एक्स्प्लोर

सकारात्मक बातमी! नवीन कोरोना संक्रमित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

भारतात नवीन कोरोना संक्रमित रुग्णांपेक्षा बरे होणार्‍या रुग्णांची संख्या जास्त आहे. या व्यतिरिक्त अॅक्टीव रुग्णांची संख्याही सातत्याने कमी होत आहे. कोरोना संसर्गाने सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतासाठी ही दिलासादायक बाब आहे.

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या आजाराने संक्रमित देशांमध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर कोविड 19 मुळे झालेल्या मृत्यूंच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशात एक दिलासा देणारी बातमी आली आहे. भारतात कोरोना रुग्णांचा रिकवरी रेट दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन संक्रमित रूग्णांच्या तुलनेत बरे होणार्‍या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत आहे.

गेल्या चोवीस तासांत भारतात 92,043 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. तर संसर्ग झालेल्या 88,600 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सोबतचं 1124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना संक्रमित रूग्णांची एकूण संख्या 59,92,532 आहे तर आतापर्यंत 94,503 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या 9,56,402 अॅक्टीव रूग्ण आहेत तर आतापर्यंत 49,41,627 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा खर्च 80 हजार कोटी, सरकारकडे तेवढे पैसे आहेत का? अदर पूनावाला यांचा सवाल

देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या लोकांची संख्याही सतत वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या नवीन कोरोना रुग्णांपेक्षा जास्त आहे.

  • 19 सप्टेंबर 93,337 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 95,880 रुग्ण बरे झाले.
  • याचप्रमाणे 22 सप्टेंबरला 75,083 नवीन कोरोना संक्रमित झाले तर बरे होणाऱ्यांची संख्या तब्बल 1,01,468 इतकी आहे.
  • तर 26 सप्टेंबरला 85,362 लोकांना कोरोनाची लागण झाली तर 93,420 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

भारतात संसर्गातून रिकवर होण्याची वेग वाढत आहे.

  • 6 जुलै रोजी रिकवरी रेट 60.85% होता.
  • 1 ऑगस्ट रोजी रिकवरी रेट 64.52% होता.
  • 20 ऑगस्ट रोजी रिकवरी रेट 73.90% होता.
  • 1 सप्टेंबर रोजी रिकवरी रेट 76.93% होता.
  • 11 सप्टेंबर रोजी रिकवरी रेट 77.65% होता.
  • 20 सप्टेंबर रोजी रिकवरी रेट 79.68% होता,
  • 27 सप्टेंबर रोजी हा दर वाढून 82.46% झाला.

रिकवरी रेट म्हणजे मृत्यूचे प्रमाण कमी होत असताना संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. 27 सप्टेंबर रोजी देशात मृत्यूचे प्रमाण 1.58% होते. त्याचवेळी, रुग्ण संसर्गातून बरे होत असताना अॅक्टीव रुग्णांची संख्याही कमी होत आहे. 19 सप्टेंबरला 10,13,964 अॅक्टीव रुग्ण होते तर 24 सप्टेंबरला हीच संख्या 9,66,382 आली आहे. 27 सप्टेंबरपर्यंत ही संख्या आणखी कमी होऊन 9,56,402 वर गेली. म्हणजेच, दररोज बरे होणार्‍या रुग्णांची संख्या वाढत असल्याने अॅक्टीव रुग्णांची संख्याही कमी होत आहे.

Corona Vaccine | केईएम रुग्णालयात आजपासून ऑक्सफर्ड आणि सिरमच्या लशीची चाचणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget