एक्स्प्लोर

सर्व राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हं रद्द करा : अण्णा हजारे

निवडणूक आयोगाला आपण यासाठी अनेकदा पत्रं लिहिली असून भविष्यात कोर्टाची दारंही ठोठावू, असा इशारा अण्णांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिला आहे.

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाचं रणशिंग फुंकणाऱ्या अण्णा हजारेंच्या निशाण्यावर आता राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हंही आहेत. “निवडणूक लढताना पक्षांना राजकीय चिन्हांची गरज नाही, पक्षाच्या नावावर अनेक भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक निवडून येत असल्याने ही चिन्हंच गायब करा,” अशी एक नवीच मागणी अण्णांनी केली आहे. निवडणूक आयोगाला आपण यासाठी अनेकदा पत्रं लिहिली असून भविष्यात कोर्टाची दारंही ठोठावू, असा इशारा अण्णांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिला आहे. “घटनेच्या कलम 84 मध्ये निवडणुकीसंदर्भातले नियम दिले आहेत, त्यात कुठेही चिन्हाचा उल्लेख नाही. त्यामुळे चिन्हांची ही पद्धतच घटनाबाह्य असल्याचा अण्णांचा दावा आहे. चिन्हांच्या नावाखाली लोकांचे समूह निर्माण झाले, त्यातूनच भ्रष्टाचार-गुंडगिरी वाढली,” असा तर्कही त्यांनी लढवला आहे. “आज राजकीय पक्षांसाठी चिन्ह ही ओळख बनलेली असताना चिन्हंच गायब झाली तर या निवडणूक व्यवस्थेत अनागोंदी येणार नाही का असा प्रश्न विचारल्यावर, काहीही अनागोंदी होणार नाही, उलट देश चांगलाच चालेल. कारण त्यामुळे पक्ष ही व्यवस्थाच राहणार नाही असं उत्तर अण्णांनी दिलं. ही लढाई प्रदीर्घ असून त्यासाठी बराच संघर्ष करावा लागेल,” असंही अण्णांनी म्हटलं आहे. यासंदर्भात अण्णा लवकरच कोर्टातही याचिका दाखल करायच्या तयारीत आहेत. दरम्यान अण्णा नव्या आंदोलनाच्या तयारीत असताना त्यांनी या मुलाखतीत महाराष्ट्र सरकार, मोदी, फडणवीस, संघाशी संबंध या बऱ्याच विषयांवर पहिल्यांदाच थेट उत्तरं दिली आहेत. महाराष्ट्रात भाजप मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची एवढी उदाहरणं आली, त्यावर अण्णांनी तोंड का उघडलं नाही? अस प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “भ्रष्टाचारविरोधी लढाई लढताना समोर कुठला पक्ष आहे हे कधी पाहिलं नाही. महाराष्ट्रात गेल्या काही काळात अनेक मंत्र्यांची नावं समोर आली हे खरंय. पण कुणीही मला अजून पुरावे दिले नाहीत.” शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात संप केला, या सरकारमध्ये शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे का? असं विचारलं असता अण्णांचं उत्तर होतं की, “हे सरकार शेतकरी या विषयावर काही बोलायलाच तयार नाही. त्यांना उद्योगपतींबद्दल बोलायला वेळ आहे. सरकार उत्पन्न दुप्पट करायचं म्हणतंय, पण कृती तर अजिबात दिसत नाही.” मोदींबद्दल अण्णांना काय वाटतं? “मोदी सरकारला तीन वर्षे दिली. तीन वर्षे स्तब्ध राहिलो, पण सरकारने काही ठोस केलेलं नाही,” असं अण्णा हजारे म्हणाले. अण्णांच्या आंदोलनाने काँग्रेसचं सरकार गेलं, अण्णांच्या आंदोलनामागे संघ असतो अशी चर्चा असते त्यावर ते म्हणाले की, “आजपर्यंत मी जी आंदोलनं केली आहेत, ती सगळ्या पक्षांच्या विरोधातली आहेत. एक आंदोलनं एखाद्या विरोधात केलं की विरोधी माझ्या इर्द गर्द फिरत असतात हे नक्की. त्यामुळे काहींना तसं वाटत असावं.”
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Keral Local Body Election: डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!

व्हिडीओ

Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Keral Local Body Election: डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
Horoscope Today 15 December 2025 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
Dharur News : ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Embed widget