एक्स्प्लोर

Mission Moon Chandrayaan-3: चांद्रयान-3 पोहोचलं अन् चंद्रावरच्या जमिनींच्या किमती वाढल्या, पण चंद्रावर जमीन खरेदी करणं कायदेशीर आहे?

Chandrayaan 3: आऊटर स्पेस ट्रीटीनुसार, कोणत्याही देशाला चंद्र किंवा कोणत्याही ग्रहावर मालकी हक्क नाही, त्यामुळे चंद्रावर जमीन खरेदी करणं बेकायदेशीर आहे.

Mission Moon Chandrayaan-3: भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) नं बुधवारी (23 ऑगस्ट 2023) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यशस्वी ठरलेला भारत (INDIA) हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारताच्या या यशाचं संपूर्ण जगभरातून कौतुक होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) च्या यशानंतर जगभरात चांद्रयान, चंद्र यांचीच चर्चा होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत चंद्रावर जमिनीची खरेदी-विक्री करणारेही काही कमी सक्रिय नाहीत, पण चांद्रयान चंद्रावर पोहोचल्यापासूनच अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चंद्रावर जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांना खरोखरंच काही कायदेशीर आधार आहे का? चंद्रावर मानवी वसाहती स्थापित होऊ शकतात का? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

चंद्रावर जमीन खरेदी करणाऱ्यांच्या यादीत अनेक बॉलिवूड कलाकारांचीही नावं आहेत. शाहरुख खानला एका चाहत्यानं चंद्रावर जमीन भेट दिली होती. अंतराळाबाबत कुतूहल असलेला दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं 2018 मध्ये चंद्रावर जमीन खरेदी केली होती. कलाकारांनी खरेदी केलेली ही जागा चंद्राच्या 'सी ऑफ मॅक्सिवो' भागात आहे. याशिवाय अनेक सामान्य नागरिकांनीही चंद्रावर जमीन खरेदी केल्याचा दावा केला आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की, चंद्रावर जमीन कशी विकत घेतली जाते? आणि इथली जमीन कोण विकतंय? अशातच चंद्रावर जमीन खरेदी करणं कायदेशीर आहे की, बेकायदेशीर? यांसारख्या अनेक प्रश्नांनी सर्वसामान्यांच्या मनात काहूर माजलं आहे. 

चंद्रावर जमीन खरेदी करणं कायदेशीर की बेकायदेशीर?

10 ऑक्टोबर 1967 च्या आऊटर स्पेस ट्रीटीनुसार, चंद्रावर जमीन खरेदी करणं बेकायदेशीर आहे. आऊटर स्पेस ट्रीटी हा अवकाशातील पहिला कायदेशीर दस्तऐवज होता, जो पृथ्वीव्यतिरिक्त चंद्रावर किंवा इतर कोणत्याही ग्रहावर जमीन खरेदी करण्यास कायदेशीर परवानगी देत ​​नाही. या करारावर भारतासह 109 देशांनी स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार, आऊटर स्पेसवर कोणत्याही देशाचा अधिकार नाही. यामध्ये अंतराळवीरांच्या संदर्भात असं म्हटलं होतं की, अंतराळाचा अभ्यास करणं सर्व देशांच्या फायद्याचं आहे.             

वैयक्तिक हेतूंसाठी वापरण्याची परवानगी नाही

करारामध्ये, अंतराळ हे मानवजातीसाठी एक समान वारसा म्हणून वर्णन केलं गेलं आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या 2018 च्या वृत्तानुसार, दिल्लीतील साऊथ एशियन युनिव्हर्सिटीच्या कायदेशीर अभ्यास विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. स्टेलाना जॉली यांनी स्पष्ट केलं की, सामायिक वारसा याचा अर्थ असा आहे की, त्याचा वापर कोणीही वैयक्तिक कारणांसाठी करू शकत नाही. अधिकार हे प्रत्येकासाठी आहेत. आऊटर स्पेस ट्रीटी सरकारी अवकाश संस्थांना चंद्र आणि खगोलीय पिंडांमध्ये संशोधन करण्याचा अधिकार देतं. मात्र, कोणत्याही गैर-सरकारी संस्थेला याची परवानगी नाही.

चंद्रावरील जमीन कोण विकत आहे?

जर चंद्रावर जमीन विकत घेणं खरंच बेकायदेशीर आहे. मग मोठमोठ्या सेलिब्रिटी आणि इतरही लोक चंद्रावरची जमीन खरेदी केल्याचा दावा करतायत, त्यांना जमीन विकतंय कोण? मीडिया रिपोर्ट्सनुसार, लुना सोसायटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल लूनर रजिस्ट्री यांसारख्या कंपन्या चंद्रावर जमीन विकण्याचा दावा करत आहेत. अनेक देशांनी यासाठी त्यांना अधिकृत केलं असल्याचा या कंपन्यांचा दावा आहे. मात्र, जगभरातील देशांनी त्यांना अधिकृत परवानगी दिल्याचा कोणताही पुरावा या कंपन्यांकडे नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Ajit Pawar: सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress News : राज ठाकरेंमुळे काँग्रेसची कोंडी, महामोर्चावरून पक्षात उघड मतभेद
Mumbai Politics: MVA-मनसेचा उद्या 'सत्याचा विराट मोर्चा', चंद्रशेखर बावनकुळे यांचा थेट इशारा
Ajit Pawar : 'जाहीरनामा दिला म्हणून कर्जमाफी, पण सारखं सारखं होणार नाही' - अजित पवार
Manoj Jarange Patil : कर्जमाफीवरून बच्चू कडूंवर संतापले जरांगे पाटील
Powai Hostage Crisis: 'A Thursday' सारखं अपहरण, अभिनेत्री Ruchita Jadhav चा धक्कादायक खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Ajit Pawar: सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं
आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं
Embed widget