊ शकतात. त्यानंतर भारत दावा करेल की त्यांनी लॉन्च पॅड आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. ते एका आठवड्यात घडेल किंवा येत्या 15 दिवसात घडेल." 

सिंधू पाणी वाटप करार (Indus Water Treaty) रद्द करण्याबाबत सध्या कोणतीही राजनयिक अडचण नाही असं सांगत अब्दुल बासित अली म्हणाले की, "सिंधू जल करार एकतर्फी संपुष्टात आणता येणार नाही. हा करार निलंबित केला जाऊ शकत नाही किंवा त्यात सुधारणा करता येणार नाही."

पाकिस्तानने जागतिक बँकेशी संपर्क साधावा

अब्दुल बासित अली यांनी पाकिस्तान सरकारने सिंधू जल कराराचा मध्यस्थ आणि हमीदार असलेल्या जागतिक बँकेशी संपर्क साधावा आणि जोरदार मुत्सद्दी प्रतिसाद तयार करावा असे आवाहन केले आहे. भारतावर आरोप करताना ते म्हणाले, "भारत आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांचे पालन करत नाही. ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थान मिळवण्याच्या त्यांच्या आकांक्षांसाठी मोठी गोष्ट आहे."

 

Input By : Kashmir Terror Attack,Jammu & Kashmir, Pahalgam, Pahalgam Attack, Pahalgam Terror Attack, Pakistan

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
दिल्ली पेलेट गन हल्ला प्रकरण! राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, अखेर पोलिसांकडून FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरु 
दिल्ली पेलेट गन हल्ला प्रकरण! राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, अखेर पोलिसांकडून FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरु 

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget