एक्स्प्लोर

Property Rights : अवैध विवाहातून जन्मलेल्या मुलालाही वडिलोपार्जित संपत्तीत हक्क, पण 'इतक्या' प्रमाणात असेल वाटा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Hindu Joint Family Property: अवैध आणि रद्द विवाहातून जन्माला आलेल्या मुलांनाही कायदेशीर वारसांसोबतच पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क मिळेल असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली: अवैध विवाहातून जन्मलेल्या किंवा कायदेशीररित्या वारस नसलेल्या किंवा विवाहाशिवाय एकत्रित संबंधातून जन्मलेल्या मुलालाही त्याच्या वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत (Parents Share In Hindu Joint Family Property) कायदेशीर वारसांप्रमाणे हक्क असेल असा महत्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या मुलाला असणारा हक्क हा त्याच्या वडिलांच्या हिश्यातून मिळणारा हक्क असेल, म्हणजे मूळ हिस्से झाल्यानंतर त्याच्या वडिलाच्या वाटेला जो हिस्सा येईल, त्यामध्ये अशा मुलाचा एक हिस्सा असेल असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल देताना सांगितले की, अवैध आणि रद्द विवाहातून जन्माला आलेल्या मुलांनाही पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क मिळेल. सुप्रीम कोर्टाने नवी व्यवस्था देताना अशा मुलांनाही कायदेशीर वारसांसोबत हिस्सा मिळायला हवा, असं म्हटलं आहे. अशा प्रकारे, हिंदू विवाह कायद्याच्या कलम 16 (3) ची व्याप्ती आता वाढवली जाईल. 11 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाने एक खटला निकाली काढला आणि सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud), न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

काय म्हणाले सरन्यायाधीश? 

बेकायदेशीर विवाहातून जन्मलेल्या वारसांना त्याच्या वडिलांच्या संपत्तीत कशा प्रकारचा अधिकार असेल यावर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी एका उदाहरणासह प्रकाश टाकला. ते म्हणाले की, समजा C1, C2, C3 आणि C4 चार भाऊ आहेत. त्यांच्यामध्ये 400 रुपायांची वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी झाली. C2 या व्यक्तीच्या निधनानंतर त्याची पत्नी आणि मुलगी आहे, तसेच त्याला एका अवैध विवाहापासून जन्माला आलेला एक मुलगा आहे. 

C2 ला त्याच्या मूळ संपत्तीतील 100 रुपये वाट्याला आले. त्यामध्ये तो स्वतः, त्याची बायको आणि त्याची मुलगी असे तीन हिस्से होतील. म्हणजे प्रत्येकाला 33 रुपयांची संपत्ती वाट्याला येईल. आता C2 च्या वाट्याला आलेल्या 33 रुपयांची पुन्हा त्याच्या वारसांमध्ये वाटणी होईल. म्हणजे या 33 रुपयांमध्ये त्याची बायको, मुलगी आणि अवैध लग्नानंतर जन्मलेला मुलगा यांची वाटणी असेल. म्हणजे अवैध लग्नानंतर झालेल्या मुलाला 11 रुपये वाटणीला येतील. 
 
सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, बेकायदेशीर किंवा कायदेशीर वारस नसलेल्या मुलांना त्यांच्या मृत पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क आहे. असं असलं तरी या मुलांना त्यांच्या पालकांच्या मालमत्तेशिवाय इतर कोणत्याही मालमत्तेवर हक्क नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की हा निर्णय फक्त हिंदू मिताक्षरा कायद्याद्वारे (Hindu Mitakshara Law) शासित हिंदू संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तांना लागू आहे. 

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने रेवणसिद्धप्पा विरुद्ध मल्लिकार्जुन (Revanasiddappa vs. Mallikarjun 2011) मधील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयासंबंधित खटल्याची सुनावणी केली. ज्यामध्ये असे म्हटले होते की, अवैध विवाहामुळे जन्माला आलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या मालमत्तेचा वारसा मिळण्याचा हक्क आहे, मग ते स्वःकमाईतील असो किंवा वडिलोपार्जित असो.

या प्रकरणातील मुद्दा हिंदू विवाह कायदा-1955 च्या कलम 16 च्या व्याख्येशी संबंधित आहे, जो अवैध विवाहामुळे जन्माला आलेल्या मुलांना वैधता प्रदान करतो. तथापि कलम 16(3) असेही नमूद करते की अशी मुले केवळ त्यांच्या पालकांच्या संपत्तीवर हक्कदार आहेत आणि त्यांना इतरांच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नाही. हिंदू मिताक्षरा कायद्याद्वारे शासित हिंदू अविभाजित कुटुंबात मालमत्ता पालकांची आहे असे मानले जाऊ शकते तेव्हा या संदर्भात प्राथमिक मुद्दा होता.

त्यावर उत्तर देताना, खंडपीठाने सांगितले की, हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम 6 नुसार, हिंदू मिताक्षर मालमत्तेतील कोपर्सनर्सचे हित हे त्यांच्या मालमत्तेच्या विभाजनाच्या वेळी त्यांना वाटप केलेल्या मालमत्तेचा हिस्सा म्हणून परिभाषित केले आहे. मृत्यू. होईल. न्यायालयाने असे मत मांडले आहे की, निरर्थक विवाहामुळे जन्मलेल्या मुलांना मालमत्तेचा हक्क आहे जो त्यांच्या पालकांच्या मृत्यूनंतर काल्पनिक विभाजनात जाईल.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget