एक्स्प्लोर

कारगिल युद्धावेळी मुशर्रफ-शरीफ थोडक्यात बचावले!

कारगिल युद्धावेळी नवाज शरीफ आणि परवेझ मुशर्रफ यांच्यावर बॉम्ब पडला असता. अशी माहिती माजी एअर मार्शल ए.के.सिंह यांनी दिली.

नवी दिल्ली: कारगिल युद्धावेळी रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ हे थोडक्यात बचावले. कारण भारतीय वायूदलाचं विमान पाकिस्तानच्या ज्या लष्करी तळावर बॉम्बहल्ला करण्यासाठी निघालं होतं. तिथेच शरीफ आणि मुशर्रफ हे उपस्थित होते. ऐनवेळी माजी एअर मार्शल ए.के.सिंह यांनी बॉम्बहल्ला न करण्याचे आदेश त्यावेळी दिले होते. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. तत्कालीन वाजपेयी सरकारनं वायूसेनेला एलओसी पार न करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यामुळे हा आदेश लक्षात घेऊनच ए. के. सिंह यांनी बॉम्बहल्ला थांबवला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 24 जून 1999 रोजी भारतीय वायूसेनेच्या एका लढाऊ विमानानं एलओसीपासून जवळच असणाऱ्या पाकच्या एका लष्करी तळावर हल्ला करण्यासाठी अटॅक सिस्टम लॉक केली होती. पण त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या लढाऊ विमानातील त्यावेळचे वरिष्ठ पायलट ए. के. सिंह यांनी हल्ला न करण्याचा रेडिओ मेसेज हल्ल्याच्या तयारीत असलेल्या लढाऊ विमानाला दिला. 'पण त्यानंतर काही वर्षांनी ही माहिती आम्हाला समजली की, पाकिस्तानच्या या लष्करी तळावर पंतप्रधान नवाज शरीफ आणि लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ हे उपस्थित होते. कारगिल युद्धावेळी ते आपल्या सैनिकांना संबोधित करण्यासाठी तिथे आले होते.' अशी माहिती ए. के. सिंह यांनी दिली. एबीपी न्यूजनं त्यावेळचे वरिष्ठ पायलट ए. के. सिंह यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी याबाबत बरीच माहिती दिली. 'सरकारनं स्पष्ट शब्दात आम्हाला सांगितलं होतं की, वायूसेनेनं एलओसी पार करु नये.' एअर मार्शल ए. के. सिंह एअर मार्शल ए. के. सिंह काय घडलं नेमकं त्यावेळी? एबीपी न्यूजशी बातचीत करताना ए. के. सिंह यांनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली. “रात्री आणि दिवसाही बॉम्बिंग सुरुच होतं. पण त्या लष्करी तळावर नवाज शरीफ किंवा मुशर्रफ हे येणार आहेत याबाबत आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नव्हती. त्यावेळी मश्को व्हॅलीजवळ बॉम्बहल्ला करण्यासाठी आमचं विमान सज्ज होतं. त्यासाठी ट्रॅकिंग सुरु होतं. त्यावेळी आम्हाला ट्रॅकिंग सिस्टिमवर एक लष्करी कॅम्प असल्याचं दिसलं. आम्ही बॉर्डर ओलांडू नये असे आदेश देण्यात आले होते.” “सकाळची वेळ असूनही तळावर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सैनिक आम्हाला दिसले. त्यामुळे मला जरा संशय आला. सकाळच्या वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात सैनिक जमा होणं ही पाकिस्तानची चूक असू शकते. असं मला वाटलं. म्हणून मी माझ्या बाजूच्या विमानातील पायलटला तात्काळ हल्ला थांबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर आम्ही त्यांच्या तळाच्या बाजूनं एक फेरी मारली आणि हल्ला न करता माघारी फिरलो.” अशी माहिती ए. के. सिंह यांनी दिली. दरम्यान, एअर मार्शल ए. के. सिंह यांनी हे देखील स्पष्ट केलं की, जर आम्हाला माहिती मिळाली असती की, शरीफ आणि मुशर्रफ हे तिथे उपस्थित होते तरी देखील आम्ही हल्ला केला नसता. कारण, भारताची तशी कधीही वृत्ती नाही. ए. के. सिंह हे 2007 साली एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ या पदावरुन निवृत्त झाले.

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget