एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मोदी सरकारची 3 वर्षे, पंतप्रधान 2 कोटी पत्र लिहिणार
![मोदी सरकारची 3 वर्षे, पंतप्रधान 2 कोटी पत्र लिहिणार Government To Mark 3 Years With Modi Festival 2 Crores Letter By Latest News Update मोदी सरकारची 3 वर्षे, पंतप्रधान 2 कोटी पत्र लिहिणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/16080703/Modi_3_Years.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे भाजपकडून देशभरात जल्लोष करण्यात येणार आहे.
तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 16 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात एकहाती सत्ता मिळवली आणि मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले.
देशभरात मोदी फेस्टिव्हल
भाजप 26 मेपासून 15 जूनपर्यंत मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी फेस्टिव्हल साजरा होणार आहे. देशातील 900 शहरांमध्ये हा उत्सव साजरा केला जाईल. हा उत्सव 20 दिवस सुरु राहणार आहे.
पंतप्रधान 2 कोटी पत्र लिहिणार
पंतप्रधान मोदी सामान्य नागरिकांसाठी दोन कोटी पत्र लिहिणार आहेत. 15 दिवसात 10 कोटी एसएमएस केले जातील. 500 शहरांमध्ये 'सबका साथ, सबका विकास' कार्यक्रमाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे.
पाच शहरांचा दौरा
पंतप्रधान मोदी देशाच्या पाच शहरांचा दौरा करतील, ज्याची सुरुवात गुवाहाटीपासून होईल. यानंतर मोदी बंगळुरु, पुणे, कोलकाता, जयपुर आणि कोटापैरी चार शहरात जातील. न्यू इंडिया अभियान 25 मेपासून सुरु होणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदी देशातील नागरिकांना संबोधित करणार आहेत.
मोदी सरकारसमोरील प्रश्न
दरम्यान, पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदींना घेतलेला नोटबंदीचा निर्णय चांगलाच चर्चेत राहिला. तर वाढता दहशतवाद, पाकिस्तानशी बिघडलेले संबंध, वाढती महागाई तसंच रोजगार हे प्रश्न सध्या मोदी सरकारसमोर कायम आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
क्रिकेट
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)