एक्स्प्लोर

ऐतिहासिक अयोध्या प्रकरणाचा निकाल सुनावणाऱ्या 'त्या' पाच न्यायमूर्तींच्या कारकिर्दीचा आढावा

सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आज अयोध्याप्रकरणी खटल्याचा निकाल दिला आहे. या घटनापीठात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचुड, न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि जस्टीस अशोक भूषण यांचा समावेश होता.

नवी दिल्ली : मोठ्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमधील बहुचर्चित वादग्रस्त जागेबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात निर्णय देताना अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला देण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येमध्ये पर्यायी पाच एकर जागा देण्याचा देखील निर्णय सुनावला आहे. सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. या घटनापीठात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचुड, न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि जस्टीस अशोक भूषण यांचा समावेश होता.

सरन्यायाधीश रंजन गोगोई रंजन गोगोई हे सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश आहेत. कारण एका आठवड्यात म्हणजे 17 तारखेला गोगोई सेवानिवृत्त होणार आहेत. पण त्यापूर्वी बरेच महत्त्वपूर्ण निकाल त्यांच्या कार्यकाळात द्यायचे होते. त्यातील सर्वात महत्त्वाचा निकाल अर्थातच राम मंदीराचा होता.

गोगोई यांनी पदवीनंतर 1978 साली बार काऊन्सिलमध्ये प्रवेश केला. गुवाहाटी उच्च न्यायालयात वकीली केली. 2001 साली गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. 2010 साली पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात नेमणूक झाली. 2012 पासून सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून काम करत आहेत. 2018 च्या जानेवारी महिन्यात तत्कालिन सरन्यायाधीशांविरोधात ऐतिहासिक पत्रकार परिषद घेणाऱ्या 4 वरिष्ठ न्यायमूर्तींमध्ये गोगोई होते.

राफेल, सबरीमला या गेल्या काही दिवसांतल्या महत्त्वाच्या खटल्यांचा निकाल गोगोई यांनी दिला. परंतु त्या दोन्हीवर रिव्ह्यू पिटीशन असल्याने त्यांना निवृत्तीपूर्वी हे निर्णय पुन्हा द्यायचे आहेत. 'चौकीदार चोर है' या राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका आहे, त्यावरही गोगोई यांना निवृत्तीपूर्वी निर्णय द्यायचा आहे.

देशाचे 47 वे सरन्यायाधीश शरद बोबडे  येत्या 18 तारखेला जस्टीस बोबडे भारताचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त होतील. नागपूरच्या शरद बोबडे यांनी 2000 सालापासून मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आहे. 2012 साली मध्य प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2013 पासून ते सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून काम पाहात आहेत

बीसीसीआयवर निर्बध घालणारा निर्णय देणाऱ्या खंडपीठामध्ये शरद बोबडेंचा समावेश होता. आधार कार्डाच्या वैधतेबद्दलचा मोठा निर्णय देणऱ्या खंडपीठातही जस्टीस बोबडेंचा समावेश होता. तसेच 2016 साली प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णयही त्यांनीच दिला आहे.

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचुड राममंदीर केसमधलं शरद बोबडे यांच्यानंतरचं दुसरं मराठी नाव. चंद्रचुड यांच्या घरात न्यायदानाची मोठी परंपराच आहे. त्यांचे वडीलही देशातले मोठे न्यायाधीश होते. सुप्रीम कोर्टात येण्यापूर्वी चंद्रचुड हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

2016 पासून ते सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती आहेत. महिलांना सबरीमला मंदीरात प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या खंडपीठात जस्टीस चंद्रचूड यांचा समावेश होता. कलम 377 रद्द करत समलिंगी संबंधांना मान्यता देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयातही त्यांचा सहभाग होता. कोरेगाव भीमा प्रकरणाशी संबंधित खटलेही चंद्रचुड यांच्या खंडपीठाकडे होते.

न्यायमूर्ती अशोक भूषण न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी 1979 साली अलाहाबाद विद्यापीठातून वकिलीची पदवी घेतली. त्याच वर्षी उत्तर प्रदेशात वकिली सुरु केली. केरळ हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून 2014 साली सुरुवात केली. त्यानंतर एकच वर्षात 2015 साली केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमणूक.

2016 सलापासून सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून काम करत आहेत. आधार कार्डच्या वैधतेबद्दलचा लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय ज्या खंडापीठाने घेतला त्यात अशोक भूषण होते. इतर समाजात लग्न करणाऱ्या पारशी महिलांना अग्यारीमध्ये (फायर टेंपल) जाण्याचा अधिकार देणारा निर्णय भूषण यांचाच.

न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर एस. अब्दुल नजीर हे अयोध्येवर निकाल देणाऱ्या खंडपीठातील एकमेव मुस्लीम न्यायमूर्ती आहेत. 2003 सालापासून कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर 2017 साली त्यांची सुप्रीम कोर्टात नेमणूक झाली. प्रायव्हसी हा प्रत्येकाचा अधिकार आहे, असा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या खंडपीठात त्यांचा समावेश होता.

गेल्या काळातील सर्वात मोठा तिहेरी तलाकबद्दलचा निर्णय नजीर यांच्या खंडपीठाचा होता. अयोध्या केसमध्ये नजीर यांचं मत काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.

रामलल्लाचं कायदेशीर अस्तित्व कोर्टाला मान्य, रामलल्लाला कोर्टाने पक्षकार मानलं 

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Australia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी; मेलबर्न पोलिसांकडून हाय-अलर्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी; मेलबर्न पोलिसांकडून हाय-अलर्ट
Crime News: पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Embed widget