एक्स्प्लोर

यादी ठरली, नावंही फायनल! मविआच्या 'वज्रमुठ' सभेत 'या' प्रमुख नेत्यांची भाषणं होणार

Maha Vikas Aghadi : या सभेत तीनही पक्षातील कोणत्या प्रमुख नेत्यांचे भाषणं होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.

Maha Vikas Aghadi : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) आज महाविकास आघाडीची 'वज्रमुठ सभा' पार पडत आहे. तर पहिल्यांदाच तीनही पक्ष एकत्र सभा घेत आहे. विशेष म्हणजे, याच सभेतून शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीचे नेते हल्लाबोल करणार आहेत. त्यामुळे या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे. मात्र या सभेत तीनही पक्षातील कोणत्या प्रमुख नेत्यांचे भाषणं होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. तर या सभेत प्रमुख सहा भाषणं होणार आहे. 

महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचे भाषणं होणार आहे. तर याचवेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभेचं सूत्रसंचालन करणार आहेत. तर सभेच्या ठिकाणी दुपारी दोन वाजेपासूनच कार्यकर्ते, पदाधिकारी येण्यास सुरूवात होईल. तसेच साधारण 5 वाजता सभेला सुरूवात होईल. तर उद्धव ठाकरे यांचे भाषण संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 

नेतेमंडळी होतायत शहरात दाखल...

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र या सर्व घटनेनंतर आज पहिल्यांदाच महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष एकत्र सभा घेत आहे. त्यामुळे या सभेची राज्यात जोरदार चर्चा आहे. दरम्यान ही सभा सुरू होण्यासाठी अवघ्या काही तासांचा वेळ शिल्लक राहिला असून, महाविकास आघाडीमधील राज्यभरातील नेतेमंडळी शहरात दाखल होताना पाहायला मिळत आहे. तर सकाळच्या विमानाने अनेक नेते मुंबईहून शहरात दाखल होताना पाहायला मिळाले आहेत. तर मराठवाड्यातील अनेक नेते वाहनाने शहरात दाखल होताना पाहायला मिळत आहे. 

अमित देशमुखांची प्रतिक्रिया... 

दरम्यान आजच्या महाविकास आघाडीच्या सभेवर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले की, आजची सभा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी सभा असेल. इथले वातावरण गढूळ होण्यास चार दिवसाची पार्श्वभूमी नाही. देशात अनावश्यक मुद्द्यांना उचलून धरल जातेय, त्यामुळे वातावरण गढूळ होत आहे. ही सभा होऊ नये यासाठी विरोधकांनी अनेक प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी झाले नाहीत. चौकशीअंती संभाजी नगरातील वातावरण खराब करणारे समोर येतील. पण ही सभा खूप पूर्वीच जाहीर झालेली आहे, त्यामुळे ते पुढे ढकलण्याचा प्रश्न नव्हता. कटकारस्थान करून सत्तांतर घडवलं गेलं, हे महाराष्ट्राला पटलं नाही. जनतेची महाविकास आघाडीकडून अपेक्षा असून, आजच्या सभेने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणतील असेही अमित देशमुख म्हणाले.

महत्वाच्या इतर बातम्या : 

मविआच्या 'वज्रमुठ' सभेत संविधान पूजन होणार; शिंदे गटासह भाजप नेत्यांकडून मात्र टीका

