एक्स्प्लोर

नोटाबंदीने देशाला काय दिलं? अर्थसंकल्पातील 7 निर्णय

नवी दिल्ली : ब्रिटीशांची परंपरा मोडत मोदी सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पहिल्यांदाच रेल्वे आणि सर्वसामान्य अर्थसंकल्प एकत्र मांडला. जेटलींनी 2017- 18 या वर्षासाठी 21 लाख 47 हजार कोटींचं बजेट सादर केलं. त्यापैकी रेल्वेसाठी 1 लाख 31 हजार कोटीची तरतूद करण्यात आली. तर सर्वाधिक 2 लाख 74 हजार कोटीची तरतूद संरक्षण क्षेत्रासाठी आहे. नोटाबंदीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. नोटाबंदीनंतर संपूर्ण देश एटीएम, बँकेच्या रांगेत उभा राहिला. त्याच्या मोबदल्यात सरकारने या अर्थसंकल्पातून काय दिलं, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र अर्थसंकल्पात असे काही निर्णय घेण्यात आले, ज्याचं श्रेय नोटाबंदीला जातं. श्रीमंतांचं सरकार म्हणून मोदी सरकारवर नेहमी टीका केली जाते. मात्र सरकारने या टीकेलाही मोडून काढलं आहे. कारण अरुण जेटलींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून गरिबांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत, तर श्रीमंतांवर कराचा बोजा टाकण्यात आला आहे. नोटाबंदीने काय दिलं सांगणारे 7 निर्णय 1. श्रीमंतांकडून घेतलं, मध्यमवर्गीय, गरिबांना दिलं! अडीच लाख ते पाच लाख रुपयांच्या उत्पन्नावरील कर 10 टक्क्यांवरुन पाच टक्के करण्यात आला. आता 3 लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर कर द्यावा लागणार नाही. तर श्रीमंतांवर कराचा बोजा वाढवण्यात आला आहे. 50 लाख ते 1 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के करावर 10 टक्के अधिभार (सरचार्ज) द्यावा लागणार आहे. म्हणजेच वर्षाला 2 लाख 76 हजार 813 रुपये कराच्या स्वरुपात भरावे लागणार आहेत. एक कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक कमाई असणाऱ्यांना 30 टक्के करावर 15 टक्के अधिभार लागणार आहे. म्हणजेच गरीबांना सवलती देण्यासाठी सरकारने श्रीमंतांवर कराचा बोजा टाकला, ज्यामुळे फायदा आणि नुकसान म्हणण्यासाठी जागा उरली नाही. 2. शेतकऱ्यांसाठी तरतूदी शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याची तरतूद एक लाख कोटींवरुन 10 लाख कोटी रुपये करण्यात आली आहे. शेती कर्जासाठी पूर्वीच्या 9 लाख कोटींऐवजी आता 10 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सिंचनासाठीचा निधी 30 हजार कोटींवरुन 40 हजार कोटी रुपये करण्यात आला. सॉईल हेल्थ कार्डवर भर, कृषी विज्ञान क्षेत्रासाठी 100 नवीन प्रयोगशाळा बनवण्यात येतील. पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी 9 हजार कोटींची तरतूद, मनरेगाची तरतूद 48 हजार कोटी रुपये करण्यात आली आणि 10 लाख तलाव तयार करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. 3. गावांच्या विकासावर भर 2019 पर्यंत एक कोटी पक्की घरं दिली जातील. देशातील सर्व गावांमध्ये 2018 पर्यंत वीज पोहचवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. गावांमध्ये सध्या 133 किमीचा रस्ता रोज तयार होत आहे, पूर्वी रोज 73 किमी रस्ता होत असे. 4. छोट्या उद्योगांना सवलती सरकारने छोट्या उद्योगांवरील कॉर्पोरेट कराचं ओझं कमी केलं आहे. कॉर्पोरेट कर 30 टक्क्यांवरुन 25 टक्के करण्यात आला आहे. 50 कोटी रुपयांपर्यंत वार्षिक आर्थिक टर्नओव्हर असणाऱ्या कंपन्यांना या निर्णयाचा फायदा होईल. जवळपास 96 टक्के कंपन्या या श्रेणीमध्ये येतात. स्टार्टअपला चालना देण्यासाठी कंपन्यांना कराच्या सीमेत सात वर्षांसाठी सवलत देण्यात आली आहे. याशिवाय सरकारने आता परवडणाऱ्या घरांना पायाभूत सुविधांचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. रिअल इस्टेट क्षेत्राची ही मागणी होती. यामुळे घर बनवण्यासाठी खर्च कमी येईल आणि गुंतवणूकही वाढेल, परिणामी मध्यमवर्गीयांनाही या निर्णयाचा फायदा होईल. 5. वृद्धांसाठी योजना एलआयसीकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आणल्या जातील, ज्यामुळे त्यांना 8 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल. शिवाय ज्येष्ठांसाठी आधार आधारित कार्ड दिलं जाईल, ज्यामध्ये त्यांच्या आरोग्यासंबंधीत सर्व माहिती असेल. 6. राष्ट्रीय परीक्षा संस्थेची घोषणा आयआयटी, वैद्यकीय प्रवेश परीक्षा यांसाठी नवीन राष्ट्रीय परीक्षा संस्थेची स्थापना करण्याची घोषणा सरकारने केली आहे. म्हणजेच आता आयआयटी, सीबीएसई आणि एआयसीटीसी यांच्यामार्फत प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. 7. तीन लाखांपेक्षा जास्तीचा व्यवहार रोखीने नाही काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी 3 लाख रुपयांपेक्षा जास्तीच्या रोखीच्या व्यवहारावर बंदी घातली आहे. त्यामुळे आता 3 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे व्यवहार ऑनलाईन, चेकने किंवा इतर डिजिटल पद्धतीने करावे लागतील.

