एक्स्प्लोर

शांतता काळातलं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन; 13 देश, 64 विमानं, 7 दिवस आणि 15 हजार भारतीयांच्या सुटकेचं लक्ष्य

1990 मध्ये झालेल्या गल्फ युद्धानंतरचं हे सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन असणार आहे. त्यावेळी 1 लाख 70 हजार जणांना रेस्क्यू करण्यात आलं होतं. 2015 मध्येही युद्धभूमी झालेल्या येमेनमधूनही ‘ऑपरेशन राहत’ च्या नावानं भारतीयांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं.

मुंबई : लॉकडाऊनमुळं परदेशात अडकलेल्या भारतीयांचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशनचा मेगा प्लॉन तयार झाला आहे. जगभरातील 13 देशांत अडलेल्या 14 हजार 800 भारतीयांनी एका आठवड्यात मायदेशात आणलं जाणार आहे. 7 मे पासून हे रेस्क्यू ऑपरेश सुरु आहे.यासाठी एअर इंडिया, खासगी विमान कंपन्या आणि नेव्हीची मदत घेतली जाणार आहे.

या रेस्क्यू ऑपरेशनची सुरुवात UAE पासून होणार आहे. जिथे 2 लाखाहून अधिक लोकांनी भारतात परत येण्यासाठी नोंदणी केली आहे. भारतातून पहिल्या टप्प्यात फिलिपिन्स, सिंगापूर, बांग्लादेश, यूएई, यूके, सौदी अरेबिया, कतार, अमेरिका, कुवेत, बहारीन, ओमानला फ्लाईट्स जातील. त्या-त्या देशातील दूतावासांमध्ये परराष्ट्र अधिकाऱ्यांनी भारतात परत जाऊ इच्छिणाऱ्यांची यादी करायला सुरुवात केलेली आहे. रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाईन सेवेचा वापर केला जात आहे.

नेव्हीच्या तीन लढाऊ नौका मालदिव आणि यूएईला रवाना होणार आहेत. गल्फ आणि इतर देशांमध्ये अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी 14 लढाऊ नौकांचा वापर केला जाईल. परदेशातून येऊ इच्छिणाऱ्यांना विमान किंवा समुद्र प्रवासाचा खर्च आणि संस्थात्मक क्वारंटाईनचा खर्च स्वत:ला उचलावा लागणार आहे. गरोदर महिला, वृद्ध लोक, मेडिकल इमर्जन्सी असलेले लोक यांना परत आणण्यासाठी प्राधान्य असणार आहे.

पहिल्या दिवशी 10 फ्लाईट्सच्या मदतीनं 2300 लोकांना भारतात आणलं जाईल. दुसऱ्या दिवशी 2050 लोक चेन्नई, कोच्ची, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरु आणि दिल्लीसह इतर 9 शहरात पोहोचतील. तिसऱ्या दिवशी 2050 लोक मुंबई, कोच्ची, लखनौ, दिल्लीसह इतर शहरात येतील, हे लोक मध्य आशिया, युरोप आणि अमेरिकेतून येणार आहेत. चौथ्या दिवशी 1850 लोकांना परत आणलं जाईल. ते अमेरिका, इंग्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीसह 8 देशांमधून त्यांची सोडवणूक केली जाईल. परत येण्याआधी या सगळ्यांना आरोग्याची स्थिती सांगणारा फॉर्म भरावा लागेल. ज्याची एक कॉपी अरायव्हल काऊंटरवर इमिग्रेशन अधिकाऱ्याकडे जमा करावी लागेल. ज्यात प्रवाशाला खोकला, ताप, कफ, मधुमेह किंवा इतर आजार असल्यास त्याची माहिती द्यावी लागेल.

लंडन ते मुंबई या प्रवासासाठी 50 हजार रुपये, तर शिकागो ते दिल्ली या प्रवासासाठी  साधारणपणे 1 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. एकूण 64 फ्लाईटपैकी 10 फ्लाईट यूएई, 2 कतारमध्ये, 5 सौदी अरेबिया, 7 ब्रिटनमध्ये, 5 सिंगापूरमध्ये, 7 अमेरिकेमध्ये, 5 फिलीपाईन्स, 7 बांग्लादेश, 2 बहारीनमध्ये, 7 मलेशियात, 5 कुवैतमध्ये, 4 ओमानमध्ये धावणार आहेत. या नागरिकांना भारतात पाऊल ठेवल्यानंतर पुढचे 14 दिवस स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीखाली क्वारंन्टाईन राहावं लागणार आहे.

विमानात किंवा जहाजात बसण्याआधी या सर्वांचं स्क्रीनिंग होणार आहे. तसंच ज्यांना कोविडची कुठलीही लक्षणं नाहीत अशाच लोकांना भारतात आणलं जाणार आहे.भारतात आणल्यानंतर पुन्हा त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना 14 दिवसांच्या संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात ठेवलं जाईल. त्याचा खर्च प्रवाशांना द्यावा लागेल. भारतात परत आल्यानंतर या सगळ्या प्रवाशांना आरोग्य सेतू अपवर आपलं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असणार आहे. 1990 मध्ये झालेल्या गल्फ युद्धानंतरचं हे सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन असणार आहे. त्यावेळी 1 लाख 70 हजार जणांना रेस्क्यू करण्यात आलं होतं. 2015 मध्येही युद्धभूमी झालेल्या येमेनमधूनही ‘ऑपरेशन राहत’ च्या नावानं भारतीयांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या :

Migrants | मजुरांची 1500 किमी सायकल सवारी, तीन मजुरांचा कडाक्याच्या उन्हात वेदनादायी प्रवास | स्पेशल रिपोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, पावसाळी अधिवेशनापूर्वी 'ऑपरेशन टायगर'वर फैसला होणार? 
ठाकरेंच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, पावसाळी अधिवेशनापूर्वी 'ऑपरेशन टायगर'वर फैसला होणार? 
गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांना प्रत्येक महिन्याला मिळणार 10 हजार रुपये, 'या' सरकारचा मोठा निर्णय   
गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांना प्रत्येक महिन्याला मिळणार 10 हजार रुपये, 'या' सरकारचा मोठा निर्णय   
Taratala Construction Site Accident: कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!
इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!

व्हिडीओ

Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली
Pune Ketan Agarwal Case : कॅफेत कसा रचला प्लॅन? पुण्यातील प्रकरणाची INSIDE STORY

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Venezuela Earthquake: व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
Tukaram Mundhe : हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
Maharashtra Live blog updates: भंडाऱ्यात कृषी वीज महिनाभरापासून बंद, बागायती पीकं करपली
Maharashtra Live blog updates: भंडाऱ्यात कृषी वीज महिनाभरापासून बंद, बागायती पीकं करपली
ICC Ranking: आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
Bandra Football Ground : वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
Gold-Silver Price Today: आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारात चढउतार; सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे 24 कॅरेट अन् 22 कॅरेटचे भाव
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारात चढउतार; सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे 24 कॅरेट अन् 22 कॅरेटचे भाव
Embed widget