एक्स्प्लोर

Delhi Pollution : राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात, पाच नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा बंद

सध्या दिल्लीतील हवा अत्यंत खराब आहे. त्यामुळे दिल्ली आणि परिसरात आरोग्य आणीबाणी म्हणजे हेल्थ इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. वाढत्या प्रदूषणाचा त्रास शालेय विद्यार्थांना होऊ नये म्हणून 5 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : हवेची गुणवत्ता खालवल्याने राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली आणि परिसरात आरोग्य आणीबाणी म्हणजे हेल्थ इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. शालेय मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी दिल्लीतील सर्व शाळा 5 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणानं (ईपीसीए) प्रदूषण नियंत्रणासाठी पाच नोव्हेंबरपर्यंत दिल्ली-एनसीआरमधील बांधकामांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. दरवर्षी दिल्लीमध्ये या कालावधीत प्रदूषणाचं प्रमाण उच्च असतं. याला दिवाऴीदरम्यान वाजवले जाणारे फटाके हे मोठं कारण आहे. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणानं दिलेल्या माहितीनुसार, सध्या दिल्लीतील हवा अत्यंत खराब आहे. याचा सर्वात जास्त त्रास शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना होतो. त्यामुळे सध्या खबरदारी म्हणून दिल्लीच्या शाळा 5 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवल्या जातील. तर नव्या बांधकामांमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी त्यावरही बंदी असेल. तसेच दिल्ली सरकारने शालेय विद्यार्थ्यांना त्रास होउ नये म्हणून मास्कचे वाटप देखील केले आहे. ईपीसीएने दिल्लीसह, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या सचिवांनाही पत्र पाठवून आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहे. हवामान गुणांक 0 ते 50 असेल तर हवेची गुणवत्ता चांगली समजली जाते. सध्या दिल्लीतील सर्वच भागात ही पातळी तब्बल 400 ते 500 च्या घरात आहे. 400 ते 500 हा हवामान गुणांक सर्वात निकृष्ट दर्जाचा समजला जातो. थोडक्यात दिल्लीकर या हवेतून दररोज सिगारेटचं एक पाकीट शरीरात घेत आहे, अशी अवस्था झाली आहे. Delhi Pollution | वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये 'हेल्थ इमर्जन्सी' जाहीर | ABP Majha एनसीआरमध्ये 'हेल्थ इमर्जन्सी' जाहीर करण्यात आली आहे. हेल्थ इमर्जन्सीमुळे सरकारने शाळांना 5 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. तसेच कन्स्ट्रक्शनची कामेही 5 नोव्हेंबर पर्यंत थांबवण्याचे आदेश दिले आहे. तसेच पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणानं (ईपीसीए) प्रदूषण नियंत्रणासाठी पाच नोव्हेंबरपर्यंत दिल्ली-एनसीआरमधील बांधकामांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. वाहनांमुळे होणारं प्रदूषण हे दिल्लीतली हवा खराब होण्याचं एक कारण तरच आहे. त्यामुळेच यंदाही ऑड अॅन्ड इव्हनचा प्रयोग केला जात आहे. पण प्रदूषण नियंत्रणासाठी प्रमुख उद्योग शहराच्या बाहेर नेणं, पंजाब-हरियाणातून येणाऱ्या पाचटीच्या धूरावर उपाय शोधणं या प्रमुख उपायांकडे मात्र कुणाचं लक्ष जात नाही आणि त्यामुळेच दरवर्षी दिल्लीकर प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Wadettiwar on  Dharamrao Baba Atram : आत्रम यांच्या मुलीचा पराभव होईल - विजय वडेट्टीवारShaikh Subhan Ali :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
Embed widget