Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, दीड ते 2 मिनिट चर्चा; आझाद मैदानावर काय झालं बोलणं?
शिवसेना नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानातील उपोषणस्थळी भेट देऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

मुंबई : राज्यातील मराठा आंदोलकांनी मुंबईत (Mumbai) धडक दिली असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू झाले आहे. या उपोषणाला महाविकास आघाडीतील अनेक नेते, आमदार, खासदार भेट देऊन आपली भूमिका मांडत आहेत. शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी काल आणि आजही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट देत त्यांच्यासमवेत चर्चा केली. विशेष म्हणजे आजच्या भेटीत शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी फोनवर बोलणंही करुन दिलं. विशेष म्हणजे दीड ते 2 मिनिटे मनोज जरांगे पाटील यांचं उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) फोनवर बोलणं झालं आहे. त्यामुळे, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, काय बोलणं झालं याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मात्र, मराठा आंदोलकांच्या मुंबई राहण्यासाठी आणि सोयी-सुविधेबाबत चर्चा झाल्याचे समजते.
शिवसेना नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानातील उपोषणस्थळी भेट देऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षण आणि मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांच्या सुविधेबाबत चर्चा झाली. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधत, त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि उद्धव ठाकरेंचं फोनवर बोलणही करुन दिलं. त्यामुळे, या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, आरक्षण लढ्यासंदर्भात आणि मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे मला माहिती नाही, ते मनोज जरांगे पाटीलच सांगू शकतील. मी आझाद मैदानावर असताना मला उद्धव ठाकरेंचा फोन आला, त्यामुळे मी दोघांचे बोलणे करून दिले, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली.
शिवसैनिकांना सूचना, आंदोलकांना मदत करा
उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा बांधवांसाठी मदत करण्याचा आवाहन केलं आहे. सरकार मराठा बांधवांना सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलं आहे, त्यामुळे शिवसैनिकांना आवाहन करत या मराठा बांधवांना पाणी, अन्न, स्वच्छालय अशा सुविधा पुरविणाच्या सूचना केल्या आहेत. मराठी बांधव हा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मुंबईत एकवटला आहे आणि आरक्षणासाठी संघर्ष करत आहे, त्यामुळे या मराठा बांधवांना पूर्णपणे सहकार्य शिवसैनिकांनी मुंबईत करावं, अशा सूचनाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; एकनाथ शिंदेंनी मार्ग काढला, गृहमंत्री सहकुटुंब गुजरातला रवाना
























