![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sachin Tendulkar on Farmer Protest: शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच सचिन तेंडुलकर यांचे ट्वीट..
हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातून याला विरोध करण्यात येत आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांनीही याला पाठिंबा दर्शविला आहे.
![Sachin Tendulkar on Farmer Protest: शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच सचिन तेंडुलकर यांचे ट्वीट.. Sachin Tendulkar speaks on tweets about foreign celebrities, will be no compromise with the sovereignty of our country Sachin Tendulkar on Farmer Protest: शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच सचिन तेंडुलकर यांचे ट्वीट..](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/04021112/Sachin.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शेतकरी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास 70 दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकारदेखील पुढे आले आहेत. काल (मंगळवारी) गायिका रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्विट केले आहे. आता माजी पोर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातून याला विरोध होत आहे. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांनीही याला पाठिंबा दिला आहे.
सचिन तेंडुलकर यांनी ट्विट केले की, "भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही." बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते सहभागी असू शकत नाही. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया.
भारताविरूद्ध प्रचाराचा भाग होऊ नका : अजय देवगन बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांनी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली विरोध करणार्यांना इशारा देत आपण कोणत्याही प्रचाराचा भाग घेऊ नये, असा सल्ला दिला आहे. त्यांनी ट्विट केले आहे, की "भारत किंवा भारतीय धोरणांविरूद्ध कोणत्याही प्रचाराचा भाग होऊ नका. कोणताही मतभेद न करता एकत्र उभे राहणे महत्वाचे आहे. "India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants. Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021
अर्थवट सत्य धोकादायक : सुनील शेट्टी अभिनेता सुनील शेट्टी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की- "आपण प्रत्येक गोष्टीकडे व्यापक नजरेने पाहिले पाहिजे. कारण, अर्धसत्य धोकादायक असते. तर करण जोहरने लिहिले आहे की आपण कठीण काळात जगत आहोत आणि प्रत्येक वळणावर धीर धरला पाहिजे ही काळाची गरज आहे. एकत्र येऊन प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. शेतकरी हा भारताचा कणा असून यात कुणालाही फूट पाडू देऊ नका.
काही लोक अजेंडा चालवत आहे : परराष्ट्र मंत्रालय शेतकरी आंदोलनाला संदर्भात परदेशात बसलेल्या काही शक्ती अजेंडा चालवत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, या विषयांवर कोणतेही मत देण्यापूर्वी, संपूर्ण माहिती मिळवणे चांगले. अर्धवट माहितीवर सोशल मीडियावर व्यक्त केलेल मत हे बेजबाबदार असल्याचा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)