एक्स्प्लोर

Kargil Victory Day : कारगिल विजय दिनाचा उत्साह, ऐतिहासिक दिनाला 23 वर्षे पूर्ण

Kargil Victory Day : कारगिल विजय दिनानिमित्त देशात 24 ते 26 जुलै दरम्यान 'कारगिल विजय दिवस उत्सव' (Victory Day Celebration) उत्सव साजरा करण्यात येत आहे.

Victory Day of Kargil : कारगिल युद्धाला (Kargil War) 23 वर्षे पूर्ण होत आहेत. कारगिल आणि द्रास सेक्टरमध्ये युद्ध झालेल्या ठिकाणी पुन्हा एकदा देशभक्तीपर वातावरण पाहायला मिळत आहे. कारगिल विजय दिनानिमित्त देशात 24 ते 26 जुलै दरम्यान 'कारगिल विजय दिवस उत्सव' (Victory Day Celebration) उत्सव साजरा करण्यात येत आहे. देशभरातून लोकांचा ओढा कारगिलकडे वळत आहे. या विजय दिनानिमित्त ज्या जवानांनी प्राणाची बाजी लावली अशा जवाना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक कारगिल आणि द्रास सेक्टरमध्ये पोहोचत आहेत. श्रीनगरमधील 126 किमी दूर बर्फाळ वाळवंटात लडाख येथे द्रास सेक्टरमध्ये कारगिल युद्ध स्मारक आहे. तेथे देशभक्तीपर वातावरण आहे.

कारगिल युद्धात 700 हून अधिक भारतीय सैनिकांचं बलिदान

भारताला कारगिल युद्धात विजय मिळाल्याच्या ऐतिहासिक घटनेला 26 जुलै रोजी 23 वर्षे पूर्ण होत आहेत. कारगिल युद्धात 700 हून अधिक भारतीय सैनिकांनी प्राणाची बाजी लावत पाकिस्तानी सैन्याला नमवत भारताला विजय मिळवून दिला. कारगिल विजय दिनानिमित्त पुन्हा एकदा आपण युद्धात सहभागी सैनिक आणि अधिकारी यांच्या बलिदानाचं स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

उत्सव सुरु होण्याआधीच पर्यदकांची गर्दी
कारगिल विजय दिनाला 26 जुलै 23 वर्षे पूर्ण होणार असून सैन्याकडून यानिमित्त जोरदार उत्सवाची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पर्यटक श्रीनगरमध्ये पोहोचू लागले आहेत. कारगिल स्मारकाला भेट देत पर्यटक शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. नागरिक आणि सैन्य दलाच्या जवानांमध्ये आजही शत्रूला थोपवण्यासाठी तोच जोश आणि उत्साह कायम आहे.

लष्कराचे वरिष्ठ अधिकारी राहणार उपस्थित
कारगिल आणि द्रास येथे लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार असून यावेळी कारगिल युद्धाला 22 वर्षे पूर्ण होत असून देशाच्या स्वातंत्र्यालाही सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण होत असल्याने मोठा सोहळा पार पडणार आहे. यासाठी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कारगिल युद्धाला दोन दशकांहून अधिक काळ लोटला असेल, पण आजही देश ते युद्ध विसरू शकलेला नाही. कारगिल विजय दिवस साजरा करण्यामागे विश्वास आहे की, देश शहीदांचे बलिदान आणि शत्रूला अद्याप विसरलेला नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM: 13 May 2024: ABP MajhaAmol Kolhe Shirur Lok Sabha :आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर, इतका बडगा कशासाठी?, कोल्हेंचा सवालABP Majha Headlines : 01 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSaleel Kulkarni : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सलील कुलकर्णींनं लेकासोबत बजावला मतदानाचा हक्क : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Devendra Fadnavis: फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Embed widget