एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case: बीड प्रकरणात न्यायालयीन चौकशी कुठंय? बजरंग सोनवणेंचा थेट अजित पवारांना सवाल

Bajrang Sonwane on Santosh Deshmukh Case: खासदार बजरंग सोनावणे यांनी न्यायलयीन चौकशीची बोलला ती कुठे आहे? यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची निवड केली म्हणालात कुठे आहे? असे सवाल उपस्थित केले आहेत.

धाराशिव: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) याच्या अपहरण आणि निर्घृण हत्येला जवळपास 35 दिवस उलटले आहेत, तरी देखील अद्याप एक आरोपी फरार आहे. आज या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत, अशातच आज धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना बीडचे खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी न्यायलयीन चौकशीची बोलला ती कुठे आहे? यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची निवड केली म्हणालात कुठे आहे? नेमणूक करायची तर लवकर घोषणा करा, नायतर तोपर्यंत पुरावे नष्ट होतील. अन्यथा सतीश माने शिंदे सारख्या वकिलांची नेमणूक करा, अन्यथा खासदार म्हणून मी त्यांची फी देईन, असं म्हणत मोक्का लावला तुम्ही चांगलं केलं पण वाल्मिक कराडवर देखील मोक्का लावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

धाराशिवमध्ये बोलताना खासदार बंजरंग सोनावणे  (Bajrang Sonawane) यांनी काही सवाल देखील उपस्थित केले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर रोजी अपहरण करून खून केला गेला. त्या क्षणापासून आजपर्यंत आपण सर्वजण त्याचा छडा लावण्यासाठी उभे आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा निघतोय. पहिला मोर्चा रेणापूरमध्ये, दुसरा मोर्चा आमच्या बीडमध्ये झाला, त्याच्यानंतर परभणीत झाला, पुण्यात झाला, पैठणमध्ये झाला, काल जालन्यात झाला आणि आज धाराशिवमध्ये होतोय. महाराष्ट्रातल्या मायबाप सरकारला माझी विनंती आहे. सर्व पक्षाचे आमदार , खासदार आम्ही सर्वजण आणि तुमच्या संहिता आपण सर्वजण एकाच गोष्टीसाठी झगडतोय, की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. त्याचा मास्टर माईंड पकडला पाहिजे, त्याला 302 मध्ये अॅड केला पाहिजे, असं सोनावणे  (Bajrang Sonawane) म्हणालेत. 

पहिल्या दिवसापासून आपली मागणी महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणाचा रास्त अभिमान असला तरी, काल बीड जिल्ह्यातल्या पोलिसाला कोर्टाला विचारलं की, 24 दिवस तुम्ही काय करत होता? माझ्या या पोलीस यंत्रणा चालवणाऱ्या सर्व सरकारला विनंती आहे, आपल्या पोलीस यंत्रणेला एवढा दिवस का लागतोय? यांचा मर्डर झाला, किडनॅपिंग झालं त्याला, आज किती दिवस उलटले ते जर मोजता मोजता तुम्हाला बघत गेलात तर जवळपास 35 दिवस या घटनेला झाले आहेत. 35 दिवसांमध्ये सुद्धा जे प्राथमिक दृष्ट्या ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला असे सात आरोपी आहेत. सात मधला एक अद्याप फरारी आहे. पोलिस यंत्रणेचं काम खूप चोख आहे असं जरी समजलं गेलं, तर यांना पाठीमागे कोण घालतंय? या गुन्हेगारांचे सीडीआर का तपासले जात नाहीत? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे की, याचा मास्टरमाइंड कोण आहे. या सात आरोपीला पकडून चालणार नाही. या सात आरोपीवर गुन्हा लावून चालणार नाही. तर याचा मास्टर माईंड जो कोण आहे, याला याच्यात घातला पाहिजे आणि मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे. त्याला 302 मध्ये दाखल केला पाहिजे तरच तुमच्या आमच्या सर्वांच्या मागणीला यश आलं असं समजलं जाईल. सरकारला सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही एसआयटी नेमली, एसआयटीमध्ये नऊ लोक घेतले ते बीड जिल्ह्यातले, एकच अधिकारी बाहेरचा. परत एक स्टेटमेंट बघितला गेला की दोन अधिकारी काढले, कोण काढले ते आणखी काही दुसरी ऑर्डर मला बघायला मिळाली नाही. पण एसआयटीमध्ये तुम्ही बीड जिल्ह्यामधल्या जे अधिकारी घेतले, ते अधिकारी कोण आहेत. या खंडणीखोर जो आरोपीमध्ये बसलाय त्यानेच या पदावर बसले त्याच्यावरच्या नेत्याच्या सहाय्याने ते पदावर बसवलेले हे अधिकारी आहेत असं म्हणत सोनावणे यांनी होत असलेल्या चौकशीवरती देखील संशय व्यक्त केला आहे. 

गळ्यात हात टाकून फोटो काढतात, डान्स करतात सोबत, असले अधिकारी यांची काय चौकशी करणार? आमचं म्हणणं आहे की या अधिकाऱ्याला त्याच्यातून बाहेर काढा. न्यायालयीन चौकशी केली जाईल असे सांगितले, न्यायलयीन चौकशीचं काय झालं? काल कुणीतरी एक स्टेटमेंट केलं. मुख्यमंत्र्यांनी की उपमुख्यमंत्र्यांनी की तिन्ही चौकशा चालू आहेत, माझ्या बघण्यात, माझ्या ऐकण्यात तरी दोनच आहेत. न्यायालयीन चौकशी कुठे आहे? न्यायालयीन चौकशी सुद्धा नाही, आणि अण्णा आपण मुख्यमंत्र्याला भेटायला गेलात. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सरकारी वकील म्हणून उज्वल निकम साहेबांची नियुक्ती करण्यासाठी मी त्यांना विचारलं. मग आता कधी नेमणार आहेत, सर्व पुरावे नष्ट झाल्यानंतर, तुम्हाला उज्वल निकम सारखे वकील नेमायचे असतील तर लगेच नेमा, नाहीतर मी आणखी एका वकिलांचं वक्तव्य ऐकलं होतं, सतीश माने शिंदे या वकीलाला सुद्धा शासनाने नेमलं पाहिजे, नाही नेमलं तर खासदार या नात्याने मी त्याच्यात त्यांची फीस भरून त्यांना त्याच्यात हजर राहायला लावेन असंही पुढे सोनावणे म्हणालेत.


 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??

व्हिडीओ

Gautami Patil Coffee With Kaushik : दादांच्या आठवणीने डोळ्यात पाणी, राधा पाटीलला म्हणाली...
Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Vaishnavi Hagavane Case :वैष्णवी हगवणे प्रकरणात सहा जणांवर आरोप निश्चित
Sunetra Pawar Janta Darbar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा आज बारामतीत पहिला जनता दरबार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Chhatrapati Shivaji Maharaj and Tipu Sultan: टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते, हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका
टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते, हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Embed widget