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Blast Case Verdict : आरोपींची निर्दोष सुटका होताच मालेगावात हिंदुत्त्ववादी संघटनांचा जल्लोष, फटाके फोडण्यावरून पोलीस अन् कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं?
आरोपींची निर्दोष सुटका होताच मालेगावात हिंदुत्त्ववादी संघटनांचा जल्लोष, फटाके फोडण्यावरून पोलीस अन् कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं?
कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरुद्ध आता थेट एफआयआर दाखल होणार! मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्त्वपूर्ण निर्णय
कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरुद्ध आता थेट एफआयआर दाखल होणार! मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्त्वपूर्ण निर्णय
Malegaon Blast Case: तर मग साध्वीला जेलमध्ये टाकण्याची कोणाची हिंमत झाली? इम्तियाज जलीलांची मालेगाव बाॅम्बस्फोटाच्या निकालावर प्रश्नांची सरबत्ती
तर मग साध्वीला जेलमध्ये टाकण्याची कोणाची हिंमत झाली? इम्तियाज जलीलांची मालेगाव बाॅम्बस्फोटाच्या निकालावर प्रश्नांची सरबत्ती
मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका; प्रज्ञा सिंह ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, मला आतंकवादी...
मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका; प्रज्ञा सिंह ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, मला आतंकवादी...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Malegoan Bomb Verdict : मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष सुटका
Malegaon Blast Verdict: 17 वर्षांनंतर आरोपी Sameer Kulkarni म्हणतात, 'निकाल सत्याच्या बाजूनेच'
Malegaon Blast Verdict | 17 वर्षांनंतर आज निकाल, हिंदुत्वाशी संबंध जोडल्याने महत्त्व
Malegaon Blast Verdict | मालेगाव स्फोट खटल्याचा निकाल आज, Sameer Kulkarni म्हणाले...
Malegaon Blast Verdict | १७ वर्षांनंतर आज फैसला, Pragya Singh Thakur सह ७ आरोपींचा निकाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Blast Case Verdict : आरोपींची निर्दोष सुटका होताच मालेगावात हिंदुत्त्ववादी संघटनांचा जल्लोष, फटाके फोडण्यावरून पोलीस अन् कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं?
आरोपींची निर्दोष सुटका होताच मालेगावात हिंदुत्त्ववादी संघटनांचा जल्लोष, फटाके फोडण्यावरून पोलीस अन् कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं?
कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरुद्ध आता थेट एफआयआर दाखल होणार! मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्त्वपूर्ण निर्णय
कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरुद्ध आता थेट एफआयआर दाखल होणार! मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्त्वपूर्ण निर्णय
Malegaon Blast Case: तर मग साध्वीला जेलमध्ये टाकण्याची कोणाची हिंमत झाली? इम्तियाज जलीलांची मालेगाव बाॅम्बस्फोटाच्या निकालावर प्रश्नांची सरबत्ती
तर मग साध्वीला जेलमध्ये टाकण्याची कोणाची हिंमत झाली? इम्तियाज जलीलांची मालेगाव बाॅम्बस्फोटाच्या निकालावर प्रश्नांची सरबत्ती
मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका; प्रज्ञा सिंह ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, मला आतंकवादी...
मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका; प्रज्ञा सिंह ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, मला आतंकवादी...
Malegaon Blast Case Verdict: मालेगाव स्फोट प्रकरणातील सातही आरोपी निर्दोष, न्यायालयाने निकाल देताच झाले भावूक, म्हणाले, आमचा 17 वर्षांनंतर पुनर्जन्म झाला!
मालेगाव स्फोट प्रकरणातील सातही आरोपी निर्दोष, न्यायालयाने निकाल देताच झाले भावूक, म्हणाले, आमचा 17 वर्षांनंतर पुनर्जन्म झाला!
Malegaon Blast Case: 'एनआयए'कडून मालेगाब बाॅम्बस्फोटातील आरोपींना मृत्यूदंडाची मागणी; न्यायालय म्हणाले, 'बॉम्बस्फोट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं, पण..'
'एनआयए'कडून मालेगाब बाॅम्बस्फोटातील आरोपींना मृत्यूदंडाची मागणी; न्यायालय म्हणाले, 'बॉम्बस्फोट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं, पण..'
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा 17 वर्षांनंतर निकाल, हेमंत करकरेंनी केला होता प्रकरणाचा तपास; मालेगावकरांच्या 'त्या' आठवणी ताज्या
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा 17 वर्षांनंतर निकाल, हेमंत करकरेंनी केला होता प्रकरणाचा तपास; मालेगावकरांच्या 'त्या' आठवणी ताज्या
Donald Trump on India: 'भारत रशियासोबत काय करतोय मला फरक पडत नाही, त्यांची मृत अर्थव्यव्यवस्था सोबत घेऊन बुडाले, तरी..?' डोनाल्ड ट्रम्प यांची दर्पोक्ती सुरुच!
'भारत रशियासोबत काय करतोय मला फरक पडत नाही, त्यांची मृत अर्थव्यव्यवस्था सोबत घेऊन बुडाले, तरी..?' डोनाल्ड ट्रम्प यांची दर्पोक्ती सुरुच!
Embed widget