एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

नोटाबंदीला दोन महिने पूर्ण, चलनकल्लोळ 16 मार्चपर्यंत संपणार?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. दोन महिन्यानंतरही अनेक ठिकाणी नोटांचा तुटवडा जाणवत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार हा चलनकल्लोळ 16 मार्चपर्यंत संपू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर 15 लाख 44 हजार कोटी रुपयांच्या 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यानंतर 9 नोव्हेंबरपासूनच बाजारात चलनकल्लोळ निर्माण झाला. देशातील चारही प्रिंटिंग प्रेसमध्ये नोटांची छपाई युद्धपातळीवर चालू आहे. मात्र अद्यापही नोटांचा तुटवडा काहीशा प्रमाणात जाणवत आहे. चलनकल्लोळ कधी संपणार? रिझर्व्ह बँकेकडून सध्या ज्या वेगाने नव्या नोटांची छपाई सुरु आहे, त्यानुसार डिसेंबर अखेरपर्यंत रद्द केलेल्या नोटांपैकी 44 टक्के नोटांची भरपाई झाली आहे. जानेवारी अखेरपर्यंत हा आकडा 67 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असं एसबीआयचे मुख्य अर्थतज्ञ सौम्यकांती घोष यांचं मत आहे. जानेवारी अखेरपर्यंत बाजारातील परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली असेल आणि फेब्रुवारीपर्यंत 80 ते 89 टक्के नव्या नोटा छापल्या जातील. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत चलनतुटवडा भरुन निघेल, असं सौम्यकांती घोष यांचं मत आहे. नोटाबंदीनंतर म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या स्वरुपात 15 लाख 44 हजार कोटी रुपये चलनात होते. तर बँक आणि बाजारात मिळून 2 लाख 53 हजार कोटी रुपये 100-50 रुपयांच्या स्वरुपात होते. नोटाबंदीनंतर युद्ध पातळीवर नव्या नोटांची छपाई नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर बाजारात चलनाचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर देशातील सर्व प्रिंटिंग प्रेसमध्ये नोटांची युद्धपातळीवर छपाई सुरु करण्यात आली. भारतात नाशिक, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल आणि म्हैसूर या ठिकाणी प्रिंटिंग प्रेस आहेत. नोटाबंदीनंतर 10 नोव्हेंबरला बँकांचे व्यवहार सुरु झाले. त्यानतंर 10 डिसेंबरपर्यंत बँकांकडून नव्या नोटांमध्ये 4 लाख 61 हजार कोटी रुपये ग्राहकांना वाटप केले. 11 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटांमध्ये 2 लाख 24 हजार कोटी रुपये ग्राहकांना वाटप करण्यात आले. बाजारात अगोदरच उपलब्ध असलेल्या 100-50 च्या नोटा मिळून 30 डिसेंबरपर्यंत एकूण 9 लाख 38 हजार कोटी रुपये चलनात आले. बँकांकडून ग्राहकांना दररोज 11 हजार कोटी रुपयांची वाटप चालू आहे. याप्रमाणे 31 जानेवारीपर्यंत 3 लाख 47 हजार कोटी रुपयांची ग्राहकांना वाटप करण्यात येईल. म्हणजेच एवढे पैसे आणखी चलनात येतील. म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत बाजारात 10 लाख 32 हजार कोटी रुपये चलनात येतील. स्टेट बँकेच्या अंदाजानुसार 10 लाख कोटी रुपये चलनात येताच परिस्थिती सुधारेल. 16 मार्चपर्यंत चलनकल्लोळ संपणार? नोटाबंदीनंतर 15 लाख 44 हजार कोटी रुपये चलनातून हद्दपार झाले. त्यामुळे 31 जानेवारीपर्यंत चलनात येणारे 10 लाख 32 हजार कोटी रुपये ही जुन्या नोटांच्या रकमेची 67 टक्के रक्कम आहे. याच वेगाने बाजारत पैसे आल्यास 16 मार्चपर्यंत 15 लाख 44 हजार कोटी रुपये चलनात येतील. त्यामुळेच 16 मार्चपर्यंत चलनकल्लोळ संपेल, असं बोललं जातंय.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले...
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले...
Who is Kalita Maji : दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणारी महिला थेट आमदार बनली, विधानसभेत पोहोचली!
दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणारी महिला थेट आमदार बनली, विधानसभेत पोहोचली!
West Bengal Election Result 2026: ज्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये पहिली सीट जिंकवून दिली त्यांनीच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला हद्दपार केलं, धक्कादायक आकडेवारी समोर
ज्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये पहिली सीट जिंकवून दिली त्यांनीच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला हद्दपार केलं, धक्कादायक आकडेवारी समोर
Harbhajan Singh On West Bengal Election Result 2026: भाजपमध्ये जाताच शांत राहिला; काल बंगालाचा निकाल लागताच धडाधड बोलला; हरभजन सिंग काय काय म्हणाला?
भाजपमध्ये जाताच शांत राहिला; काल बंगालाचा निकाल लागताच धडाधड बोलला; हरभजन सिंग काय काय म्हणाला?

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
Pune Crime Nasrapur Case: नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
Embed widget