एक्स्प्लोर

किसान क्रांती यात्रा आंदोलन रात्री उशिरा मागे

किसान घाटावर पोहोचताच फुलं वाहून किसान युनियनने आंदोलन संपल्याचे जाहीर केले.

नवी दिल्ली: प्रचंड राडेबाजीनंतर दिल्लीकडे निघालेल्या किसान क्रांती यात्रेचं आंदोलन काल मंगळवारी रात्री उशिरा संपवण्यात आलं.  गाझीपूर सीमेवर डेरा टाकून बसलेल्या हजारो शेतकऱ्यांना, दिल्ली पोलिसांनी काही अटींवर चौधरी चरण सिंह यांच्या समाधीस्थळी जाण्यास परवानगी दिली. शांततेने कोणतीही हिंसा न करता शेतकऱ्यांनी समाधीस्थळावरुन परत जावं अशी अट पोलिसांनी घातली, ती शेतकऱ्यांनी मान्य केली. अखेर मंगळवारी रात्री सुमारे 12.30 वाजता पोलिसांनी बॅरिकेट्स बाजूला केले आणि शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यास परवानगी दिली. पोलिसांच्या परवानगीनंतर शेकडो ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसह हजारो शेतकरी राजघाटावरील चौधरी चरण सिंह समाधीस्थळी पोहोचले. किसान घाटावर पोहोचताच फुलं वाहून किसान युनियनने आंदोलन संपल्याचे जाहीर केले. किसान क्रांती यात्रा 23 सप्टेंबरला हरिद्वार येथून किसान घाटाच्या दिशेनं निघाली होती. मात्र पोलिसांनी दिल्लीच्या सीमेवरच शेतकऱ्यांना अडवून आधी पाण्याचे फवारे, मग अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि त्यानंतर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. या सर्व प्रकारानंतर शेतकऱ्यांना आक्रमक पवित्रा घेतला. मात्र आपलं आंदोलन किसान घाटपर्यंतच असल्याने, आंदोलक किसान घाटावर पोहोचल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.  स्पेशल रिपोर्ट: गांधी जयंतीला दिल्लीत 'हिंसेचे प्रयोग'   यावेळी हे सरकार शेतकरी विरोधी असून त्यांनी आमची कोणतीच मागणी मान्य केलेली नाही. तरीही, आम्ही हे आंदोलन मागे घेत असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं. दरम्यान,  काल सकाळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये हिंसक संघर्ष दिसून आला. शेतकऱ्यांना दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर रोखण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. दिल्ली, पंजाब, उत्तराखंडमधल्या हजारो शेतकऱ्यांची ही किसान यात्रा 23 सप्टेंबरला हरिद्वारपासून सुरु झाली होती. ही यात्रा दिल्लीत पोहोचणार म्हटल्यावर पोलिसांनी दिल्लीच्या सगळ्या सीमा बंद केल्या. जणू आंदोलनकर्त्यांना दिल्लीत पाऊल ठेवू द्यायचं नाही हा सरकारचा इरादा. दिल्लीच्या सीमेवर जवान आणि किसान आमने-सामने  गेल्या दहा दिवसांपासून ही किसान यात्रा सुरु होती. ती दिल्लीत धडकेपर्यंत सरकार गाफील राहिलं. पण हे वादळ दिल्लीच्या वेशीवर आल्यानंतर मात्र हालचाल सुरु झाली. दहा दिवसानंतर आंदोलनाच्या प्रतिनिधींना पहिल्यांदा चर्चेचं बोलावणं आलं. कृषीमंत्री राधामोहन सिंह तर कालही दिल्लीतून गायबच होते, मग गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर हा तोडगा सोडवण्याची जबाबदारी आली. 30 वर्षांपूर्वी म्हणजे 1989 मध्ये टिकैत यांनी हजारो शेतक-यांसमवेत संसदेवर धडक देऊन दिल्ली हादरवून सोडली होती. शेतकरी आपल्या जनावरांसह दिल्लीत दाखल झाले होते.  आज 30 वर्षानंतर त्यांचा मोठा मुलगा आणि भारतीय किसान युनियनचा अध्यक्ष नरेंद्रसिंह टिकैत या आंदोलनाचं नेतृत्व करत होते. शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार कृषिमालाला भाव मिळावा
  • शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा
  • किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज मिळावं
  • देशभरातील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा
  • 14 दिवसात ऊसाचा हमीभाव निश्चित करा
  • एनसीआर क्षेत्रात दहा वर्ष जुन्या ट्रॅक्टरवरील बंदी मागे घ्यावी
  • व्यावसायिक वापरासाठीच्या साखरेला किमान 40 रुपये किलो भाव द्या
संबंधित बातम्या  स्पेशल रिपोर्ट: गांधी जयंतीला दिल्लीत 'हिंसेचे प्रयोग'   दिल्लीच्या सीमेवर जवान आणि किसान आमने-सामने 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
Ajit Pawar NCP in BMC Election: अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
BMC Election: इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!

व्हिडीओ

Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
Sambhajinagar Angry Candidate : तिकीट नाकरलं, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा संभाजीनगरमध्ये तुफान राडा
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
Ajit Pawar NCP in BMC Election: अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
BMC Election: इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
Maharashtra Mahnagarpalika Election 2026: शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला!
PMC Election 2026 : पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
BMC Election : मुंबईत प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले, प्रविण दरेकरांचा भाऊ रिंगणात
आमदार प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले
Embed widget