एक्स्प्लोर

Jagdeep Dhankar Resignation : जगदीप धनखड यांचा राजीनामा, उपराष्ट्रपतींची निवड कशी होते? निवडणूक झाल्यास मतदान कोण करतं? 

Jagdeep Dhankar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. या राजीनाम्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींची निवड कधी होणार याकडे लक्ष लागलं आहे?

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी काल प्रकृती आणि वैद्यकीय कारणांचा हवाला देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यामुळं आता भारतीय संविधानाच्या कलम 68 नुसार नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सुरु होईल. उपराष्ट्रपतींची निवड प्रक्रिया कशी होते ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जगदीप धनखड यांनी ऑगस्ट 2022 मध्ये व्यंकय्या नायडू यांच्यानंतर उपराष्ट्रपती पद स्वीकारलं होतं. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देणारे जगदीप धनखड हे तिसरे उपराष्ट्रपती ठरले आहेत. 

उपराष्ट्रपती पदाची निवड प्रक्रिया कशी होते?

संविधानाच्या कलम 68 नुसार उपराष्ट्रपती पद निवडीची प्रक्रिया आहे. कलम 68 (1) नुसार उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ संपंत आला अशेल तर त्यापूर्वी नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.  दुसरी तरतदू अशी आहे जर उपराष्ट्रपती पद मृत्यू, राजीनामा, पदावरुन हटवलं गेल्यानं रिक्त झाल्यास नव्या उपराष्ट्रपतींची नियुक्ती प्रक्रियेद्वारे केली जाते. उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा संविधानात दिलेली नाही.  कलम 68 नुसार जितक्या लवकर उपराष्ट्रपतींची निवड करणं शक्य आहे तितक्या लवकर ती करावी. जगदीप धनखड यांनी 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता, त्यांची अजून दोन वर्ष बाकी होती. मात्र, नव्या उपराष्ट्रपतींची निवड झाल्यानंतर ती पाच वर्षांसाठी असते. 

उपराष्ट्रपती होण्यासाठी पात्रता

भारतीय संविधानाच्या कलम 66(3) अनुसार उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असला पाहिजे. त्यानं वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत. तो राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र असावा. भारत सरकार, कोणतंही राज्य सरकार किंवा इतर शासकीय प्राधिकरणात लाभाच्या पदावर नसावा. 

उपराष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून राबवली जाते. आयोगाकडून निवडणुकीची अधिसूचना काढली जाते. उमेदवारी अर्जांची छाननी केली जाते. मतदान केलं जातं. त्यानंतर मतमोजणी करुन निकाल जाहीर केला जातो. 

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार (संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मिळून बनलेल्या निर्वाचक गणाच्या सदस्यांकडून निवडला जाईल) या निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीनं केलं जातं. 

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांकडून मतदान केलं जातं. लोकसभा आणि राज्यसभेतील राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केलेले सदस्य देखील यात मतदान करु शकतात. मतदारांना उमेदवारांच्या नावापुढं पसंतीक्रम नोंदवायचा असतो. जोपर्यंत उमेदवार बहुमतानं विजयी होत नाही तोपर्यंत मतमोजणी केली जाते. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gas Shortage ECA Act: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
Gas Shortage ESMA: देशभरात गॅसचा तुटवडा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ESMA कायदा लागू, नक्की काय होणार?
देशभरात गॅसचा तुटवडा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ESMA कायदा लागू, नक्की काय होणार?
NCERT: 'न्यायपालिकेतील भ्रष्टाचार' प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने फटकारलं, NCERT ने मागितली बिनशर्त माफी; आठवीच्या पुस्तकातील 'तो' धडा पुन्हा लिहिणार
'न्यायपालिकेतील भ्रष्टाचार' प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने फटकारलं, NCERT ने मागितली बिनशर्त माफी; आठवीच्या पुस्तकातील 'तो' धडा पुन्हा लिहिणार
Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!

व्हिडीओ

Solapur Gas Shortage : इंधन तुटवड्यामुळे सोलापुरातील प्रसिद्ध सुधा उपहारगृह बंद होणार?
Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
अंबादास दानवेंनी भाजप नेत्याची कॉलर पकडली; पं.स. संभाजीनगरमध्ये सभापती निवडीपूर्वी राडा
अंबादास दानवेंनी भाजप नेत्याची कॉलर पकडली; पं.स. संभाजीनगरमध्ये सभापती निवडीपूर्वी राडा
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Embed widget