एक्स्प्लोर

Corona Update : गेल्या 24 तासात देशात 2.57 लाख नव्या कोरोना रुग्णांची भर, सक्रिय रुग्णसंख्येत घट

Coronavirus in India : देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत एक लाख चार हजार 525 ने घट झाली आहे. तरीही जगातील दरदिवशी वाढणाऱ्या रुग्णसंख्येपैकी 40 टक्के रुग्ण एकट्या भारतात वाढत आहेत.

नवी दिल्ली : भारतातील कोरोनाची दुसरी लाट काही केल्या नियंत्रणात येत नाही. दरदिवशी कोरोनाची रुग्णसंख्या अडीच लाखांचा टप्पा पार करताना दिसतेय. शुक्रवारी देशात 2,57,299 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली असून 4,194 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 3,57,630 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या आधी गुरुवारी देशात 2.59 लाख नव्या रुग्णांची भर पडली होती तर 4209 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 

देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत एक लाख चार हजार 525 ने घट झाली आहे, तसेच कोरोनाच्या नव्या रुग्णांंपेक्षा कोरोनातून बऱ्या होणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. ही काहीसी दिलासादायक बाब आहे. 

शुक्रवार, 21 मे पर्यंत देशात एकूण 19 कोटी 33 लाख 72 हजार 819 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात 14 लाख 58 हजार 895 कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत देशात 32 कोटी 64 लाखांहून जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

देशातील आजची कोरोना स्थिती : 

  • एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 62 लाख 89 हजार 290
  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 30 लाख 70 हजार 365
  • एकूण सक्रिय रुग्ण : 29 लाख 23 हजार 400
  • कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 95 हजार 525

देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 1.12 टक्के इतकं आहे तर रुग्ण मुक्त होण्याचं प्रमाण 87 टक्के इतकं आहे. जगातील कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या आणि सक्रिय रुग्णांच्या बाबतील भारताचा दुसरा क्रमांक आहे.

राज्यातील स्थिती 
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. शुक्रवारी राज्यातील 44,493 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 29,644 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  आजपर्यंत एकूण 50,70,801 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  91.7 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात शुक्रवारी 555 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,24,41,776 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,27,092 (17.4 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 27,94,457 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 20,946 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज एकूण 3,67,121 सक्रिय रुग्ण आहेत.  

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
Monsoon Alert: आनंदवार्ता ! केरळमध्ये अखेर मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी 'सुखसरीं'चा वर्षाव? वाचा सविस्तर माहिती
आनंदवार्ता ! केरळमध्ये अखेर मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी 'सुखसरीं'चा वर्षाव? वाचा सविस्तर माहिती
LPG Cylinder Price Hike : एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ, आजपासून नवे दर लागू होणार; मुंबईपासून दिल्लीपर्यंत, कुठे किती दर?
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ, आजपासून नवे दर लागू होणार; मुंबईपासून दिल्लीपर्यंत, कुठे किती दर?

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
Abdul Sattar: भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
Shekhar Gore Satara : ​
​"साहेब, मी नक्की कुठे चुकलो?" विधानपरिषदेची उमेदवारी हुकल्याने शेखर गोरेंची देवेंद्र फडणवीसांना भावनिक साद
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
Vidhan Parishad Election 2026: काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
Pune Vidhan Parishad Election 2026: आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
Embed widget