सर्वात कळीच्या मुद्द्याला सुप्रीम कोर्टाने हात घातला, नबाम रेबिया खटल्याचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार!
शिवसेना आणि पाठोपाठ राष्ट्रवादीच्या बाबतीत जे घडलं त्या पार्श्वभूमीवर देशाच्या भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असेल.

नवी दिल्ली : आमदार अपात्रता प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात (Maharashtra Political crisis) सर्वात कळीचा मुद्दा ठरलेल्या नबाम रेबिया (Nabam Rebia case) केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट (Supreme Court) तयार झालं आहे. उद्या म्हणजे 12 ऑक्टोबरला सात न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर या प्रकरणाला सुरुवात होणार आहे.
ठाकरे गटाने तेव्हा हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या बेंचकडे जावे ही विनंती केली होती. केवळ एका अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसने विधानसभा अध्यक्षांचे अपात्रतेबाबतचे अधिकार बाध्य होतात की नाहीत याचा फैसला. शिवसेना आणि पाठोपाठ राष्ट्रवादीच्या बाबतीत जे घडलं त्या पार्श्वभूमीवर देशाच्या भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असेल.
नबाम रेबियाचा निकाल आमदार या केसमध्ये इतका महत्वाचा आहे का?
अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिल्यानंतर उपाध्यक्ष झिरवाळ यांना 16 आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार आहे की नाही याचं उत्तर या नबाम रेबियाच्या निकालात दडलेलं आहे.
उद्धव ठाकरेंना फायदा होणार नाही
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने 2016 मधील नबाम रेबिया प्रकरणाचा निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवला गेला आहे हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी सुनावणी करताना घटनापीठाने गुणवत्तेवर निर्णय घेऊ असे सांगत मागणी फेटाळून लावली होती. मात्र आता पाच महिन्यानंतर उद्या म्हणजे 12 ऑक्टोबरला सात न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर या प्रकरणाला सुरुवात होणार आहे. या प्रकरणाला सुरूवात होणार असली तरी याचा फायदा उद्धव ठाकरेंना होणार नाही. सात न्यायाधीशांपुढे प्रकरण असणार आणि त्याची रूप रेषा उद्या ठरणार आहे. आगामी काळात असे प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून या केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट (Supreme Court) तयार झालं आहे.
काय आहे नबाम रेबिया केस?
2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं अरुणाचल प्रदेशच्या सत्तासंघर्षासंदर्भातील मोठा निर्णय देताना अरुणाचल प्रदेशचे बरखास्त केलेले मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पुन्हा स्थापन करण्याचे आदेश दिले होते. काँग्रेसच्या 14 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेला स्थगिती देणारा गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं त्यावेळी कायम ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयानं राज्यपाल ज्योती प्रसाद राजखोवा यांचा विधानसभा अधिवेशन जानेवारी 2016 ऐवजी डिसेंबर 2015 मध्ये बोलावण्याचा निर्णय रद्द केला होता. सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांनी दिलेला निर्णय चुकीचा ठरवला होता.
2016 मध्ये, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी राज्यपालांना 14 जानेवारी 2016 रोजी विधानसभेचं अधिवेशन बोलावण्यास सांगितलं, परंतु त्यांनी एक महिना आधी 16 डिसेंबर 2015 रोजी अधिवेशन बोलावलं होतं. त्यामुळे घटनात्मक संकट निर्माण झालं होतं. त्यावेळी तुकी यांनी विधानसभेच्या इमारतीला कुलूप लावलं होतं. राज्यपालांच्या या निर्णयाला विधानसभा अध्यक्ष रेबिया यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
