एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी

मुंबईतील वार्ड क्रमांक 190 मधून शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली पाटणकर विजयी झाल्या आहेत. येथील वार्डातून भाजपच्या उमेदवार शितल गंभीर पराभूत झाल्या आहेत.

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचे (Election) निकाल हाती आले असून मुंबईसह राज्यातील जवळपास 25 महापालिकेत भाजप-महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. विशेष म्हणजे मुंबईनंतर सगळ्यांचं लक्ष लागलेल्या पुणे महापालिकेत भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला असून भाजपचाच (BJP) महापौर येथील महापालिकेत दिसून येईल. मात्र, मुंबईतील काही जागांवर भाजप महायुतीला धक्काही बसला आहे. त्यामध्ये, माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा पराभव झाला आहे. तर, दादरचा गड ठाकरेंनी राखला. मात्र, आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळीत एकनाथ शिंदेंचा एक उमेदवार विजयी झाला आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईतील सभेत नाव घेतलेल्या शितल गंभीर देसाई वॉर्ड 190 मधून अवघ्या 125 मतांनी विजयी झाल्या आहेत. मात्र, येथील ठाकरेंच्या उमेदवाराने रिकाऊंटींगची मागणी केली आहे. 

मुंबईतील वार्ड क्रमांक 190 मधून शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली पाटणकर पराभूत झाल्या असून शीतल गंभीर अवघ्या 125 मतांनी विजयी झाल्याने वार्डात राडा सुरू झाला आहे. वैशाली पाटणकर यांनी पुनर्मोजणीची मागणी केली आहे. येथील वार्डातून भाजपच्या उमेदवार शीतल गंभीर आणि वैशाली पाटणकर यांच्यात थेट लढत होती. आदित्य ठाकरेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरली होती. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील जाहीर सभेतून आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. आदित्य ठाकरेंवर टीका करताना, आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी माझी गरज नाही, त्यांच्यासाठी आमच्या उमेदवार शीतल गंभीर याच पुरेशा आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले होते.

भाजपच्या आक्रमक महिला उमेदवार

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेल्या टीकेला भाजपकडून शीतल गंभीर यांच्याकडून प्रत्त्युतर देण्यात येत होतं. शीतल गंभीर यांच्याकडून काँग्रेस-राष्ट्रवादीने गेल्या 70 वर्षात काय केलं, 2014 च्या अगोदरपासून राज्यात आणि देशात काँग्रेसचीच सत्ता होती. मात्र, तरीही गरिबांचा विकास का झाला नाही, असा सवाल गंभीर यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे, भाजपच्या आक्रमक महिला उमेदवार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्याच पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथील सभेतून मुख्यमंत्र्‍यांनी शितल गंभीर यांचं नाव घेऊन आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. आदित्य ठाकरेंनी दिलेल्या चॅलेंजला आमच्या शीतल गंभीर उत्तर देतील असे फडणवीसांनी म्हटले होते. मात्र, त्याच शीतल गंभीर वार्ड 190 मधून 125 मतांनी विजयी झाल्या आहेत. मात्र, येथे वैशाली पाटणकर यांनी रिकाऊंटींगची मागणी केल्याने नवा वाद उपस्थित झाला आहे. 

हेही वाचा

वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून शिवसेनेचा नगरसेवक

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
Embed widget