एक्स्प्लोर

Jagdeep Dhankar Resignation : जगदीप धनखड यांचा राजीनामा, उपराष्ट्रपतींची निवड कशी होते? निवडणूक झाल्यास मतदान कोण करतं? 

Jagdeep Dhankar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. या राजीनाम्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींची निवड कधी होणार याकडे लक्ष लागलं आहे?

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी काल प्रकृती आणि वैद्यकीय कारणांचा हवाला देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यामुळं आता भारतीय संविधानाच्या कलम 68 नुसार नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सुरु होईल. उपराष्ट्रपतींची निवड प्रक्रिया कशी होते ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जगदीप धनखड यांनी ऑगस्ट 2022 मध्ये व्यंकय्या नायडू यांच्यानंतर उपराष्ट्रपती पद स्वीकारलं होतं. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देणारे जगदीप धनखड हे तिसरे उपराष्ट्रपती ठरले आहेत. 

उपराष्ट्रपती पदाची निवड प्रक्रिया कशी होते?

संविधानाच्या कलम 68 नुसार उपराष्ट्रपती पद निवडीची प्रक्रिया आहे. कलम 68 (1) नुसार उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ संपंत आला अशेल तर त्यापूर्वी नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.  दुसरी तरतदू अशी आहे जर उपराष्ट्रपती पद मृत्यू, राजीनामा, पदावरुन हटवलं गेल्यानं रिक्त झाल्यास नव्या उपराष्ट्रपतींची नियुक्ती प्रक्रियेद्वारे केली जाते. उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा संविधानात दिलेली नाही.  कलम 68 नुसार जितक्या लवकर उपराष्ट्रपतींची निवड करणं शक्य आहे तितक्या लवकर ती करावी. जगदीप धनखड यांनी 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता, त्यांची अजून दोन वर्ष बाकी होती. मात्र, नव्या उपराष्ट्रपतींची निवड झाल्यानंतर ती पाच वर्षांसाठी असते. 

उपराष्ट्रपती होण्यासाठी पात्रता

भारतीय संविधानाच्या कलम 66(3) अनुसार उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असला पाहिजे. त्यानं वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत. तो राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र असावा. भारत सरकार, कोणतंही राज्य सरकार किंवा इतर शासकीय प्राधिकरणात लाभाच्या पदावर नसावा. 

उपराष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून राबवली जाते. आयोगाकडून निवडणुकीची अधिसूचना काढली जाते. उमेदवारी अर्जांची छाननी केली जाते. मतदान केलं जातं. त्यानंतर मतमोजणी करुन निकाल जाहीर केला जातो. 

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार (संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मिळून बनलेल्या निर्वाचक गणाच्या सदस्यांकडून निवडला जाईल) या निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीनं केलं जातं. 

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांकडून मतदान केलं जातं. लोकसभा आणि राज्यसभेतील राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केलेले सदस्य देखील यात मतदान करु शकतात. मतदारांना उमेदवारांच्या नावापुढं पसंतीक्रम नोंदवायचा असतो. जोपर्यंत उमेदवार बहुमतानं विजयी होत नाही तोपर्यंत मतमोजणी केली जाते. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इराण-इस्रायल युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका! प्रत्येक दिवशी होतोय 1 अब्ज डॉलर्सचा खर्च, आत्तापर्यंत किती नुकसान? 
इराण-इस्रायल युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका! प्रत्येक दिवशी होतोय 1 अब्ज डॉलर्सचा खर्च, आत्तापर्यंत किती नुकसान? 
1 एप्रिलपासून RBI चे नवीन नियम लागू होणार, डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित, ऑनलाइन फसवणुकीवर चाप
1 एप्रिलपासून RBI चे नवीन नियम लागू होणार, डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित, ऑनलाइन फसवणुकीवर चाप
देशात खरचं पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा आहे का? सरकारकडून महत्वाची माहिती जारी, घाबरुन न जाण्याचं आवाहन 
देशात खरचं पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा आहे का? सरकारकडून महत्वाची माहिती जारी, घाबरुन न जाण्याचं आवाहन 
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू

व्हिडीओ

Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
Ashok Kharat: अशोक खरातचे 45 नेत्यांशी घनिष्ट संबंध, भोंदूबाबाच्या सल्ल्याशिवाय पानही हलायचं नाही, एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
अशोक खरातचे 45 नेत्यांशी घनिष्ट संबंध, भोंदूबाबाच्या सल्ल्याशिवाय पानही हलायचं नाही, एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
Embed widget