एक्स्प्लोर

वेतन वाढीत 9.5 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयामुळे आर्थिक विकासावर परिणाम होत असताना, दुसरीकडे चालू वर्षी नोकरदार वर्गाला दिलासा देणारी बातमी आहे. कारण यंदा जवळपास 10 टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर कमी असला, तरी तो समाधानकारक असल्याचे बोललं जात आहे. एऑन ह्यूट या रिसर्च एजन्सी केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2017 मध्ये विविध क्षेत्रातील नोकरदारांना मिळणाऱ्या पगारात 9.5 टक्क्यांची वाढ होऊ शकते. गेल्या काही वर्षात पगार वाढीचे प्रमाण कमी जास्त होत असताना, एजन्सीचा हा अंदाज नोकरादार वर्गाला दिलासा देणारा आहे. गेल्या दहा वर्षातील आकडेवारी पाहिली तर 2007 मध्ये हा दर 15 टक्क्यांवर होता. पण 2009 मधील जागतिक मंदीमुळे हा दर 6 टक्क्यांवर घसरला. 2011 मध्ये यात दुपटीने वाढ होऊन हा दर 12 टक्क्यांवर पोहोचला. पण त्यानंतरच्या वर्षांमध्ये हा अकडा 10 टक्क्यांवर घसरला, आणि अनेक वर्षे तिथंच टिकून होता. 2016 मध्ये यात काही अंशांनी वाढ होऊन तो 10.3 टक्क्यांवर पोहोचला. एजन्सीच्या मते, हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असला, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनांच्या तुलनेत भारतीय उद्योग जगतात स्थिरता दर्शवतं. कारण, आंतरराष्ट्रीय स्तरावरील गेल्या वर्षातील ब्रेक्झिट आणि नुकतेच अमेरिकेतील सत्ता परिवर्तनामुळे, शिवाय नोव्हेंबरमधील देशातील नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती होती. पण या सर्व घटनांचा भारतीय उद्योग विश्वाने समर्थपणे मुकाबला केला. एजन्सीचे सहकारी आनंदोरुप घोष यांच्या मते, ''राजकीय स्थित्यंतरे आणि आर्थिक अडथळे यामुळे कामकाजावर परिणाम झाला. मात्र, या वर्षी वेतन वाढीची गती मंदावताना दिसत आहे, आणि याची जागा उत्पादन आणि प्रदर्शनाने घेतली आहे.'' वास्तविक, अनेक कंपन्यांमध्ये वेतन वाढीचा दर हा महागाई दरावर आधारीत नसतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये किरकोळ बाजारपेठेतल्या महागाई दरात घट झाल्याने, त्याचा आधार घेत, अनेक कंपन्यांनी आपले पगारांचे बजेटही आखडतं घेतलं. याशिवाय या संशोधनातून चांगल्या कामगारांची टक्केवारीही घटली असल्याचे समोर आलं आहे. या दरात घट होऊन 7.5 टक्के झाली आहे. गेल्या 21 वर्षातील सर्वात मोठी घट असल्याचं एजन्सीचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे गेल्या पाच वर्षात नोकऱ्या सोडण्याच्या प्रमाणातही घट झाली आहे. 2016 मध्ये हा दर 16.4 टक्के होता. तर काही चतुर मंडळींमध्ये एक नोकरी सोडून दुसरी नोकरी पकडण्याचे प्रमाण 7.3 वरुन 12.3 टक्क्यांवर पोहोचले होते. यासाठी पुढे जाण्याच्या मर्यादित संधी, आणि जबाबदाऱ्यांमध्ये झालेली वाढ ही कारणे असल्याचे सांगितले जात आहे. कोणत्या क्षेत्रात किती पगार वाढू शकेल?

औद्योगिक क्षेत्र

वेतन वाढीचे प्रमाण (टक्क्यांमध्ये)

कंज्यूमर इंटरनेट

12.4

लाईफ सायन्स (Medical, Paramedical, Pharmacy)

11.3

प्रोफेशनल सर्व्हिसेस

10.9

केमिकल्स

10.3

मनोरंजन

10.3

ऑटोमोटिव्ह

10.3

कंज्यूमर प्रोडक्ट्स

10.2

इंजिनिअर/ मॅन्यूफॅक्चरिंग

9.9

आयटीईएस

9.9

हायटेक/ माहिती तंत्रज्ञान

9.7

रिटेल

9.4

आरई. इन्फ्रास्ट्रक्चर

9.2

हॉस्पिटॅलिटी/क्यूएसआर

9.0

टेलिकम्यूनिकेशन सर्व्हिसेस

8.9

इंजिनिअरिंग सर्व्हिसेस

8.9

ऊर्जा

8.9

मेटल्स

8.5

आर्थिक संस्था

8.1

ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक, शिपिंग

8.0

सिमेंट

7.6

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम, पहिल्यांदा म्हणाले इराण युद्ध संपणार आणि लगेचच आखाती देशात 10 हजार जवान पाठवले
US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम, पहिल्यांदा म्हणाले इराण युद्ध संपणार आणि लगेचच आखाती देशात 10 हजार जवान पाठवले
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
20 लाख बॅरल तेल घेऊन इराणचं जहाज गुजरातमध्ये दाखल, मात्र भारताने तेल स्वीकारण्यास दिला नकार, नेमकं कारण काय? 
20 लाख बॅरल तेल घेऊन इराणचं जहाज गुजरातमध्ये दाखल, मात्र भारताने तेल स्वीकारण्यास दिला नकार, नेमकं कारण काय? 
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget