शेतकरी आंदोलनात दिल्ली पोलीस डीटीसी बसेसचा वापर करु शकणार नाही? 576 बसेस परत करण्याचे सरकारचे निर्देश
दिल्लीच्या जवळपास 10 टक्के बसेस दिल्ली पोलिसांकडे गुंतल्या आहेत, त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या समस्या व तक्रारी वाढल्या आहेत.

नवी दिल्ली : दिल्ली सुरु असलेल्या आंदोलनात दिली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बसचा वापर पोलीस करताना दिसत आहेत. त्यातच आता दिल्ली सरकारने दिल्ली पोलिसांना 576 डीटीसी बस परत करण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांना पुरवल्या जाणाऱ्या बसेस परत करण्यासाठी दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाने डीटीसीला (दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) निर्देश दिले आहेत.
दिल्ली परिवहन महामंडळाच्या या सर्व बसेस शेतकरी आंदोलनात वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांच्या वतीने चळवळीसाठी वापरल्या जात आहेत. बसेस फक्त डीटीसीमार्फत दिल्ली पोलिसांना दिल्या जातात. यासह, परिवहन विभागाने डीटीसीला सरकारच्या परवानगीशिवाय दिल्ली पोलिसांना बसेस न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिवहन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी शेतकरी आंदोलन सुरू केल्यापासून डीटीसी बसेस मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत.
दिल्लीच्या जवळपास 10 टक्के बसेस दिल्ली पोलिसांकडे गुंतल्या आहेत, त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या समस्या व तक्रारी वाढल्या आहेत. म्हणूनच असे बोलले जात आहे की जर दिल्ली पोलिसांना बसेसची आवश्यकता असेल तर त्यांनी खासगी बस भाड्याने घ्याव्यात मात्र डीटीसी बसेस त्यांच्याकडे ठेऊ नयेत.
प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी शेतकऱ्यांच्या वतीने अनेक सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले. यावेळी डीटीसी बसचीही तोडफोड करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी विविधी ठिकाणी पोहोचण्यासाठी डीटीसी बसेसचा वापर केला. अशा परिस्थितीत दिल्ली सरकारने डीटीसी बसेस परत करण्याच्या सूचना दिल्यानंतर दिल्ली पोलिस आपल्या जवानाची हालचाल सहजपणे कशी करू शकतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित बातम्या
- Sachin Tendulkar on Farmer Protest: शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच सचिन तेंडुलकर यांचे ट्वीट..
- Rihanna Farmer Protest Comment: परराष्ट्र मंत्रालयाकडून रिहाना, ग्रेटा यांना सल्ला, तर अक्षय कुमार म्हणतो..
Before You Go
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा





















