एक्स्प्लोर

Uttar Pradesh History: उत्तर प्रदेशने देशाला आतापर्यंत किती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती दिले? पाहा संपूर्ण यादी

Uttar Pradesh History: उत्तर प्रदेशने आतापर्यंत देशाला 9 पंतप्रधान दिले आहेत. उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) राष्ट्रपती बनलेल्या लोकांची संख्या पंतप्रधानांच्या तुलनेत फारच कमी आहे.

उत्तर प्रदेशने आतापर्यंत देशाला 9 पंतप्रधान दिले आहेत. परंतु, उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) राष्ट्रपती बनलेल्या लोकांची संख्या पंतप्रधानांच्या तुलनेत फारच कमी आहे. राज्याने देशाला आतापर्यंत जाकिर हुसैन आणि रामनाथ कोविंद असे दोन राष्ट्रपती (Presidents) दिले आहेत. रामनाथ कोविंद हे कानपूरचे आहेत. देशाला सर्वाधिक राष्ट्रपती देण्याच्या यादीत तामिळनाडू अव्वल आहे. तामिळनाडूने देशाला 3 राष्ट्रपती दिले आहेत. उपराष्ट्रपती (Vice Presidents) संदर्भात बोलायचे झाले तर, उत्तर प्रदेशने देशाला 3 उपराष्ट्रपती दिले आहेत. 

राष्ट्रपती-

1) डॉ झाकीर हुसेन

डॉ झाकीर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. हुसेन यांचा कार्यकाळ 13 मे 1967 ते 3 मे 1969 पर्यंत होता. झाकीर हुसेन यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897 रोजी हैदराबादच्या एका पठाण कुटुंबात झाला. हुसेन हे 10 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे कुटंब हैदराबादयेथून उत्तर प्रदेशातील कायमगंज येथे गेले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इस्लामिया हायस्कूल, इटावा आणि अँग्लो-मुस्लिम ओरिएंटल कॉलेजमधून झाले. हे महाविद्यालय आता अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. 

हुसेन यांनी वयाच्या 23 व्या वर्षी आपल्या सहकाऱ्यांसह जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीचा पाया रचला. यानंतर ते जर्मनीला गेले आणि त्यांनी पीएचडी (अर्थशास्त्र) केली. झाकीर हुसेन हे वयाच्या 29 व्या वर्षी जामियाचे कुलगुरू झाले. 1952 साली ते राज्यसभेचे सदस्य झाले. ते 1957 मध्ये बिहारचे राज्यपाल झाले. डॉ.जाकीर हुसेन यांना 1962 साली उपराष्ट्रपती आणि 1967 साली राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली. शिक्षण आणि राजकारण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना 1963 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2) रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद हे देशाचे 14 वे राष्ट्रपती आहेत. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे झाला आहे. रामनाथ कोविंद यांनी कानपूर विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्यांनी 1977 ते 1979 पर्यंत दिल्ली उच्च न्यायालयात सराव केला. रामनाथ कोविंद यांची 1994 मध्ये उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून निवड झाली. त्यानंतर 2015 मध्ये ते बिहारचे राज्यपाल झाले. 2017 मध्ये रामनाथ कोविंद यांची देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.

उपराष्ट्रपती-

1) गोपाल स्वरूप पाठक

गोपाल स्वरूप पाठक यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या बरेली येथे 26 जानेवारी 189 झाला. गोपाल स्वरूप पाठक यांनी अलाहाबाद विद्यापीठातून शिक्षण घेतले. ते 1945-46 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. यानंतर ते 1960 ते 1966 पर्यंत राज्यसभा सदस्य राहिले, याशिवाय 1967 ते 1969 पर्यंत म्हैसूरचे राज्यपाल होते. त्यानंतर 31 ऑगस्ट 1969 ते 30 ऑगस्ट 1974 पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती होते.


2) मोहम्मद हिदायतुल्लाह

मोहम्मद हिदायतुल्ला हे भारताचे सहावे उपराष्ट्रपती होते. त्यांचा जन्म 17 डिसेंबर 1905 रोजी झाला. त्यांचे वडील खान बहादूर हाफिज विलायतुल्ला हे उर्दूचे प्रसिद्ध कवी होते. तर आजोबा मुन्शी कुदरतुल्लाह वाराणसीमध्ये एक प्रसिद्ध वकील होते. मोहम्मद हिदायतुल्लाह देशाचे 11 वे सरन्यायाधीशही राहिले आहेत. उपराष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 1979 ते 30 ऑगस्ट 1984 पर्यंत होता.

3) मोहम्मद हमीद अन्सारी

देशाचे 14 वे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा जन्म कोलकाता येथे झाला. पण ते उत्तर प्रदेशातील गाझीपूरशी संबंधित आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण सेंट एडवर्ड्स हायस्कूल शिमला, सेंट झेवियर्स कोलकाता आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून केले. हमीद अन्सारी यांनी 1961 साली भारतीय परराष्ट्र सेवेत नोकरशहा म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. याशिवाय, त्यांनी संयुक्त अरब अमिराती आणि इराणमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम केले. त्यांना 1984 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हमीद अन्सारी यांची 2002 मध्ये उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. यानंतर, 2012 मध्ये त्यांची पुन्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 

संबंधित बातम्या- 

UP Election : काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आणि स्कूटी देणार: प्रियांका गांधींचे आश्वासन

Lakhimpur kheri News: सर्वोच्च न्यायालयाकडून लखीमपूर हिंसाचारावर 26 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी स्थगित, कोर्टात काय झालं?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget