एक्स्प्लोर

Bihar Election Results 2020 | निकालानंतर एनडीएच्या विजयाचं श्रेय मोदींना तर नितीश कुमार चर्चेतून गायब!

बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच दिलं जात आहे. तर नितीश कुमार चर्चेतून पूर्णत: बाहेर आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकूनही नितीश कुमार हरले का असा प्रश्न विचारला जात आहे.

पाटणा : 'मोदी से कोई बैर नहीं, नितीश तेरी खैर नहीं...' निवडणूक प्रचारात हा नारा दिला होता लोक जनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांनी आणि बिहारच्या जनतेने तो खरा करुन दाखवला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार जरी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असले तरी निकालानंतर विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच दिलं जात आहे. तर नितीश कुमार चर्चेतून पूर्णत: बाहेर आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकूनही नितीश कुमार हरले का असा प्रश्न विचारला जात आहे. जर मागील 15 वर्षांचा विचार केला तर नितीश कुमार यांची ही सर्वात वाईट कामगिरी आहे.

2005 च्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षाला 55 जागांवर विजय मिळाला होता. कोणालाही सत्ता स्थापन करण्यात यश आल्याने ऑक्टोबर 2005 मध्ये पुन्हा निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत जेडीयूला 88 जागांवर जबरदस्त विजय मिळाला होता. त्यावेळी जागांच्या बाबतीत नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष राज्यात पहिल्या क्रमांकावर होता. 2010 च्या निवडणुकीत जेडीयूच्या जागांमध्ये वाढ होऊन 115 झाली. मागील म्हणजेच 2015 च्या निवडणुकीत नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राजदशी हातमिळवणी केली आणि 71 जागावर ताबा मिळवला. परंतु यंदा जेडीयूला 50 जागाही मिळवता आल्या नाहीत.

जर स्ट्राईक रेटबाबत बोलायचं झालं तर 2010 च्या निवडणुकीत जेडीयूने 141 जागा लढवल्या होत्या. म्हणजे 82 टक्के जागांवर ताबा मिळवला होता. 2015 मध्ये नितीश कुमार यांनी 101 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते, त्यापैकी 71 जागांवर यश मिळालं होतं. त्यांच्या यशाचा दर 70 टक्के होता. पण यंदा 115 जागांवर लढणाऱ्या जेडीयूला 43 जागांवर समाधान मानावं लागलं. म्हणजेच विजयाचा दर घसरुन केवळ 37 टक्के झाला आहे.

बिहार निवडणूक निकालाच्या विश्लेषणावरुन स्पष्ट होतं की नितीश कुमार यांच्या सरकारविरोधात लाट होती, भाजपविरोधात नाही. याच कारणामुळे 2015 च्या तुलनेत भाजपला 21 जागांचा फायदा झाला आहे. तर जेडीयूला 28 जागांचं नुकसान झालं आहे.

नितीश यांच्याविरोधात लाट असल्याचा अंदाज भाजपला आधीच आला होता. त्यामुळे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापर्यंत भाजपच्या पोस्टरवरुन नितीश कुमार गायब होते. एकीकडे तेजस्वी यादव यांचं 10 लाख नोकऱ्यांचं आश्वासन काल्पनिक असल्याचं नितीश कुमार सांगत होते, बिहारमध्ये उद्योग नसल्याचा दावा करत होते, त्याचवेळी भाजपने 19 लाख नोकऱ्या, मोफत कोरोना चाचणी यांसारखी आश्वासनं देऊन निवडणुकीचा हवा बदलली. भाजपच्या प्रचारात पंतप्रधान मोदींची एन्ट्री ही ट्रम्प कार्ड सिद्ध झाली.

नितीश कुमार यांना सर्वाधिक नुकसान चिराग पासवान यांनी पोहोचवलं. चिराग यांच्या पक्षाला एकाच जागेवर विजय मिळाला असला तरी एलजेपीच्या उमेदवारांमुळे जेडीयूच्या सुमारे डझनभर उमेदवारांना पराभूत व्हावं लागलं. नितीश कुमार यांनाही या निकालाचा अंदाजा आला असावा, त्यामुळेच की काय शांत स्वभावाचे समजले जाणारे नितीश कुमार सभेत मात्र आक्रमक दिसले.

नितीश कुमार चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतीलही पण यावेळी सरकार चालवणं त्यांच्यासाठी काटेरी मुकुट परिधान करण्यासारखंच असेल. कारण विरोधक आणि मित्रपक्षीही त्यांच्यापेक्षा ताकदवान आहे.

संबंधित बातम्या

2015 च्या तुलनेत बिहारमध्ये भाजपची भरारी, जदयू, काँग्रेसला मोठा फटका, तेजस्वी लहर कायम Tejashwi Yadav: तेजस्वी यादव एकटे लढले असते तर...!
ults 2020 | बिहारमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
LPG Gas Crisis: मोठी बातमी : राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
PM Modi: पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
The Indian Navy new stealth warship Taragiri: भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget