Rahul Gandhi : महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
नवी दिल्लीत राहुल गांधी यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर प्रहार करत पारदर्शक पद्धतीने डेटा सादर करण्याची मागणी केली.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान 2024 मध्ये 32 लाख मतदार जोडले गेले. तथापि, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (महाविकास आघाडी) विजयी झालेल्या आणि विधानसभा निवडणुकांमधील 5 महिन्यांच्या कालावधीत 39 लाख मतदार जोडले गेले. प्रश्न असा आहे की, हे 39 लाख मतदार कोण आहेत? ते हिमाचल प्रदेशच्या एकूण मतदारांच्या संख्येइतके आहे. दुसरा मुद्दा असा आहे की, महाराष्ट्रात राज्यातील एकूण मतदार लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार का आहेत? महाराष्ट्रात अचानक मतदार का निर्माण झाले आहेत? निवडणूक आयोगाने या प्रश्नांची उत्तरे मागूनही दिलेली नाहीत, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
#WATCH | Delhi | Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "We have been saying to the election commission that we are finding anomalies. We need the voter list - names and addresses of the voters of Maharashtra. We need the voter list of the Lok Sabha election. We need… pic.twitter.com/5waNJGIhb2
— ANI (@ANI) February 7, 2025
नवी दिल्लीत राहुल गांधी यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर प्रहार करत पारदर्शक पद्धतीने डेटा सादर करण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची मतदारयादी देण्याची मागणी आयोगाकडे केली आहे.
#WATCH | Delhi | Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "...In 5 years between the Vidhan Sabha elections in 2019 and Lok Sabha, 2024 - 32 lakh voters were added. However, in period of 5 months between Lok Sabha 2024 which these parties (Congress, NCP-SCP, Shiv Sena… pic.twitter.com/ixM1aU2J7O
— ANI (@ANI) February 7, 2025
राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाले आहेत.पंतप्रधानांनी निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत बदलली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यात मतदार का वाढले? 5 वर्षात 44 लाख असताना पाच महिन्यात 39 लाख कसे आले? मतदारयादीत अनेक अनियमितता झाल्या आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फोटोसह मतदारयादी द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
#WATCH | Delhi | Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "We represent on this table - the entire opposition that fought the last election in Maharashtra. We are going to bring some information about the election. We studied the details - the voters and the voting list.… pic.twitter.com/OeDR2NeKT1
— ANI (@ANI) February 7, 2025
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
