![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Corona Death : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 हजार नुकसान भरपाई मिळणार, केंद्राच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी
Compensation For Covid Deaths : एखाद्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 30 दिवसांच्या आत त्याच्या कुटुंबाला 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.
![Corona Death : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 हजार नुकसान भरपाई मिळणार, केंद्राच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी Compensation For Covid Deaths supreme court approves compensation of 50 thousand rupees for death due to corona Corona Death : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 हजार नुकसान भरपाई मिळणार, केंद्राच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/01/1312c37b827cb327c971d3bced0157f1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला 50 हजार नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. त्या प्रस्तावाला याचा न्यायालयाने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारकडून करण्यात येणारी ही मदत इतर कल्याणकारी योजनांपेक्षा वेगळी असणार आहे असं केंद्र सरकारने न्यायालयात स्पष्ट केलं आहे. कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा दावा केल्यास संबंधित कुटुंबाला 30 दिवसांच्या आत नुकसान भरपाई मिळणार आहे.
कोरोना मृतांच्या कुटुंबाला देण्यात येणारी ही मदत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कोषातून देण्यात येणार आहे. 23 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती एमआर शाह आणि न्यायमूर्ती एएस बोपन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी केंद्राला कोरोना मृतांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले होते.
काय आहे प्रकरण?
30 जून रोजी दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने देशात कोरोनामुळे झालेल्या प्रत्येक मृत्यूची भरपाई देण्यास सांगितले होते. न्यायालयाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला 6 आठवड्यांत भरपाईची रक्कम निश्चित केल्यानंतर राज्यांना माहिती देण्यास सांगितले होते. अशा आपत्तीमध्ये लोकांना नुकसान भरपाई देणे हे सरकारचे वैधानिक कर्तव्य असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. पण नुकसानभरपाईची रक्कम किती असेल हे ठरवण्याचे काम न्यायालयाने सरकारवर सोडले होते.
या प्रकरणाच्या याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला होता की मृत व्यक्तींना थेट रुग्णालयातून अंतिम संस्कारांसाठी नेले जात होते. ना त्याचे शवविच्छेदन झाले आहे, ना मृत्यूच्या प्रमाणपत्रात असे लिहिले आहे की मृत्यूचे कारण कोरोना आहे. अशा स्थितीत भरपाई योजना सुरू झाली तरी लोक त्याचा लाभ घेऊ शकणार नाहीत. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रांमध्ये मृत्यूचे कारण स्पष्टपणे लिहिले पाहिजे. प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ केली पाहिजे. जर दिलेल्या प्रमाणपत्राविरोधात कुटुंबाची काही तक्रार असेल तर ती सोडवली पाहिजे.
गोवा सरकारकडून दोन लाखांची मदत
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं की, आम्ही कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये वितरित करण्यास सुरुवात केली आहे आणि ज्यांनी COVID19 मुळे कुटुंबातील सदस्य गमावला आहे. कोविडमुळे त्यांच्या पारंपारिक व्यवसायात नुकसान झालेल्या व्यक्तीला आम्ही 5,000 रुपये देखील देत आहोत. यामुळे जवळपास 50,000 लोकांना फायदा होईल, असं सावंत यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)