महत्त्वाच्या बातम्या

PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
Crime News: मोबाईल हप्त्यावरून तरुणाचं अपहरण, 5 दिवस डांबून जबरदस्तीने काम करायला लावलं; ब्लड बँकेत नेऊन रक्तही काढलं अन्..., आरोपींकडून क्रूरतेचा कळस
मोबाईल हप्त्यावरून तरुणाचं अपहरण, 5 दिवस डांबून जबरदस्तीने काम करायला लावलं; ब्लड बँकेत नेऊन रक्तही काढलं अन्..., आरोपींकडून क्रूरतेचा कळस
India Pakistan Navy Ship Collision: भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौका अरबी समुद्रात एकमेकांना धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौका अरबी समुद्रात एकमेकांना धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
Google Pay PhonePe UPI Latest Marathi News: Gpay पासून PhonePe पर्यंत...; कोणकोणत्या UPI पेमेंटवर आता किती रुपयांवर किती शुल्क लागणार?; A टू Z माहिती
Gpay पासून PhonePe पर्यंत...; कोणकोणत्या UPI पेमेंटवर आता किती रुपयांवर किती शुल्क लागणार?; A टू Z माहिती

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
Rahul Gandhi : पीएम मोदी UPI Tax मागं घ्या, इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींची मागणी, ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी शरणागती स्वीकारल्याचं टीकास्त्र
पीएम मोदी UPI Tax मागं घ्या,राहुल गांधींची इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत मागणी
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
Vasai News: पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात एमी फाऊंडेशनची हायकोर्टात याचिका, परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका, परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार
Sanjeev Sonawane Latur Crime: संजीव सोनवणेंच्या पत्रातील वाक्याने गूढ वाढवलं, पण पोलिसांना वेगळाच संशय, खात्री पटवण्यासाठी तज्ज्ञांची मदत
संजीव सोनवणेंच्या पत्रातील वाक्याने गूढ वाढवलं, पण पोलिसांना वेगळाच संशय, खात्री पटवण्यासाठी तज्ज्ञांची मदत
Embed widget