एक्स्प्लोर

ग्रामदेवता : खरसुंडी गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसिद्धनाथ

सांगली : माणदेशाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणजे खरसुंडीचा सिद्धनाथ. सांगली जिल्हातील आटपाडी तालुक्यामध्ये श्री खरसुंडी सिध्दाचे सुमारे ११२५ वर्षापूर्वीचे प्राचीन देवस्थान आहे. मंदिराची रचना हेमाडपंथी श्री सिध्दनाथांचे मंदीर दक्षिणाभिमुख, पुरातन आणि दगडी असून त्याचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची रचना आहे. मंदिरातील नगारखाना तर नक्षीकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे याठिकाणी पहायला मिळते. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपावर पूर्वीचे पत्र्याचे छत आहे. खारसुड सिद्धाची आख्यायिका औंध संस्थानाचे अधिपती बाळासाहेब महाराज यांच्या सूचनेवरून प्रसिध्द कारखानदार किर्लोस्कर यांनी हा मंडप बांधला आहे. गाभार्‍यात पन्नास किलो चांदीने मढवलेल्या मखरामध्ये श्री सिध्दनाथ व बाळाईदेवीची मूर्ती आहे. शंकराच्या देवालयात नंदी असतो असा प्रघात आहे. परंतु या देवापुढे ज्या कालवडीच्या स्तनातून दूध निघून ‘खारसुड सिद्ध’ तयार झाले त्या गोमातेची सुंदरशी पितळी प्रतिमा आहे. या ग्रामदेवतेची आख्यायिकाही अतिशय मनोरंजक आहे. मायाप्पा गवळी नावाच्या एका भक्ताला दृष्टांत होऊन सिध्दनाथाच्या कृपेने त्याच्या खिलारीतील एका कालवडीच्या स्तनातून दुधाची धार सुरू झाली. या कच्च्या दुधाचा खरवस होऊन त्यातून दोन लिंग तयार झाली. म्हणून या स्थानास खरसुंडी सिध्द-खरवस, शुंड सिध्द असे नांव प्राप्त झाले. या देवाची चैत्र वद्य द्वादशीला भरणारी चैत्र यात्रा वर्षतील महत्वाची यात्रा आहे. या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रसह कर्नाटक मधून देखील भाविक येतात. या यात्रेत सासनकाठ्या मिरवणूक आणि पालखी सोहळा पाहण्यासासारखा असतो. श्रींची विशेष कापडीपूजा आणि पत्रीपूजा गाभार्‍यावर सुमारे १५० फूट उंचीचे शिखर आहे.शिखरावर भक्तगणांनी अर्पण केलेला सुवर्णकलश असून त्याची स्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आली. श्री सिद्धनाथ मंदिराचा दिवस नित्य पहाटे चार वाजता सनई-चौघडा वादनाने सुरू होतो. त्यानंतर मूर्तीस अभिषेक घालून पत्रीपूजा बांधण्यात येते. पत्रीपूजेनंतर ’श्रीं’ची कापडी पूजा बांधण्यात येते. संपूर्णपणे कापडाचा वापर करुन विविध रूपात बांधण्यात येणारी पूजा हे येथील प्रमुख वैशिष्टय आहे. नवरात्र उत्सवामध्ये देखील दररोज वेगवेगळ्या प्रकारे पूजा बांधली जाते. खरसुंडी गावातील पुजारी मंडळींकडून सिद्धनाथांची विविध स्वरुपात पूजा बांधली जाते. भल्या पाहाटे श्रींच्या मूर्तीस गरम पाण्याने स्नान घालण्यात येते. देवांना कौल लावला जातो. त्यानंतर श्रींची सुंदर अशी पूजा बांधण्यात येते. दररोज श्रींची वेगवेगळ्या स्वरुपात पूजा करण्यात येते. पूजेसाठी विविध प्रकारचे प्राणी वापरतात. त्यामध्ये घोडा,हाती,नाग,सिंह असे अनेक प्राणी वापरले जातात. या पूजा अशा प्रकारे बांधल्या जातात की बघणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटते. सशाची पारध माघ पौर्णिमेस परशुराम लोणारी या भक्ताची आठवण म्हणून “ सशाची पारध ” वाटली जाते. मोठ्या उत्सवात पालखी सोहळा रंगतो. त्यास 'पारधी पौर्णिमा उत्सव' असे म्हणतात. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरु आहे. सशाचे मांस तसेच मीठ व गुलाल यांच्या मिश्रणापासून ही पारध बनवली जाते. वर्षभर विविध उत्सवांचं आयोजन मंदिरात वर्षभर अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. यात चैत्रपाडवा, रामनवमी, नाथअष्टमी, चैत्र वद्य दशमी, चैत्र यात्रा, नवरात्रौत्सव, देव सीमोल्लंघन शिकारीसाठी प्रस्थान, पालखी सोहळा,  माघ पौर्णिमा, श्रीनाथ जन्मकाळ, कार्तिक वद्य प्रतिपदा ते अष्टमी, पौष शुद्ध त्रयोदशी, अधिकमास यांचा समावेश होतो. याठिकाणची सासणकाठ्यांची परंपरा अतिशय प्रसिद्ध आहे. नवसाच्या सासणकाठ्या, मानाची सासणे, श्री सिद्धनाथांच्या पालखीवर मुक्तपणे भाविक गुलाल- खोबऱ्याची उधळण करतात. यावेळी भाविक गुलालाने अक्षरशः न्हाऊन निघतात. खरसुंडी नगरीतील मंदिर परिसर, गावातील सर्व रस्ते, गावचा परिसर गुलालाने व भाविकांनी खचाखच भरलेला असतो. 'नाथबाच्या नावानं चांगभलं', 'सासनाचं चांगभलं'च्या जयघोषाने परिसर दुमदुमुन निघतो. ढोल-ताशांच्या निनादावर सासणकाठ्या नाचत असतात. हे मनोहारी दृष्य नजरेत साठवून ठेवण्यासाठी लाखो भाविक येथे हजेरी लावतात. या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच खरसुंडीचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथाच्या दर्शनाला जायलाच हवं. पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळ दूध संघाचा मोठा निर्णय, गाईच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ, मात्र, म्हशीचे दर जैसे थे, नवीन दर कधीपासून लागू?
गोकुळ दूध संघाचा मोठा निर्णय, गाईच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ, मात्र, म्हशीचे दर जैसे थे, नवीन दर कधीपासून लागू?
Beed : भररस्त्यात तरुणीनं थोबाडीत मारली, अपमान सहन न झाल्याने तरुणानं जीवन संपवलं; बीडमधील धक्कादायक घटना
भररस्त्यात तरुणीनं थोबाडीत मारली, अपमान सहन न झाल्याने तरुणानं जीवन संपवलं; बीडमधील धक्कादायक घटना
KKR vs GT LIVE score IPL 2026 : ॲलनचे 93 अन् रघुवंशीच्या नाबाद 82 धावा; केकेआरच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांना धो-धो धुतले
KKR vs GT LIVE Update : ॲलनचे 93 अन् रघुवंशीच्या नाबाद 82 धावा; केकेआरच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांना धो-धो धुतले
धक्कादायक! खोल पाण्याचा अंदाज आला नाही, भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीत बुडून दोन जणांचा मृत्यू
धक्कादायक! खोल पाण्याचा अंदाज आला नाही, भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीत बुडून दोन जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Embed widget