एक्स्प्लोर

Dr. M. S. Swaminathan : दुष्काळातून प्रेरणा घेत कृषी क्षेत्रात भरीव काम, डॉ. एम. एस. स्वामीनाथन एक कृषिवैज्ञानिक 

Dr. M. S. Swaminathan : डॉ. एम. एस .स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. कृषी क्षेत्रात केलेल्या महत्वपूर्ण योगदनाबद्दल त्यांना पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्रीसह रॅमन मॅगसेस सारख्या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

Dr. M. S. Swaminathan : मोनकोंबू सांबशिवन स्वामिनाथन म्हणजेच डॉ. एम. एस .स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. कृषी क्षेत्रात केलेल्या महत्वपूर्ण योगदनाबद्दल त्यांना पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्रीसह रॅमन मॅगसेस सारख्या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. याच स्वामीनाथन यांनी बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळातून प्रेरणा घेत कृषी क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आणि या क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. 

डॉ.एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडूमधील कुंभकोणम या ठिकाणी झाला. त्यांना पहिल्यापासूनच शेतीविषयी आवड होती. केरळ विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच 1943 च्या दरम्यान बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळात हजारो लोकांचे भूकबळी गेले. त्याचा परिणाम स्वामिनाथन यांच्या मनावर झाला आणि धान्योत्पादन वाढीच्या विचारांतून  त्यांनी कृषीक्षेत्रात काम करण्याचे ठरवले. पुढे त्यांनी देशात कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांनी ‘एम.एस.स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे. या रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी कृषीक्षेत्रातील अनेक संशोधने केली. 

स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून देखील ओळखले जाते. हरित क्रांती म्हणजे कृषी क्षेत्राकडे तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणांमुळे शेती उत्पादकतेत मोठी वाढ झाली. धान्याची उच्च-उत्पादनक्षम प्रकार विकसित करणे, खते आणि कीटकनाशके वापरणे, कीटक-प्रतिरोधक पिके विकसित करणे, वर्धित अनुवंशशास्त्र असलेल्या संकरित बियाणे इत्यादींचा समावेश करणे होय. 

नेदरलँड्सच्या विद्यापीठात संशोधन 
स्वामीनाथ यांनी सुरूवातीला नेदरलँड्सच्या वेगेनिंगेन कृषी विद्यापीठ अनुवंशिकी संस्था येथे बटाटा अनुवंशशास्त्र विषयावर संशोधन सुरू केले. या संशोधनासाठी त्यांना युनेस्कोची फेलोशिप मिळत असे. या संशोधनातून त्यांनी सोलॅनमच्या जंगली प्रजातींच्या विस्तृत मशापासून लागवडीखालील बटाटा, सोलॅनम ट्यूबरोजममध्ये जीन हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेचे प्रमाणिकरण करण्यात यश मिळविले.

 केंब्रिज विद्यापीठाची पीएचडी
या संशोधनानंतर स्वामीनाथन केंब्रिज युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरमध्ये गेले. तेथे  त्यांनी "प्रजाती भेदभाव, आणि सोलॅनम - सेक्शन ट्युबेरियम जनुकातील विशिष्ट प्रजातीतील पॉलीप्लॉईडी ऑफ नेपरी" या प्रबंधासाठी 1952 मध्ये त्यांनी पीएचडी मिळविली. 

 प्राध्यापक पदाची ऑफर नाकारली
परदेशी शिक्षण घेऊन भारतीय शेतीच्या कार्यात स्वत:ला सुसज्ज करण्यासाठी संशोधनाच्या कार्याबद्दल त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक समाधान असूनही त्यांनी तेथे पूर्णवेळ प्राध्यापक पदाची ऑफर नाकारली. ते 1954  च्या सुरूवातीला भारतात परतले. त्यानंतर त्यांनी आयएआरआय मध्ये त्यांनी आपले संशोधन केले.  

स्वामीनाथन आयोगाची स्थापना

देशातील शेतकर्‍यांची दुरवस्था घालवण्यासाठी 18 नोव्हेंबर 2004 मध्ये आयोगाची स्थापना करण्यात आली. डॉ. एम.एस. स्वामीनाथन हे या आयोगाचे अध्यक्ष होते. 2006 पर्यंत या आयोगाद्वारे सहा अहवाल सादर करण्यात आले आहेत. या अहवालात आयोगाने शेतकर्‍यांच्या हालाखीची कारणे आणि त्यावर उपाय सुचविण्यात आले आहेत. पण आपल्या देशातील लाल फितींच्या कारभारामुळे आजपर्यंत हा अहवाल न स्वीकारता तसाच आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
Embed widget