एक्स्प्लोर

Earthquake : दिल्लीच नव्हे, इतर राज्यांतही भूकंपाचे धक्के; असं नेमकं का होतंय?

गुरुवारी रात्रीच्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. भुकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घराबाहेर येत सुरक्षितेचे काही उपाय अवलंबले.

Earthquake गुरुवारी रात्रीच्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. भुकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घराबाहेर येत सुरक्षितेचे काही उपाय अवलंबले. मुख्य म्हणजे गुरुवारी फक्त दिल्ली एनसीआर भागच नव्हे, तर नोएडा, गाजियाबाद या भागांसह मणिपूर आणि राजस्थानमध्येही भूकंप जाणवल्याचं म्हटलं गेलं.

दिल्ली एनसीआरमध्ये रात्री भूकंप

रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दिल्ली एनसीआर भागात भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर आले. सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता कळू शकली नाही. पण, त्यानंतर हाती आलेल्या माहितीनुसार 4.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप असल्याचं म्हटलं गेलं. भूकंपाचं केंद्र गुरुग्रामपासून 48 किलोमीटर दूर दक्षिण पश्चिम दिशेला असल्याचं सांगण्यात येत आहे.

सीकरही हादरलं

राजस्थानमधील सीकरमध्येही गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार य भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल असल्याचं सांगण्यात आलं. यासंबंधीच्या वृत्ताला भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (MoES) राष्ट्रीय विज्ञान केंद्रानं (NCS)नंही दुजोरा दिला.

मणिपूरमध्येही जाणवला भूकंप

नॅशनल सेंटर ऑफ सिस्म़ोलॉजीनुसार गुरुवरी रात्री मणिपूरनजीक असणाऱ्या Moirang मध्ये 3.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आल्याची माहिती समोर येत आहे. या भूकंपाचं केंद्र Moirang  मणिपूरपासून 38 किलोमीटर दक्षिणेकडे होतं. भारतीय वेळेनुसार हा भूकंप रात्री 10.03 वाजता आला.

दिल्ली ठरतेय सर्वाधिक संवेदनशील क्षेत्र

मागील काही दिवसांपासून दिल्लीत सातत्यानं बसणाऱे भूकंपाचे हादरे पाहता दिल्लीतील बरंच क्षेत्र संवेदनशील असल्याची बाब समोर येत आहे. यानजीकच्या भागाला झोन 4 मध्ये गणलं जात आहे. जिथं 7.9 रिश्टर स्केलचा भूकंपही येऊ शकतो. दिल्लीत भूकंप येऊ शकणाऱ्या भागांमध्ये यमुना तीराजवळील काही भाग, पूर्व दिल्ली, शाहदरा, मयूर विहार, लक्ष्मी नगर, गुरुग्राम, रेवाडीचा समावेश आहे.

भारतात होणाऱ्या भूकंपास कारण की...

भारतीय भूखंडावर अनेकदा भूकंपाचे जबर हादरे बसले आहेत. 2001 मध्ये गुजरातच्या कच्छ येथे झालेल्या एका विनाशकारी भूकंपात हजारोच्या संख्येनं नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारत प्रति वर्ष जवळपास 47 मिलीमीटरच्या गतीनं आशियावर आदळत आहे. टेक्टॉनिक प्लेट आदळत असल्यामुळंच भारतात सातत्यानं भूकंपाचे हादरे बसत असतात. असं असलं तरीही भूजल पातळीमुळं  टेक्टॉनिक प्लेटमधील गतीचा वेग मंदावला आहे.

चार क्षेत्रांमध्ये भारतातील भूकंपप्रवण क्षेत्रांची विभागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये झोन 5, झोन 4, झोन 3 आणि झोन 2चा समावेश आहे.

झोन 5 मध्ये संपूर्ण पूर्वोत्तर भारत, जम्मू-कश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमधील कच्छ चे रण, उत्तर बिहार मधील काही भाग आणि अंदमान निकोबार बेट समूहांचा समावेश आहे. इथं सातत्यानं भूकंपाचे हादरे जाणवतात. तर, झोन 4 मध्ये दिल्ली, सिक्किम, उत्तर प्रदेश मधील उत्तर भाग, बिहार आणि पश्चिम बंगालसह महाराष्ट्राचा काही भाग तसंच राजस्थानचा समावेश आहे.

झोन 3 मध्ये केरळ, गोवा, लक्षद्वीप द्वीपसमूह, उत्तर प्रदेश मधील उर्वरित भाग, गुजरात आणि पश्चिम बंगाल, पंजाबचा काही भाग मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगढ़, महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकचा समावेश होतो. तर, झोन 2 मध्ये भूकंपाच्या दृष्टीनं सर्वात कमी सक्रिय भागाची नोंद करण्यात येते.

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget