एक्स्प्लोर

Jagdeep Dhankar Resignation : जगदीप धनखड यांचा राजीनामा, उपराष्ट्रपतींची निवड कशी होते? निवडणूक झाल्यास मतदान कोण करतं? 

Jagdeep Dhankar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. या राजीनाम्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींची निवड कधी होणार याकडे लक्ष लागलं आहे?

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी काल प्रकृती आणि वैद्यकीय कारणांचा हवाला देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यामुळं आता भारतीय संविधानाच्या कलम 68 नुसार नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सुरु होईल. उपराष्ट्रपतींची निवड प्रक्रिया कशी होते ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जगदीप धनखड यांनी ऑगस्ट 2022 मध्ये व्यंकय्या नायडू यांच्यानंतर उपराष्ट्रपती पद स्वीकारलं होतं. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देणारे जगदीप धनखड हे तिसरे उपराष्ट्रपती ठरले आहेत. 

उपराष्ट्रपती पदाची निवड प्रक्रिया कशी होते?

संविधानाच्या कलम 68 नुसार उपराष्ट्रपती पद निवडीची प्रक्रिया आहे. कलम 68 (1) नुसार उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ संपंत आला अशेल तर त्यापूर्वी नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.  दुसरी तरतदू अशी आहे जर उपराष्ट्रपती पद मृत्यू, राजीनामा, पदावरुन हटवलं गेल्यानं रिक्त झाल्यास नव्या उपराष्ट्रपतींची नियुक्ती प्रक्रियेद्वारे केली जाते. उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा संविधानात दिलेली नाही.  कलम 68 नुसार जितक्या लवकर उपराष्ट्रपतींची निवड करणं शक्य आहे तितक्या लवकर ती करावी. जगदीप धनखड यांनी 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता, त्यांची अजून दोन वर्ष बाकी होती. मात्र, नव्या उपराष्ट्रपतींची निवड झाल्यानंतर ती पाच वर्षांसाठी असते. 

उपराष्ट्रपती होण्यासाठी पात्रता

भारतीय संविधानाच्या कलम 66(3) अनुसार उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असला पाहिजे. त्यानं वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत. तो राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र असावा. भारत सरकार, कोणतंही राज्य सरकार किंवा इतर शासकीय प्राधिकरणात लाभाच्या पदावर नसावा. 

उपराष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून राबवली जाते. आयोगाकडून निवडणुकीची अधिसूचना काढली जाते. उमेदवारी अर्जांची छाननी केली जाते. मतदान केलं जातं. त्यानंतर मतमोजणी करुन निकाल जाहीर केला जातो. 

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार (संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मिळून बनलेल्या निर्वाचक गणाच्या सदस्यांकडून निवडला जाईल) या निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीनं केलं जातं. 

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांकडून मतदान केलं जातं. लोकसभा आणि राज्यसभेतील राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केलेले सदस्य देखील यात मतदान करु शकतात. मतदारांना उमेदवारांच्या नावापुढं पसंतीक्रम नोंदवायचा असतो. जोपर्यंत उमेदवार बहुमतानं विजयी होत नाही तोपर्यंत मतमोजणी केली जाते. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ayodhya Ram Mandir: राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
Ram Mandir Donation Case : राम मंदिर विश्वस्त मंडळाचा मोठा निर्णय; चंपत राय, अनिल मिश्र यांचे राजीनामे मंजूर, 'एसआयटी' चौकशी सुरू, बैठकीत नेमकं काय घडलं?
राम मंदिर विश्वस्त मंडळाचा मोठा निर्णय; चंपत राय, अनिल मिश्र यांचे राजीनामे मंजूर, 'एसआयटी' चौकशी सुरू, बैठकीत नेमकं काय घडलं?
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Embed widget