एक्स्प्लोर

Delhi Election Results | मनोज तिवारींच्या त्या ट्वीटवर ट्रोलधाड

अरविंद केजरीवाल आपल्या विजयाची हॅट्रीक करण्यासाठी तयार आहेत. अशातच सुरुवातीच्या कलापासूनच पिछाडीवर असलेला भाजपला सोशल मीडियावर मात्र ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांची नेटकऱ्यांना आठवण येत आहे. कारणही तसंच आहे.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या सर्व जागांचे कल हाती आलेले आहेत. त्यानुसार आम आदमी पार्टी पुन्हा एकदा दिल्ली जिंकण्यात यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे. अरविंद केजरीवाल आपल्या विजयाची हॅट्रीक करण्यासाठी तयार आहेत. अशातच सुरुवातीच्या कलापासूनच पिछाडीवर असलेला भाजपला सोशल मीडियावर मात्र ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांची नेटकऱ्यांना आठवण येत आहे. कारणही तसंच आहे. 8 फेब्रुवारी रोजी मतदानानंतर मनोज तिवारी यांनी एक ट्वीट केलं होतं. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, 'सर्व एक्झिट पोल खोटे ठरणार आहेत. तुम्ही माझं हे ट्वीट सांभाळून ठेवा. भाजप दिल्ली विधानसभेत 48 जागांवर विजय मिळवणार आहे. आता सर्व जागांचे कल हाती आल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झालं आहे.

Delhi Election Results | मनोज तिवारींच्या त्या ट्वीटवर ट्रोलधाड

Delhi Election 2020 | निवडणूक निकालांपूर्वीचं अलका लांबा यांचं 'हे' ट्वीट चर्चेत

Delhi Election Results | मनोज तिवारींच्या त्या ट्वीटवर ट्रोलधाड

भाजप नेत्यांनी केले होते दावे

भाजपचे प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी आणि खासदार प्रवेश वर्मा यांसारख्या अनेक भाजप नेत्यांनी दिल्ली विधानसभेत भाजप निवडून येणार असल्याचे दावे केले होते. दोन्ही नेत्यांनी याबाबत ट्वीट केलं होतं. मनोज तिवारी यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं की, 'हे सर्व एक्झिट पोल खोटे आहेत. तुम्ही माझं हे ट्वीट सांभाळून ठेवा. भाजप दिल्ली विधानसभेत 48 जागांवर विजय मिळवणार आहे. कृपया ईव्हीएमला दोष देण्यासाठी आतापासूनच कारणं शोधू नका.' तसेच प्रवेश वर्मा निवडणूक प्रचारादरम्यान प्रषोभक भाषण करत असल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर बंदी आणली होती.

सोशल मीडियावर ट्रोल झाले भाजप नेते

सध्या मनोज तिवारींच्या या ट्वीटच्या आधारावर नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. काही लोक त्यांचे ट्वीट रिट्वीट करत आहेत, तर काही कमेंट करत आहेत.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (11 फेब्रुवारी) जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कलांमध्येच आम आदमी पक्षाने आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. तर भारतीय जनता पक्ष 13 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला मात्र अद्याप एकाही जागेवर खातं उघडता आलेलं नाही. अशातच दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे कल हाती आलेले आहेत. त्यानुसार, दिल्लीत आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन होणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.

संबंधित बातम्या : 

Delhi Election Results LIVE UPDATES | उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पिछाडीवर

Delhi Election Results | भाजपचा अहंकार दिल्लीकरांनी उतरवला : अनिल परब

Delhi Election Results | महाराष्ट्रातून नेत्यांची रसद पुरवूनही दिल्लीत भाजप अपयशी

महत्त्वाच्या बातम्या

Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Embed widget