एक्स्प्लोर
पाकविरोधात विचार करुन करावाई करा, चीनचा भारताला इशारा

नवी दिल्ली : भारताने दबाव वाढवल्यानंतर चीन आणि पाकिस्तानमधील मिलीभगत समोर आली आहे. पाकिस्तानविरोधात कारवाई करताना संपूर्ण विचार करुन करा, असा इशारा चीनने भारताला दिला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनची एकूण 46 अब्ज रुपयांची गुंतवणूक आहे. त्यामुळे भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणतीही कारवाई केल्यास त्याचा सरळ फटका चीनला बसणार आहे. त्याचवेळी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याची भारताची मोहीम यशस्वी होताना दिसते आहे. कारण रशियाने पाकिस्तानसोबतचा MI-35 हेलिकॉप्टर देण्याचा करार रद्द केला आहे. शिवाय, पाकव्याप्त काश्मीरमधील एकत्रित युद्ध सरावही होणार नाही.
Before You Go
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















